शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

मुंडे भगिनींसह मंत्री, आमदारांची पाणी प्रश्नावरील सर्वपक्षीय बैठकीकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 12:35 IST

आठ दिवसांपूर्वीच भाजपने मराठवाडा पाणी प्रश्नासाठी केले होते आंदोलन 

ठळक मुद्देपाण्याचे राजकारण लोकप्रतिनिधींची गैरहजेरी; विद्यार्थ्यांचा गदारोळ

औरंगाबाद : मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासह वॉटरग्रीड योजनेचे काम सुरू ठेवण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना निमंत्रित करून बोलावलेल्या ‘सर्वपक्षीय बैठकीला’ ३६ आमदार आणि सर्व खासदारांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली. परिषदेला ४६ पैकी १० आमदार हजर होते. 

२७ जानेवारी रोजी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नाबाबत सरकारकडून अपेक्षा असल्याचे सांगत माजी मंत्री पंकजा मुंडे, खा. प्रीतम मुंडे, आ. नमिता मुंदडा, सुरेश धस यांच्यासह भाजपच्या सर्व स्थानिक लोकप्रतिनिधींनी लाक्षणिक उपोषण केले होते. यापैकी बहुतांश लोकप्रतिनिधींनी आ. प्रशांत बंब यांनी रविवारी बोलाविलेल्या बैठकीला हजेरी लावली नाही. जालना रोडवरील एका हॉटेलमध्ये आ. बंब यांनी जि.प. अध्यक्ष, महापौरांसह सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रित केले होते. केवळ १० आमदार बैठकीला आल्याने बैठक उशिरा सुरू झाली. पाच वेळा निमंत्रण पाठवूनही अनेकांनी बैठकीला दांडी मारली. मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर महाविकास आघाडीविरुद्ध भाजप असे राजकारण सुरू झाल्याचे यातून दिसते आहे. 

शिवसेनेचे आ. संजय शिरसाट वगळता उर्वरित आमदार भाजपचेच होते. त्यातही आ. शिरसाट बैठक अर्ध्यावर सोडून निघून गेले. आ. बंब यांच्यासह आ. हरिभाऊ बागडे, आ. सुजितसिंग ठाकूर, आ. अतुल सावे, आ. मेघना बोर्डीकर, आ. संतोष दानवे, आ. राजेश पवार, आ. अभिमन्यू पवार, आ. राम पाटील रातोळीकर, औरंगाबाद जि.प.च्या अध्यक्षा मीना शेळके यांची उपस्थिती होती.

लोकप्रतिनिधींची गैरहजेरी; विद्यार्थ्यांचा गदारोळ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विद्यार्थी सर्वपक्षीय बैठकीला आले होते. लोकप्रतिनिधींची गैरहजेरी निदर्शनास येताच विद्यार्थ्यांनी गदारोळ सुरू केला. पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर लोकप्रतिनिधी एकत्र येत नसल्याने त्यांनी गैरहजर लोकप्रतिनिधींचा निषेध केला. आ. शिरसाट बैठकीतून बाहेर पडल्यानंतर विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. अजय पवार, विकास थाले, दीक्षा पवार या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात पाण्याअभावी शेतकऱ्यांच्या आत्महत्या, धरणातील पाणी परिस्थितीकडे लक्ष वेधले, तसेच टेंभापुरी प्रकल्पाच्या मुद्यावरून आ. बंब यांनादेखील विद्यार्थ्यांनी टोला मारला. सलग तीन निवडणुका आ. बंब याच मुद्यावर जिंकत आल्याचे विद्यार्थी म्हणाले. उद्योगांना २४ तास पाणी मिळते, आणि शेतीला पाणी मिळत नाही. शेतकºयांच्या यातना कोण समजून घेणार, मागच्या सरकारनेदेखील काही केले नाही आणि विद्यमान सरकार योजना बंद पाडत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. 

टॅग्स :MarathwadaमराठवाडाWaterपाणीMLAआमदारMember of parliamentखासदार