शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात १७ जूननंतर मान्सून होणार सक्रिय; हवामानातील बदलाने पावसाची दडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 12:33 IST

खरीप हंगामातील पेरणीस सज्ज असलेल्या शेतकऱ्यांना पावसाने दडी दिल्याने आणखी पाच ते सहा दिवस प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे आहेत

औरंगाबाद : मान्सूनपूर्व पावसाने जूनच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. मात्र, खरीप हंगामातील पेरणीस सज्ज असलेल्या शेतकऱ्यांना पावसाने दडी दिल्याने आणखी पाच ते सहा दिवस प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे आहेत. 

यंदाच्या मोसमात ९७ टक्के पावसाचा अंदाज स्कायमेटसह भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यातच नियोजित वेळेप्रमाणे मान्सून अंदमान, निकोबारमार्गे देशात दाखल झाला. मराठवाड्यासह काही भागांत मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरीही लावली. मान्सून वेळेत दाखल होण्याची शक्यता असतानाच अचानक औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील काही भागात पावसाने दडी मारली. पावसासाठी हवामानातील योग्य बदल होत नसल्याने अनेक ठिकाणी पाऊस लांबला आहे. वातावरणातील बदल आणि पावसासाठी योग्य होणारी परिस्थिती कमकुवत झाल्याने पाऊस लांबला आहे, तर नांदेड, परभणी, हिंगोली, बीड आदी जिल्ह्यांतही १२ ते १६ जून या काळात पावसाची शक्यता कमीच आहे. 

हवामानातील बदलांमुळे या जिल्ह्यांमध्येही १६ जूननंतरच मान्सून खऱ्या अर्थाने मराठवाड्यात सक्रिय होणार असल्याचे हवामानतज्ज्ञांनी सांगितले. मराठवाड्यात काही ठिकाणी कपाशीची लागवड झाली असली तरी सोयाबीन, मूग, तूर, बाजरी आदी पिकांची पेरणी पाऊस लांबल्याने खोळंबली आहे. चांगला पाऊस झाल्यानंतरच पेरणी सुरु करता येणार आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मान्सूनसाठी आठवडाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

चांगला पाऊस असेल तरच पेरणी...पाऊस चांगला असेल तरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी. अन्यथा प्रतीक्षा करावी, असा सल्ला कृषितज्ज्ञांनी दिला आहे. पावसाचे प्रमाण कमी असेल आणि शेतकऱ्यांनी पेरणी केल्यास ती वाया जाण्याची भीती अधिक असते. दुबार पेरणीचे संकट येऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी चांगला पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असे कृषितज्ज्ञांनी  म्हटले आहे. 

सध्या पावसा योग्य वातावरण नाही मराठवाड्यात १० किंवा ११ जून रोजी मान्सून दाखल व्हायला हवा होता. मात्र, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांत पावसायोग्य हवामान नसून, मान्सूनसाठीचे अनुकूल वातावरण १६ जूननंतर असेल. त्यानंतर पावसाची समाधानकारक हजेरी लागेल. - श्रीनिवास औंधकर, संचालक, खगोलशास्त्र विभाग, एमजीएम, औरंगाबाद

टॅग्स :MarathwadaमराठवाडाRainपाऊसenvironmentपर्यावरण