शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

मोदी सरकारने शिष्यवृत्तीमध्ये केली मोठी वाढ; विरोधक करताहेत दिशाभूल - नमिता मुंदडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 7:02 PM

2017 ते २०२० या कालावधीत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्ती करिता दरवर्षी ११०० कोटी रुपये निधी दिला जात होता. आता आगामी पाच वर्षांत दरवर्षी हा निधी ६ हजार कोटी रुपये करण्यात आला आहे.

ठळक मुद्देनिधीतील केंद्र सरकारचा वाटा ६० टक्के असून राज्य सरकारांना ४० टक्के खर्च करावा लागणार आहे कॉंग्रेस प्रणित युपीए सरकारने केवळ राजकारणासाठीच फुले,शाहू, आंबेडकर यांच्या नावाचा वापर केला.

औरंगाबाद: केंद्र सरकारतर्फेशिष्यवृत्ती बंद करण्याचे षडयंत्र असल्याचे दर्शवून नागपुरात विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ सुखदेव थोरात यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा फार्स करण्यात आला होता. कॉंग्रेस धुरिणांची मर्जी राखण्यासाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची नाहक दिशाभूल करण्याचा डाव आखला गेला होता अशी टिका आज येथे केजच्या भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांनी पत्रकार परिषदेत केला.

त्यांनी सांगितले की, अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षण शिष्यवृत्तीच्या निधीमध्ये ५९ हजार कोटी रुपये अशी भरीव वाढ मोदी सरकारने केली आहे. आतापर्यंत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या पीएमएस - एससी या योजने अंतर्गत उच्च शिक्षणासाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती पुरेशी नव्हती.या शिष्यवृत्तीच्या वितरणातही भ्रष्टाचाराच्या तक्रारी होत्या. केंद्रीय मंत्रीमंडळाने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती निधीमध्ये गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत सर्वोच्च वाढ केली आहे. शिष्यवृत्तीचे वाटप पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी विद्यार्थ्यांची पात्रता, आधार ओळखपत्र, जातीचे प्रमाणपत्र व बॅंकेचे तपशील पडताळून ऑनलाईन पद्धतीने निधीचे वितरण करण्यात येणार आहे.

2017 ते २०२० या कालावधीत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्ती करिता दरवर्षी ११०० कोटी रुपये निधी दिला जात होता. आता आगामी पाच वर्षांत दरवर्षी हा निधी ६ हजार कोटी रुपये करण्यात आला आहे.या निधीतील केंद्र सरकारचा वाटा ६० टक्के असून राज्य सरकारांना ४० टक्के खर्च करावा लागणार आहे, अशी माहिती देत नमिता मुंदडा यांनी तत्कालीन युपीए सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या,पीएमएस-एससी योजनेच्या निधीत यापूर्वीच अशी वाढ करणे अपेक्षित होते.मात्र कॉंग्रेस प्रणित युपीए सरकारने केवळ राजकारणासाठीच फुले,शाहू, आंबेडकर यांच्या नावाचा वापर केला. दहावीनंतर पैशाअभावी ज्यांना उच्च शिक्षण घेता येत नाही,अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. विद्यार्थ्यांनी तो घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. पत्रपरिषदेस जालिंदर शेंडगे, पंकज भारसाकळे, राजू शिंदे,बबन‌ नरवडे, चंद्रकांत हिवराळे, अमृता पालोदकर, आशा शेरखाने,राम बुधवंत आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीAurangabadऔरंगाबादCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी