शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
4
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
5
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
6
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
7
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
8
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
9
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
10
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
11
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
12
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
13
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
14
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
15
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
16
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
17
रायगड बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ३ मच्छिमारांचे मृतदेह सापडले!
18
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
19
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
20
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

BE, BTech प्रवेशासाठी आवडीचे काॅलेज; अभ्यासक्रमाचे पर्याय देण्याची प्रक्रिया सुरू

By योगेश पायघन | Updated: October 13, 2022 12:55 IST

Mission Admission: अंतिम गुणवत्ता यादी जाहीर, १३ ते १५ ऑक्टोबर लॉगिनद्वारे भरा पहिल्या फेरीसाठी पर्याय

औरंगाबाद : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाची (सीईटी सेल) बी.ई., बी.टेक. या चार वर्षांच्या आणि मास्टर्स ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नाॅलाॅजी या इंटिग्रेटेड पाच वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी गुणवत्ता यादी आणि श्रेणीनिहाय जागावाटप बुधवारी जाहीर झाले. राज्य यादीत १ लाख २३ हजार २८८ विद्यार्थ्यांचा, तर १ लाख २९ हजार २८६ विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया यादीत समावेश आहे.

राज्यभरातून बीई, बी.टेक, प्रवेशासाठी १ लाख २९ हजार ६१२ अर्ज निश्चिती सुविधा केंद्रात केली होती. ७ हजार ४३४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. मात्र, अर्ज पूर्ण भरले नाहीत. ६ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले; मात्र अर्ज निश्चिती केली नाही. त्यापैकी ५३ अर्ज रद्द करण्यात आल्याचे सीईटी सेलकडून सांगण्यात आले. अंतिम गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना १३ ते १५ ऑक्टोबर दरम्यान उमेदवाराच्या लॉगिनद्वारे कॅप एक राऊंडसाठी पर्याय अर्जाचे ऑनलाइन भरणे आणि निश्चितीकरण करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. १८ ऑक्टोबरला कॅप-१ राऊंडसाठी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर १९ ते २१ ऑक्टोबरदरम्यान दुपारी तीन वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगीनमधून महाविद्यालय आणि अभ्यासक्रम निवडून २१ ऑक्टोबर सायंकाळी पाचपर्यंत जागा अलाॅटमेंट झालेल्या महाविद्यालयात जाऊन रिपोर्ट करावा लागणार आहे.

दुसरी व तिसरी फेरीदुसऱ्या कॅप राऊंडसाठी २२ ऑक्टोबरला गुणवत्ता यादी जाहीर होईल. २३ ते २६ ऑक्टोबर पर्याय भरून अर्ज निश्चितीची प्रक्रिया आहे. ३० ऑक्टोबरपर्यंत महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश निश्चित करावा लागेल. १ नोव्हेंबर रोजी तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी प्रसिद्ध होईल. २ ते ४ नोव्हेंबर पर्याय भरणे, तर ६ नोव्हेंबर अलॉटमेंट जाहीर होईल. ७ ते ९ नोव्हेंबर महाविद्यालयात प्रवेश निश्चिती करावी लागेल.

संस्था स्तरावरील प्रवेश १० ते १७ नोव्हेंबरसंस्था स्तरावरील प्रवेशासाठी म्हणजेच १० ते १७ नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया केली जाईल. रिक्त जागा आणि रिक्त अभ्यासक्रमांसाठी ही अंतिम फेरी असेल. १ नोव्हेंबरपासून नियमित शिकविणे सुरू होईल.

एमई एम टेक.साठी २७७७ अर्जएम.ई. एम. टेक.साठी २७७७ अर्ज सुविधा केंद्रातून निश्चित करण्यात आले. ३११ जणांनी पूर्ण अर्ज भरले मात्र, सुविधा केंद्रात अर्ज निश्चिती केली नाही. ९६१ जणांनी नोंदणी केली; परंतु अर्ज पूर्ण भरलेला नाही. शुक्रवारी २१२१ विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली.

२० हजार ६२५ अडचणींचे निराकरणराज्यभरातून ११ ऑक्टोबरपर्यंत १ हजार ३६३ ईमेल तर फोनद्वारे १९ हजार १६२ अशा २० हजार ६२५ अडचणी राज्य सीईटी सेलकडे मांडण्यात आल्या. त्यांचे निराकरण करण्यात आल्याचे सीईटी सेलकडून सांगण्यात आले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षण