शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

डीपी,कॉल,हार्ट एमोजीचा अर्थ काय?; नवरा-बायकोमधील संबंध ताणण्यामागे ‘मोबाइल’ हेच कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 14:10 IST

संयमाचा व तडजोडीचा अभाव असल्यामुळेही भांडणे विकोपास जात आहेत.

-स. सो. खंडाळकरऔरंगाबाद : हल्ली मोबाइलवरून नवरा-बायकोंमधील संबंध टोकाला जात असून, एकमेकांना घटस्फोट देण्यापर्यंत मजल चालली आहे. शासनाच्या ‘चला बोलू या’ या उपक्रमांतर्गत आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात १५५ प्रकरणांमध्ये यशस्वी तडजोड झाली असल्याची माहिती या उपक्रमाचे विषयतज्ज्ञ प्राचार्य डॉ. अशोक वाकोडकर यांनी दिली.

नात्यातील समजूतदारपणाला प्रेरणा देणारे हे समुपदेशन केंद्र असून, ते मोफत चालवले जाते. किरकोळ कारणांनी कौटुंबिक प्रकरण न्यायप्रविष्ट होणार नाही; त्यामुळे न्यायव्यवस्थेवरचा ताण कमी होईल. पक्षकारांचा वेळेचा व पैशांचा अपव्यय टळेल. दुभंगणाऱ्या संसाराला सांधणारा दुवा म्हणून या केंद्राकडे पाहिले जात आहे. जिल्हा न्यायालय परिसरातील विधिसेवा प्राधिकरणात हे केंद्र सुरू आहे. दि. ५ ऑगस्ट २०१८ रोजी या केंद्राची स्थापना झाली. राज्यात आता अशी नऊ केंद्रे कार्यान्वित झाली आहेत. २० ते २५ प्रकारच्या कारणांवरून निर्माण झालेल्या वादांवर या केंद्रात समुपदेशन केले जाते. सध्या मोबाइल हे कारण भांडणाचे मूळ ठरत चालले आहे.

डीपीवर फोटो का ठेवला, माहेरी फोनवर अधिक वेळ का बोलते, व्हॉटस्ॲपवर हार्ट चिन्ह आले, याचा अर्थ काय, पती घरखर्चाला पैसे देत नाही यावरून नवरा-बायकोंमध्ये नेहमीच गैरसमज होतात, वाद होतात, असे वाकोडकर यांनी सांगितले. ते म्हणाले, विवाहविषयक प्रकरणे अधिक आहेत. ती घटस्फोटाच्या उंबरठ्यापर्यंत जातात. पोलिस आयुक्तालयातील भरोसा सेल व पोलिस अधीक्षकांकडून काही प्रकरणे येतात. प्रसिद्धी माध्यमातून प्रकरणे पुढे येतात. अहंकार व व्यसनाधीनतेमुळेही संबंध ताणले जातात. संयमाचा व तडजोडीचा अभाव असल्यामुळेही भांडणे विकोपास जात आहेत. प्रेमविवाह हीसुद्धा मोठी अडचण ठरत आहे. जीवनशैली बदलत आहे. दोघांचीही नोकरी.... तीही बारा-बारा तासांची नोकरी करते. त्यात तासनतास प्रवास, ट्रॅफिक... या आणि अशा कारणांमुळे दोघेही वैतागतात. घरी आल्यावर उत्साह राहत नाही. परस्परांवर चिडतात. हे सर्व मुलांसमोर घडते. त्यांच्या मनांवरही विपरीत परिणाम होतो. नोकरी करणारी महिला हाऊसवाईफसारखी अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. यातूनच पती-पत्नीमध्ये ताणतणाव निर्माण होतात. अशीही प्रकरणे या समुपदेशन केंद्रात येतात.

टॅग्स :marriageलग्नAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीMobileमोबाइल