शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

औरंगाबाद मनपा निवडणुकीत मनसे-भाजप युतीची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 15:14 IST

भाजपच्या विरोधातील प्रश्नांवर त्यांची भूमिका मवाळ झाल्याने दोन्ही पक्षांमध्ये जवळीक वाढत असल्याची चर्चा आहे. 

ठळक मुद्देठाकरे हे दोन दिवसांपासून मिशन औरंगाबादच्या निमित्ताने शहरात आहेत. मुद्दा नवा नसतो, तो सुरूच असतो.

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीत मनसे आणि भाजपची युती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी याबाबत शुक्रवारी येथे स्पष्टीकरण दिले नाही. मात्र, भाजपच्या विरोधातील प्रश्नांवर त्यांची भूमिका मवाळ झाल्याने दोन्ही पक्षांमध्ये जवळीक वाढत असल्याची चर्चा आहे. 

ठाकरे हे दोन दिवसांपासून मिशन औरंगाबादच्या निमित्ताने शहरात आहेत. संघटना, निवडणुका, नवीन कार्यकर्त्यांचे पक्ष प्रवेश यात व्यस्त असून, नव्याने संघटना बांधण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. इतर पक्षातील प्रस्थापित पदाधिकाऱ्यांनी मनसेत प्रवेश करण्याची तयारी दर्शविली. त्यांनी ठाकरे यांची भेटही घेतली; परंतु पक्षात नवीन कार्यकर्ते घ्यावेत, जुन्यांना डावलून इतर पक्षातील प्रस्थापिताना घेतले तर संकल्पनेतील संघटना उभी राहणार नाही. असे सांगून ठाकरे यांनी चार ते पाच जणांना पक्षात प्रवेश दिला. उर्वरित कार्यकर्त्यांना त्यांनी वेटिंगवर ठेवले आहे. 

राज यांच्या आगमनाप्रीत्यर्थ लावलेल्या होर्डिंग्जवर त्यांच्या नावासमोर ‘हिंदूजननायक’ असा उल्लेख आहे. या उपाधीबद्दल प्रश्न विचारताच राज ठाकरे काहीसे संतापलेले दिसले. यावर प्रश्न विचारताच त्यांनी थेट हात जोडले. ‘मी असं काही मानत नाही. याआधी माझ्या नावापुढे हिंदुहृदयसम्राट अशी उपाधी लावण्यात आली होती. त्यावेळीही मी असे काही करू नये, अशी ताकीद दिली होती,’ याची आठवण राज यांनी करून दिली. 

हिंदुत्वाचा मुद्दा तसं तर मुळात जनसंघाचा आहे. मुद्दा नवा नसतो, तो सुरूच असतो. फक्त कोण तो कशाप्रकारे मांडतो आणि कसा पुढे नेतो, हे महत्त्वाचे असल्याचे  ते म्हणाले. जे लोक आपल्या भूमिकांना मुरड घालून सत्तेत गेले, त्यांना याबाबत सडेतोडपणे का विचारले जात नाही, असा प्रश्नही ठाकरे यांनी उपस्थित केला. झेंड्याची नोंदणी चार वर्षांपूर्वी केली होती, त्याचे अधिकृत अनावरण फक्त आता केल्याचे राज यांनी सांगितले. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक हिंदुत्वाकडे वाटचाल करीत असताना शिवसेनेचे मुद्दे हायजॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. औरंगाबाद दौऱ्यावर ठाकरे येणार असल्यामुळे जिल्ह्याचे ‘संभाजीनगर’नामकरणाची मागणी मनसे आ. राजू पाटील यांनी केली होती.  ठाकरे यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी संभाजीनगर असा उल्लेख असणाऱ्या बॅनर्सबाबत ठाकरे यांनी ‘नाव बदलल्यास हरकत काय’ असा उलट प्रश्न उपस्थित केला. चांगले बदल व्हायला हवेत, असेही ते म्हणाले. 

मुख्यमंत्री सरप्राईज देतीलदरम्यान शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दावा केला की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामकरण करून लवकरच सरप्राईज देतील. 

टॅग्स :BJPभाजपाMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूकAurangabadऔरंगाबाद