शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

मराठवाड्यात न भूतो न भविष्यती पाऊस; ७०० हून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2021 19:37 IST

विभागात २८ रोजी दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. कधी हलका तर कधी जाेरदार पाऊस दिवसभर सुरू होता.

ठळक मुद्देलहान-मोठ्या नद्यांना पूरअनेक गावांचा संपर्क तुटलाबचाव कार्यासाठी हेलिकॉप्टरची मागणी

औरंगाबाद: गुलाब वादळाने निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्याने सुरू असलेला पाऊस मराठवाड्यात तांडव करू लागला आहे. मंगळवारी झालेल्या पावसामुळे विभागातील लहान-मोठ्या नद्यांचे पात्र दुथडी भरून वाहू लागले असून, ७०० हून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. अनेक गावांचा संपर्क तुटला. लातूर येथील बचाव कार्यासाठी एनडीआरएफची टीम आणि हेलिकॉप्टरची मागणी नोंदविण्यात आली. विभागात २८ रोजी दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. कधी हलका तर कधी जाेरदार पाऊस दिवसभर सुरू होता.

औरंगाबाद: गोंदेगाव, पोहरी बु. निंभोरा येथील २० घरांची पडझड झाली. सोयगाव तालुक्यातील जरंडी तलाव ओव्हरफ्लो झाला असून, घरांची पडझड झाली आहे. लिहाखेडा येथील डी.पी.वर वीज कोसळून दोन ट्रान्सफार्मर जळाले. सिल्लोड तालुक्यातील धानोरा ते पूर्णवाडी, बेलेश्वर वाडी, काकडेवाडी येथील पूर्णा नदीला पूर आल्याने गावांचा संपर्क तुटला. गिरीजा धरण सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी ओसंडून वाहत आहे. गंगापूर तालुक्यातील आलापूरवाडी येथील पुलावरून पाणी आल्याने वाहतूक बंद आहे. शिवना टाकळी येथील धरण भरल्याने २० हजार क्युसेसने पाणी सोडण्यात आले, तसेच लासूर स्टेशन येथे नागपूर-मुंबई हायवे पुलावरून नदीचे पाणी ओव्हर फ्लो झाले.

जालना: जाफ्राबाद तालुक्यातील आंबेगाव येथील संजय शिंदे यांच्या मालकीचा बैल वीज पडून मृत्युमुखी पडला. घनसावंगी तालुक्यातील सिध्देश्वर पिंपळगावातील अनेक घरांत पाणी शिरले. जांबसमर्थ येथील पाझर तलाव फुटल्याने शेतात पाणी शिरले.

हिंगोली: मधुमती नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला.बीड: अंबाजोगाई येथे १९ व्यक्ती पुरात अडकले. त्यांना बचाव पथकाने बोटीच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. सावळेश्वर येथील पाझर तलावातील पाण्याला मोकळी वाट करून देण्यात आली. तसेच केज तालुक्यातील भाटूंबा गावात पाणी शिरल्याने अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे.

लातूर: देवळा येथील पुरात नागरिक अकडले. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. रेणापूर तालुक्यातील घनसरगाव, डिगोळ देशमुख, सारसा येथील व्यक्ती पुरात अडकल्या. त्यांच्या बचावासाठी एनडीआरएफची टीम तसेच हेलीकॉप्टरची मागणी शासनाकडे नोंदविण्यात आली.

उस्मानाबाद: भंडारवाडी येथील तेरणा नदीपात्रात बालाजी कांबळे यांचा वाहून गेलेला मृतदेह सापडला नाही. तसेच वाशी येथील पद्मीनी राख यांना मृतदेह पाण्यात आढळला. तेरणेच पाणी गावांत घुसल्याने उस्मानाबादमधील इरला येथील १५०, रामवाडी येथील ३२५, दाऊदपूर येथील ६ व्यक्तींना जि.न.शाळेत हलविले. कळंब तालुक्यातील वाकडी येथील ३ घरांना पुराने वेढले. १७ व्यक्ती छतावर अडकून पडले होते. एनडीआरएफने सर्वांना सुखरूप बाहेर काढले. देवधानोरा येथील बंधारा पहाटे तीन वाजेच्या सुमारास फुटला. 

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबाद