शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

मोदीजी, ९ वर्षांपासून चकरा मारून थकलो,आतातरी शेतीसाठी वीज द्या; शेतकऱ्याचे प्रधानमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 19:31 IST

२०१३ मध्ये भरले होते जोडणीचे पैसे, घायगावचा शेतकरी नऊ वर्षांपासून मारतोय चकरा

- बाळासाहेब धुमाळ 

वैजापूर (औरंगाबाद ) :वीज जोडणी मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या घायगाव येथील शेतकऱ्याने थेट पंतप्रधानांना पत्र पाठवून तक्रार दिली आहे. मी नऊ वर्षांपासून चकरा मारून थकलो, आता तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा असल्याचे त्यात नमूद केले आहे. कोटेशन रक्कम भरूनही एवढ्या वर्षांपासून एका शेतकऱ्याला चकरा माराव्या लागणे यातून महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

घायगाव येथील कृष्णा रुस्तुम धने हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांना २००७-८ या वर्षात शासनाच्या रोजगार हमी योजनेंतर्गत विहीर मिळाली. विहिरीला भरपूर पाणी लागल्याने पाणी उपसा केल्याशिवाय विहिरीचे काम करता येत नव्हते. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी धने यांना विद्युतपुरवठा देण्याबाबत ७ जून २०१३ रोजी कार्यकारी अभियंता कन्नड यांना पत्र दिले. त्यानंतर धने यांनी १० जुलै २०१३ रोजी ५ हजार ३०० रुपये कोटेशन रक्कम जमा केली. मात्र, ९ वर्षे उलटून ही त्यांना वीज कंपनीने वीज जोडणी दिलेली नाही. त्यामुळे त्यांना विहीर पाण्याने भरलेली असूनदेखील तिचा वापर करता येत नाही. त्यामुळे ते मजुरी करतात. ते २०१३ पासून कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. वीज कंपनीच्या एका अधिकाऱ्याने तर आता तू तक्रारी करू नको, अशी धमकी देखील दिली होती. त्यामुळे संतापलेल्या धने यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तक्रार दाखल केली आहे. मला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा असल्याचे त्यात नमूद केले आहे.

जोडणी न दिल्यास आत्मदहन करणारमी महावितरणकडे नऊ वर्षांपासून चकरा मारून थकलो आहे. तरीही मला वीज जोडणी मिळाली नाही. यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. येणाऱ्या नव्वद दिवसांत मला वीज जोडणी दिली नाही तर वैजापूर वीज कंपनीच्या कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे.-कृष्णा धने, शेतकरी, घायगाव

जवाहर रोजगार योजना सध्या सुरू नाही. शेतकरी धने यांनी नवीन वीज जोडणीचा प्रस्ताव सादर करावा. तो वरिष्ठांना पाठवून मंजूर करून घेऊ.-राहुल बिडवे, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, वैजापूर

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीprime ministerपंतप्रधानelectricityवीज