शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

मराठवाड्यात १७ जूननंतर मान्सून होणार सक्रिय; हवामानातील बदलाने पावसाची दडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 12:33 IST

खरीप हंगामातील पेरणीस सज्ज असलेल्या शेतकऱ्यांना पावसाने दडी दिल्याने आणखी पाच ते सहा दिवस प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे आहेत

औरंगाबाद : मान्सूनपूर्व पावसाने जूनच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. मात्र, खरीप हंगामातील पेरणीस सज्ज असलेल्या शेतकऱ्यांना पावसाने दडी दिल्याने आणखी पाच ते सहा दिवस प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे आहेत. 

यंदाच्या मोसमात ९७ टक्के पावसाचा अंदाज स्कायमेटसह भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यातच नियोजित वेळेप्रमाणे मान्सून अंदमान, निकोबारमार्गे देशात दाखल झाला. मराठवाड्यासह काही भागांत मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरीही लावली. मान्सून वेळेत दाखल होण्याची शक्यता असतानाच अचानक औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील काही भागात पावसाने दडी मारली. पावसासाठी हवामानातील योग्य बदल होत नसल्याने अनेक ठिकाणी पाऊस लांबला आहे. वातावरणातील बदल आणि पावसासाठी योग्य होणारी परिस्थिती कमकुवत झाल्याने पाऊस लांबला आहे, तर नांदेड, परभणी, हिंगोली, बीड आदी जिल्ह्यांतही १२ ते १६ जून या काळात पावसाची शक्यता कमीच आहे. 

हवामानातील बदलांमुळे या जिल्ह्यांमध्येही १६ जूननंतरच मान्सून खऱ्या अर्थाने मराठवाड्यात सक्रिय होणार असल्याचे हवामानतज्ज्ञांनी सांगितले. मराठवाड्यात काही ठिकाणी कपाशीची लागवड झाली असली तरी सोयाबीन, मूग, तूर, बाजरी आदी पिकांची पेरणी पाऊस लांबल्याने खोळंबली आहे. चांगला पाऊस झाल्यानंतरच पेरणी सुरु करता येणार आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मान्सूनसाठी आठवडाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

चांगला पाऊस असेल तरच पेरणी...पाऊस चांगला असेल तरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी. अन्यथा प्रतीक्षा करावी, असा सल्ला कृषितज्ज्ञांनी दिला आहे. पावसाचे प्रमाण कमी असेल आणि शेतकऱ्यांनी पेरणी केल्यास ती वाया जाण्याची भीती अधिक असते. दुबार पेरणीचे संकट येऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी चांगला पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असे कृषितज्ज्ञांनी  म्हटले आहे. 

सध्या पावसा योग्य वातावरण नाही मराठवाड्यात १० किंवा ११ जून रोजी मान्सून दाखल व्हायला हवा होता. मात्र, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांत पावसायोग्य हवामान नसून, मान्सूनसाठीचे अनुकूल वातावरण १६ जूननंतर असेल. त्यानंतर पावसाची समाधानकारक हजेरी लागेल. - श्रीनिवास औंधकर, संचालक, खगोलशास्त्र विभाग, एमजीएम, औरंगाबाद

टॅग्स :MarathwadaमराठवाडाRainपाऊसenvironmentपर्यावरण