शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

मराठवाड्यात न भूतो न भविष्यती पाऊस; ७०० हून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2021 19:37 IST

विभागात २८ रोजी दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. कधी हलका तर कधी जाेरदार पाऊस दिवसभर सुरू होता.

ठळक मुद्देलहान-मोठ्या नद्यांना पूरअनेक गावांचा संपर्क तुटलाबचाव कार्यासाठी हेलिकॉप्टरची मागणी

औरंगाबाद: गुलाब वादळाने निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्याने सुरू असलेला पाऊस मराठवाड्यात तांडव करू लागला आहे. मंगळवारी झालेल्या पावसामुळे विभागातील लहान-मोठ्या नद्यांचे पात्र दुथडी भरून वाहू लागले असून, ७०० हून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. अनेक गावांचा संपर्क तुटला. लातूर येथील बचाव कार्यासाठी एनडीआरएफची टीम आणि हेलिकॉप्टरची मागणी नोंदविण्यात आली. विभागात २८ रोजी दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. कधी हलका तर कधी जाेरदार पाऊस दिवसभर सुरू होता.

औरंगाबाद: गोंदेगाव, पोहरी बु. निंभोरा येथील २० घरांची पडझड झाली. सोयगाव तालुक्यातील जरंडी तलाव ओव्हरफ्लो झाला असून, घरांची पडझड झाली आहे. लिहाखेडा येथील डी.पी.वर वीज कोसळून दोन ट्रान्सफार्मर जळाले. सिल्लोड तालुक्यातील धानोरा ते पूर्णवाडी, बेलेश्वर वाडी, काकडेवाडी येथील पूर्णा नदीला पूर आल्याने गावांचा संपर्क तुटला. गिरीजा धरण सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी ओसंडून वाहत आहे. गंगापूर तालुक्यातील आलापूरवाडी येथील पुलावरून पाणी आल्याने वाहतूक बंद आहे. शिवना टाकळी येथील धरण भरल्याने २० हजार क्युसेसने पाणी सोडण्यात आले, तसेच लासूर स्टेशन येथे नागपूर-मुंबई हायवे पुलावरून नदीचे पाणी ओव्हर फ्लो झाले.

जालना: जाफ्राबाद तालुक्यातील आंबेगाव येथील संजय शिंदे यांच्या मालकीचा बैल वीज पडून मृत्युमुखी पडला. घनसावंगी तालुक्यातील सिध्देश्वर पिंपळगावातील अनेक घरांत पाणी शिरले. जांबसमर्थ येथील पाझर तलाव फुटल्याने शेतात पाणी शिरले.

हिंगोली: मधुमती नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला.बीड: अंबाजोगाई येथे १९ व्यक्ती पुरात अडकले. त्यांना बचाव पथकाने बोटीच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. सावळेश्वर येथील पाझर तलावातील पाण्याला मोकळी वाट करून देण्यात आली. तसेच केज तालुक्यातील भाटूंबा गावात पाणी शिरल्याने अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे.

लातूर: देवळा येथील पुरात नागरिक अकडले. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. रेणापूर तालुक्यातील घनसरगाव, डिगोळ देशमुख, सारसा येथील व्यक्ती पुरात अडकल्या. त्यांच्या बचावासाठी एनडीआरएफची टीम तसेच हेलीकॉप्टरची मागणी शासनाकडे नोंदविण्यात आली.

उस्मानाबाद: भंडारवाडी येथील तेरणा नदीपात्रात बालाजी कांबळे यांचा वाहून गेलेला मृतदेह सापडला नाही. तसेच वाशी येथील पद्मीनी राख यांना मृतदेह पाण्यात आढळला. तेरणेच पाणी गावांत घुसल्याने उस्मानाबादमधील इरला येथील १५०, रामवाडी येथील ३२५, दाऊदपूर येथील ६ व्यक्तींना जि.न.शाळेत हलविले. कळंब तालुक्यातील वाकडी येथील ३ घरांना पुराने वेढले. १७ व्यक्ती छतावर अडकून पडले होते. एनडीआरएफने सर्वांना सुखरूप बाहेर काढले. देवधानोरा येथील बंधारा पहाटे तीन वाजेच्या सुमारास फुटला. 

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबाद