शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात न भूतो न भविष्यती पाऊस; ७०० हून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2021 19:37 IST

विभागात २८ रोजी दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. कधी हलका तर कधी जाेरदार पाऊस दिवसभर सुरू होता.

ठळक मुद्देलहान-मोठ्या नद्यांना पूरअनेक गावांचा संपर्क तुटलाबचाव कार्यासाठी हेलिकॉप्टरची मागणी

औरंगाबाद: गुलाब वादळाने निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्याने सुरू असलेला पाऊस मराठवाड्यात तांडव करू लागला आहे. मंगळवारी झालेल्या पावसामुळे विभागातील लहान-मोठ्या नद्यांचे पात्र दुथडी भरून वाहू लागले असून, ७०० हून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. अनेक गावांचा संपर्क तुटला. लातूर येथील बचाव कार्यासाठी एनडीआरएफची टीम आणि हेलिकॉप्टरची मागणी नोंदविण्यात आली. विभागात २८ रोजी दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. कधी हलका तर कधी जाेरदार पाऊस दिवसभर सुरू होता.

औरंगाबाद: गोंदेगाव, पोहरी बु. निंभोरा येथील २० घरांची पडझड झाली. सोयगाव तालुक्यातील जरंडी तलाव ओव्हरफ्लो झाला असून, घरांची पडझड झाली आहे. लिहाखेडा येथील डी.पी.वर वीज कोसळून दोन ट्रान्सफार्मर जळाले. सिल्लोड तालुक्यातील धानोरा ते पूर्णवाडी, बेलेश्वर वाडी, काकडेवाडी येथील पूर्णा नदीला पूर आल्याने गावांचा संपर्क तुटला. गिरीजा धरण सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी ओसंडून वाहत आहे. गंगापूर तालुक्यातील आलापूरवाडी येथील पुलावरून पाणी आल्याने वाहतूक बंद आहे. शिवना टाकळी येथील धरण भरल्याने २० हजार क्युसेसने पाणी सोडण्यात आले, तसेच लासूर स्टेशन येथे नागपूर-मुंबई हायवे पुलावरून नदीचे पाणी ओव्हर फ्लो झाले.

जालना: जाफ्राबाद तालुक्यातील आंबेगाव येथील संजय शिंदे यांच्या मालकीचा बैल वीज पडून मृत्युमुखी पडला. घनसावंगी तालुक्यातील सिध्देश्वर पिंपळगावातील अनेक घरांत पाणी शिरले. जांबसमर्थ येथील पाझर तलाव फुटल्याने शेतात पाणी शिरले.

हिंगोली: मधुमती नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला.बीड: अंबाजोगाई येथे १९ व्यक्ती पुरात अडकले. त्यांना बचाव पथकाने बोटीच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. सावळेश्वर येथील पाझर तलावातील पाण्याला मोकळी वाट करून देण्यात आली. तसेच केज तालुक्यातील भाटूंबा गावात पाणी शिरल्याने अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे.

लातूर: देवळा येथील पुरात नागरिक अकडले. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. रेणापूर तालुक्यातील घनसरगाव, डिगोळ देशमुख, सारसा येथील व्यक्ती पुरात अडकल्या. त्यांच्या बचावासाठी एनडीआरएफची टीम तसेच हेलीकॉप्टरची मागणी शासनाकडे नोंदविण्यात आली.

उस्मानाबाद: भंडारवाडी येथील तेरणा नदीपात्रात बालाजी कांबळे यांचा वाहून गेलेला मृतदेह सापडला नाही. तसेच वाशी येथील पद्मीनी राख यांना मृतदेह पाण्यात आढळला. तेरणेच पाणी गावांत घुसल्याने उस्मानाबादमधील इरला येथील १५०, रामवाडी येथील ३२५, दाऊदपूर येथील ६ व्यक्तींना जि.न.शाळेत हलविले. कळंब तालुक्यातील वाकडी येथील ३ घरांना पुराने वेढले. १७ व्यक्ती छतावर अडकून पडले होते. एनडीआरएफने सर्वांना सुखरूप बाहेर काढले. देवधानोरा येथील बंधारा पहाटे तीन वाजेच्या सुमारास फुटला. 

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबाद