शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद मनपा निवडणुकीत मनसे-भाजप युतीची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 15:14 IST

भाजपच्या विरोधातील प्रश्नांवर त्यांची भूमिका मवाळ झाल्याने दोन्ही पक्षांमध्ये जवळीक वाढत असल्याची चर्चा आहे. 

ठळक मुद्देठाकरे हे दोन दिवसांपासून मिशन औरंगाबादच्या निमित्ताने शहरात आहेत. मुद्दा नवा नसतो, तो सुरूच असतो.

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीत मनसे आणि भाजपची युती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी याबाबत शुक्रवारी येथे स्पष्टीकरण दिले नाही. मात्र, भाजपच्या विरोधातील प्रश्नांवर त्यांची भूमिका मवाळ झाल्याने दोन्ही पक्षांमध्ये जवळीक वाढत असल्याची चर्चा आहे. 

ठाकरे हे दोन दिवसांपासून मिशन औरंगाबादच्या निमित्ताने शहरात आहेत. संघटना, निवडणुका, नवीन कार्यकर्त्यांचे पक्ष प्रवेश यात व्यस्त असून, नव्याने संघटना बांधण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. इतर पक्षातील प्रस्थापित पदाधिकाऱ्यांनी मनसेत प्रवेश करण्याची तयारी दर्शविली. त्यांनी ठाकरे यांची भेटही घेतली; परंतु पक्षात नवीन कार्यकर्ते घ्यावेत, जुन्यांना डावलून इतर पक्षातील प्रस्थापिताना घेतले तर संकल्पनेतील संघटना उभी राहणार नाही. असे सांगून ठाकरे यांनी चार ते पाच जणांना पक्षात प्रवेश दिला. उर्वरित कार्यकर्त्यांना त्यांनी वेटिंगवर ठेवले आहे. 

राज यांच्या आगमनाप्रीत्यर्थ लावलेल्या होर्डिंग्जवर त्यांच्या नावासमोर ‘हिंदूजननायक’ असा उल्लेख आहे. या उपाधीबद्दल प्रश्न विचारताच राज ठाकरे काहीसे संतापलेले दिसले. यावर प्रश्न विचारताच त्यांनी थेट हात जोडले. ‘मी असं काही मानत नाही. याआधी माझ्या नावापुढे हिंदुहृदयसम्राट अशी उपाधी लावण्यात आली होती. त्यावेळीही मी असे काही करू नये, अशी ताकीद दिली होती,’ याची आठवण राज यांनी करून दिली. 

हिंदुत्वाचा मुद्दा तसं तर मुळात जनसंघाचा आहे. मुद्दा नवा नसतो, तो सुरूच असतो. फक्त कोण तो कशाप्रकारे मांडतो आणि कसा पुढे नेतो, हे महत्त्वाचे असल्याचे  ते म्हणाले. जे लोक आपल्या भूमिकांना मुरड घालून सत्तेत गेले, त्यांना याबाबत सडेतोडपणे का विचारले जात नाही, असा प्रश्नही ठाकरे यांनी उपस्थित केला. झेंड्याची नोंदणी चार वर्षांपूर्वी केली होती, त्याचे अधिकृत अनावरण फक्त आता केल्याचे राज यांनी सांगितले. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक हिंदुत्वाकडे वाटचाल करीत असताना शिवसेनेचे मुद्दे हायजॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. औरंगाबाद दौऱ्यावर ठाकरे येणार असल्यामुळे जिल्ह्याचे ‘संभाजीनगर’नामकरणाची मागणी मनसे आ. राजू पाटील यांनी केली होती.  ठाकरे यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी संभाजीनगर असा उल्लेख असणाऱ्या बॅनर्सबाबत ठाकरे यांनी ‘नाव बदलल्यास हरकत काय’ असा उलट प्रश्न उपस्थित केला. चांगले बदल व्हायला हवेत, असेही ते म्हणाले. 

मुख्यमंत्री सरप्राईज देतीलदरम्यान शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दावा केला की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामकरण करून लवकरच सरप्राईज देतील. 

टॅग्स :BJPभाजपाMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूकAurangabadऔरंगाबाद