शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात संजय शिरसाट यांनी बांधली बंडखोरांची ‘मोट’, सेना नेते खैरेंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 14:33 IST

बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांनी घरगुती कामांसह दिवाळीला भेटवस्तू देत मतदारसंघातील कामांना कोट्यवधींचा निधी देऊन आमदारांना आपलेसे केले

औरंगाबाद : जिल्ह्यातील आमदारांच्या बंडखोरीचे सूत्रधार आ. संजय शिरसाट असून त्यांनीच पाच आमदारांची बंडखोरीसाठी ‘मोट’ बांधल्याचा खळबळजनक दावा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांनी घरगुती कामांसह दिवाळीला भेटवस्तू देत मतदारसंघातील कामांना कोट्यवधींचा निधी देऊन आमदारांना आपलेसे केल्याचेही खैरेंनी नमूद केले. यावेळी कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूतदेखील उपस्थित होते. त्यांनी मुंबईतून कसा निसटून मतदारसंघात आलो याचे अनुभव कथन करीत त्यांनी शिंदे गटात सामील होण्यासाठी ५० कोटींची ऑफर असल्याचा गौप्यस्फोट केला.

खैरे म्हणाले, जिल्ह्यातील सहापैकी पाच आमदारांनी गद्दारी केली आहे. या सगळ्यांचे विधान परिषद निवडणुकीनंतर मुंबईत ‘गुलूगुलू’ सुरू होते. माझ्यासमोर एकेक मिनिटांमध्ये कोपऱ्यात बोलून यांचा प्लान झाल्याची चर्चा सुरू होती. हा प्रकार मी मातोश्रीच्या कानावर घातला होता, असा दावा त्यांनी केला. खैरे म्हणाले, शिरसाट १९९१ सालीही बंड करून काँग्रेसमध्ये गेले होते, पण पुन्हा शिवसेनेत येऊन सर्व काही मिळविले. आता पुन्हा गद्दारी केली. प्रदीप जैस्वाल यांनीही याआधी शिवसेना सोडली होती. जैस्वाल यांना महापौरपद, खासदारकी दिली. त्यांच्या लोकसभा निवडणुकीवेळी मी पालकमंत्री होतो, त्यांच्या निवडणुकीचा सर्व खर्च मीच केला होता. लोकसभेत बजेट सुरू असताना ते महापालिकेत ठाण मांडून बसायचे, त्यांचा पराभव झाला. अडीच वर्षांपासून ते घर आणि लॉन व्यतिरिक्त भूमिपूजनाला कुदळ मारण्यापलीकडे कुठे दिसत नाहीत.भुमरेेंना पाच वेळा निवडून आणले. त्यांना उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्रिपद दिले, पण तेही शिंदे गटात सहभागी झाले. हे दु:खदायक आहे. त्यांना १९९५ साली मीच उमेदवारी मिळवून दिली होती, असे खैरे म्हणाले. वैजापूरचे आ. बोरनारे, सिल्लोडचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरही खैरे यांनी टीका केली. पण सोबत अजूनही या आमदारांनी मातोश्रीवर जाऊन चूक झाली, असे सांगावे, त्यांना माफ केले जाईल, असा दावाही खैरे यांनी केला.

युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एक दगड उचलावायुवा सेनेत शिवसेनेतील सर्व पदाधिकारी, नेत्यांची मुले प्रमुख पदावर आहेत. त्यांच्या मुलांनी बंडखोरांच्या कार्यालयांवर हल्ला करण्यासाठी एक दगड उचलावा, आम्ही दोन दगड उचलू, अशी भावना एका पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पत्रकार परिषदेनंतर व्यक्त केली.

मला ५० कोटींची ऑफर- राजपूतमला कुणकुण लागली होती. मी थेट औरंगाबादकडे निघालो होतो. माझा मोबाइल बंद केला होता. शिंदे गटाकडून काहीही संपर्क झाल्याबाबत मी कुणाचेही नाव घेऊ इच्छित नाही. मला ५० कोटींची ऑफर होती, पण मला गद्दार म्हणून जगायचे नाही. मी जर आमदार झालो नसतो तर या बॅगा देण्याचे आमिष दाखवलेच नसते, असे आ. राजपूत यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Sanjay Sirsatसंजय सिरसाटShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेAurangabadऔरंगाबादChandrakant Khaireचंद्रकांत खैरेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ