शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

डीपी,कॉल,हार्ट एमोजीचा अर्थ काय?; नवरा-बायकोमधील संबंध ताणण्यामागे ‘मोबाइल’ हेच कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 14:10 IST

संयमाचा व तडजोडीचा अभाव असल्यामुळेही भांडणे विकोपास जात आहेत.

-स. सो. खंडाळकरऔरंगाबाद : हल्ली मोबाइलवरून नवरा-बायकोंमधील संबंध टोकाला जात असून, एकमेकांना घटस्फोट देण्यापर्यंत मजल चालली आहे. शासनाच्या ‘चला बोलू या’ या उपक्रमांतर्गत आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात १५५ प्रकरणांमध्ये यशस्वी तडजोड झाली असल्याची माहिती या उपक्रमाचे विषयतज्ज्ञ प्राचार्य डॉ. अशोक वाकोडकर यांनी दिली.

नात्यातील समजूतदारपणाला प्रेरणा देणारे हे समुपदेशन केंद्र असून, ते मोफत चालवले जाते. किरकोळ कारणांनी कौटुंबिक प्रकरण न्यायप्रविष्ट होणार नाही; त्यामुळे न्यायव्यवस्थेवरचा ताण कमी होईल. पक्षकारांचा वेळेचा व पैशांचा अपव्यय टळेल. दुभंगणाऱ्या संसाराला सांधणारा दुवा म्हणून या केंद्राकडे पाहिले जात आहे. जिल्हा न्यायालय परिसरातील विधिसेवा प्राधिकरणात हे केंद्र सुरू आहे. दि. ५ ऑगस्ट २०१८ रोजी या केंद्राची स्थापना झाली. राज्यात आता अशी नऊ केंद्रे कार्यान्वित झाली आहेत. २० ते २५ प्रकारच्या कारणांवरून निर्माण झालेल्या वादांवर या केंद्रात समुपदेशन केले जाते. सध्या मोबाइल हे कारण भांडणाचे मूळ ठरत चालले आहे.

डीपीवर फोटो का ठेवला, माहेरी फोनवर अधिक वेळ का बोलते, व्हॉटस्ॲपवर हार्ट चिन्ह आले, याचा अर्थ काय, पती घरखर्चाला पैसे देत नाही यावरून नवरा-बायकोंमध्ये नेहमीच गैरसमज होतात, वाद होतात, असे वाकोडकर यांनी सांगितले. ते म्हणाले, विवाहविषयक प्रकरणे अधिक आहेत. ती घटस्फोटाच्या उंबरठ्यापर्यंत जातात. पोलिस आयुक्तालयातील भरोसा सेल व पोलिस अधीक्षकांकडून काही प्रकरणे येतात. प्रसिद्धी माध्यमातून प्रकरणे पुढे येतात. अहंकार व व्यसनाधीनतेमुळेही संबंध ताणले जातात. संयमाचा व तडजोडीचा अभाव असल्यामुळेही भांडणे विकोपास जात आहेत. प्रेमविवाह हीसुद्धा मोठी अडचण ठरत आहे. जीवनशैली बदलत आहे. दोघांचीही नोकरी.... तीही बारा-बारा तासांची नोकरी करते. त्यात तासनतास प्रवास, ट्रॅफिक... या आणि अशा कारणांमुळे दोघेही वैतागतात. घरी आल्यावर उत्साह राहत नाही. परस्परांवर चिडतात. हे सर्व मुलांसमोर घडते. त्यांच्या मनांवरही विपरीत परिणाम होतो. नोकरी करणारी महिला हाऊसवाईफसारखी अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. यातूनच पती-पत्नीमध्ये ताणतणाव निर्माण होतात. अशीही प्रकरणे या समुपदेशन केंद्रात येतात.

टॅग्स :marriageलग्नAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीMobileमोबाइल