शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

डेडलाइन हुकली! अतिवृष्टीग्रस्त ५३ टक्के शेतकऱ्यांनाच मार्चअखेरपर्यंत मदत

By विकास राऊत | Updated: April 1, 2023 15:22 IST

 ४७ टक्के शेतकऱ्यांना कधी मिळणार नुकसानभरपाई ?

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात सप्टेंबर-ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत १२ लाख ६८ हजार ८ शेतकऱ्यांचे ८ लाख ५७ हजार ३२ हेक्टर क्षेत्रावरील पीक वाया गेले. बाधित शेतकऱ्यांना शासन स्वत:च्या सॉफ्टवेअरद्वारे ३१ मार्चपर्यंत मदत वितरित करील, असे जाहीर करण्यात आले होते; परंतु शुक्रवारपर्यंत केवळ ५३ टक्के शेतकऱ्यांच्याच बँक खात्यावर अतिवृष्टीची मदत जमा झाल्याने शासनाची डेडलाइन हुकली आहे.

त्यातच शासनाने ५० हजारांपेक्षा अधिक नुकसान मदतीबाबत पुन:तपासणीचे आदेश दिल्याने वाटप लांबण्याची शक्यता आहे. शुक्रवार सायंकाळपर्यंत ५ लाख ९५ हजार १४९ बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा झाली आहे. दरम्यान, शासनाने एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुपटीने व ३ हेक्टरपर्यंत क्षेत्रासाठी मदत जाहीर केली आहे. त्यामुळे एकाच शेतकऱ्याची दोन वेगवेगळ्या ठिकाणी बागायत शेती, फळबाग असेल तर त्यांच्या नुकसानीची रक्कम एक ते दीड लाखांपर्यंत होत आहे. मात्र, शासनाने ५० हजार रुपयांपर्यंत मदत देण्याचे आदेश दिले आहेत. त्यापेक्षा अधिक मोबदल्याची रक्कम असेल तर त्यांची कागदपत्रे पुन्हा तपासण्यात येत असल्याने शेतकरी मदतीविना राहण्याची शक्यता आहे.

जिल्हानिहाय मदत वितरित....छत्रपती संभाजीनगरमध्ये १ लाख ४१ हजार ३२९ शेतकऱ्यांना १५५ कोटी ५६ लाख ३३ हजार ९०९ रुपयांचे वाटप झाले आहे. जालना जिल्ह्यातील १ लाख ८१ हजार ७७४ शेतकऱ्यांना १८७ कोटी ९० लाख २३ हजार रुपये, हिंगोलीतील २४ हजार ९७५ शेतकऱ्यांना १२ कोटी १९ लाख ५० हजार २५० रुपये, बीड जिल्ह्यातील २ लाख ११ हजार २३ शेतकऱ्यांना २२५ कोटी ५५ लाख ८० हजार ९२५ रुपयांचे, तर लातूर जिल्ह्यातील १० हजार ६५१ शेतकऱ्यांना १४ कोटी ८३ लाख २३ हजार ८२२ रुपयांचे, नांदेड जिल्ह्यातील २५ हजार ३९७ शेतकऱ्यांना १३ कोटी ०२ लाख ६० हजार रुपयांचे वाटप ३१ मार्चपर्यंत झाले आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसMarathwadaमराठवाडाagricultureशेती