शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
2
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
3
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
4
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
5
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
6
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
7
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
8
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
9
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
10
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
11
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
12
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
13
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
14
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
15
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
16
Ganesh Visarjan 2025: बाप्पा दीड दिवसांतच का चालला? असं चिमुकल्यांनी विचारलं, तर द्या 'हे' शास्त्रोक्त उत्तर!
17
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
18
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
19
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
20
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम

मंत्र्यांच्या निर्देशाने ‘नॅक’ मूल्यांकनास मुदतवाढ; प्रवेश रोखलेल्या २३३ महाविद्यालयांमध्ये होणार प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 12:09 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने तब्बल २३३ महाविद्यालयांवर कारवाई केली होती.

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील ज्या महाविद्यालयांनी ‘नॅक’ मूल्यांकन केलेले नाही. त्या महाविद्यालयांमध्ये नवीन प्रवेश थांबविण्याचा निर्णय विद्यापीठांनी घेतला होता. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने तब्बल २३३ महाविद्यालयांवर कारवाई केली होती. मात्र, राज्याचे उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी २१ मे रोजी झालेल्या बैठकीत ‘नॅक’ करण्यासाठी महाविद्यालयांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचे निर्देश दिले. त्यामुळे कारवाई केलेल्या महाविद्यालयांना दिलासा मिळाला आहे. या महाविद्यालयांमध्ये आता प्रवेश होतील.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयांनी ‘नॅक’ मूल्यांकन करून घेणे बंधनकारक केलेले आहे. त्यासाठी विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार ‘नॅक’ न केलेल्या महाविद्यालयातील प्रवेश रोखण्याचे आदेशही उच्च शिक्षण विभागाने विद्यापीठांना दिले होते. त्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासह राज्यातील अनेक विद्यापीठांनी ‘नॅक’ मूल्यांकन नसलेल्या महाविद्यालयांवर कारवाईचा बडगा उगारला होता. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने २३३ महाविद्यालयांचे प्रथम वर्षाचे प्रवेश रोखण्याचा निर्णय घेतला. एवढ्या मोठ्या प्रमाणात महाविद्यालयांवर विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच कारवाई करण्यात आली होती. विद्यापीठाशी संलग्न ४८४ पैकी केवळ २५१ महाविद्यालयांमध्येच प्रथम वर्षाचे प्रवेश होणार होते. मात्र, उच्च शिक्षण मंत्र्यांच्या आदेशामुळे यावर पाणी फेरले जाणार आहे.

काय दिले निर्देशराज्याचे उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची २१ मे रोजी बैठक झाली. या बैठकीत नॅक, बंगलोर यांचे मूल्यांकन व पुर्नमूल्यांकनासाठी संस्था नोंदणी पोर्टल कार्यान्वित नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हितास्तव नॅक मूल्यांकन करण्यास महाविद्यालयांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले. त्यानुसार सहा महिन्यांची मुदतवाढ देणारे पत्रच उच्च शिक्षण संचालकांनी राज्यातील सर्वच विद्यापीठांच्या कुलसचिवांना पाठविले आहे. त्याचा परिणाम राज्यातील विविध विद्यापीठांनी महाविद्यालयांवर कारवाईसाठी उचलेले पाऊल मागे घ्यावे लागणार आहे. त्याचा फायदा टपरीछाप महाविद्यालयांची दुकानदारी कायम राहण्यात होणार आहे.

यांना होणार फायदाडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने कार्यक्षेत्रातील चार जिल्ह्यांतील २३३ कॉलेजांना प्रथम वर्षास प्रवेश देण्यास मनाई केली होती. त्यात छत्रपती संभाजीनगरात जिल्ह्यातील सर्वाधिक ८७ महाविद्यालये, बीड ६४, जालना ५१ आणि धाराशिव जिल्ह्यातील ३१ कॉलेजांचा समावेश होता. आता या महाविद्यालयांना फायदा होणार आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादchandrakant patilचंद्रकांत पाटीलEducation Sectorशिक्षण क्षेत्र