शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

डीपी,कॉल,हार्ट एमोजीचा अर्थ काय?; नवरा-बायकोमधील संबंध ताणण्यामागे ‘मोबाइल’ हेच कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 14:10 IST

संयमाचा व तडजोडीचा अभाव असल्यामुळेही भांडणे विकोपास जात आहेत.

-स. सो. खंडाळकरऔरंगाबाद : हल्ली मोबाइलवरून नवरा-बायकोंमधील संबंध टोकाला जात असून, एकमेकांना घटस्फोट देण्यापर्यंत मजल चालली आहे. शासनाच्या ‘चला बोलू या’ या उपक्रमांतर्गत आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात १५५ प्रकरणांमध्ये यशस्वी तडजोड झाली असल्याची माहिती या उपक्रमाचे विषयतज्ज्ञ प्राचार्य डॉ. अशोक वाकोडकर यांनी दिली.

नात्यातील समजूतदारपणाला प्रेरणा देणारे हे समुपदेशन केंद्र असून, ते मोफत चालवले जाते. किरकोळ कारणांनी कौटुंबिक प्रकरण न्यायप्रविष्ट होणार नाही; त्यामुळे न्यायव्यवस्थेवरचा ताण कमी होईल. पक्षकारांचा वेळेचा व पैशांचा अपव्यय टळेल. दुभंगणाऱ्या संसाराला सांधणारा दुवा म्हणून या केंद्राकडे पाहिले जात आहे. जिल्हा न्यायालय परिसरातील विधिसेवा प्राधिकरणात हे केंद्र सुरू आहे. दि. ५ ऑगस्ट २०१८ रोजी या केंद्राची स्थापना झाली. राज्यात आता अशी नऊ केंद्रे कार्यान्वित झाली आहेत. २० ते २५ प्रकारच्या कारणांवरून निर्माण झालेल्या वादांवर या केंद्रात समुपदेशन केले जाते. सध्या मोबाइल हे कारण भांडणाचे मूळ ठरत चालले आहे.

डीपीवर फोटो का ठेवला, माहेरी फोनवर अधिक वेळ का बोलते, व्हॉटस्ॲपवर हार्ट चिन्ह आले, याचा अर्थ काय, पती घरखर्चाला पैसे देत नाही यावरून नवरा-बायकोंमध्ये नेहमीच गैरसमज होतात, वाद होतात, असे वाकोडकर यांनी सांगितले. ते म्हणाले, विवाहविषयक प्रकरणे अधिक आहेत. ती घटस्फोटाच्या उंबरठ्यापर्यंत जातात. पोलिस आयुक्तालयातील भरोसा सेल व पोलिस अधीक्षकांकडून काही प्रकरणे येतात. प्रसिद्धी माध्यमातून प्रकरणे पुढे येतात. अहंकार व व्यसनाधीनतेमुळेही संबंध ताणले जातात. संयमाचा व तडजोडीचा अभाव असल्यामुळेही भांडणे विकोपास जात आहेत. प्रेमविवाह हीसुद्धा मोठी अडचण ठरत आहे. जीवनशैली बदलत आहे. दोघांचीही नोकरी.... तीही बारा-बारा तासांची नोकरी करते. त्यात तासनतास प्रवास, ट्रॅफिक... या आणि अशा कारणांमुळे दोघेही वैतागतात. घरी आल्यावर उत्साह राहत नाही. परस्परांवर चिडतात. हे सर्व मुलांसमोर घडते. त्यांच्या मनांवरही विपरीत परिणाम होतो. नोकरी करणारी महिला हाऊसवाईफसारखी अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. यातूनच पती-पत्नीमध्ये ताणतणाव निर्माण होतात. अशीही प्रकरणे या समुपदेशन केंद्रात येतात.

टॅग्स :marriageलग्नAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीMobileमोबाइल