शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराने वाचवले लाखो टन लाकूड; स्मशानभूमीत होतोय गट्टूचा वापर सुरू

By मुजीब देवणीकर | Updated: March 18, 2023 16:13 IST

शेतातून जाळण्यायोग्य कचरा खरेदी करून त्यापासून गट्टू तयार केले जातात.

छत्रपती संभाजीनगर : अंत्यसंस्कारासाठी शहरातील विविध स्मशानभूमींमध्ये दरमहा हजारो टन लाकूड लागत होते. आता महापालिकेने एका खासगी कंपनीच्या सहकार्याने पर्यावरणपूरक लाकडी गट्टूचा वापर सुरू केला आहे. २५० ते ३०० किलो लाकडी गट्टूत आता अंत्यसंस्कार होत आहेत. शहरातील १४ स्मशानभूमींमध्ये लाकडी गट्टू वापरले जात आहेत. आणखी चार ठिकाणी लवकरच सुरुवात होणार आहे. राज्यात मुंबई, पुणे या मोठ्या शहरानंतर छत्रपती संभाजीनगर शहराने हा प्रयोग सुरू केला आहे.

अंत्यसंस्कार विधीवतच झाले पाहिजे, यावर आजही नागरिक भर देतात. कोट्यवधी रुपये खर्च करून मनपाने विद्युतदाहिनी सुरू केली. मात्र, त्यात अंत्यसंस्कार करायला नातेवाईक तयारच होत नाहीत. त्यामुळे कैलासनगर येथील विद्युतदाहिनी बंद पडली आहे. लाकूड, शेण्यांचा वापर करूनच अंत्यसंस्कार व्हावेत, याकडे अधिक कल असल्याने या प्रकारामुळे शहरातील विविध स्मशानभूमींमध्ये दरमहा हजारो टन लाकडाचा वापर होत होता. लाखो झाडांची कत्तल करावी लागत होती. यावर केंद्र व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने लाकडी गट्टूचा पर्याय सुचविला. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर महापालिकेने २८ जून २०२२ पासून लाकडी गट्टूचा वापर करून अंत्यसंस्कार करण्यास सुरुवात केली. कोणत्या स्मशानभूमीत वापर? पुष्पनगरी, भीमनगर भावसिंगपुरा, कैलासनगर, मिटमिटा, पडेगाव, एन-६, बेगमपुरा, गादीया विहार, कांचनवाडी, मसनतपूर, मुकुंदवाडी, मुकुंदवाडी गाव आदी ठिकाणी लाकडी गट्टू वापरले जातात.

गट्टूचे दर काय? पंजाब रिनिवल कंपनीकडून लाकडी गट्टूचा पुरवठा प्रत्येक स्मशानभूमीवर स्मशानजोगींना केला जातोय. ७ रुपये ७५ पैसे एका किलोसाठी दर आकारला जातोय. ९० मिमीचा एक गट्टू असतो. अंत्यसंस्कारासाठी लागणारे लोखंडी केजसुद्धा या कंपनीने मोफत तयार करून दिले. आतापर्यंत १६० टन गट्टूचा पुरवठा करण्यात आला. २०२४ नंतर किलोमागे दरवर्षी १ रुपयांची वाढ होणार आहे. मनपाने कंपनीसोबत पाच वर्षांचा करार केला.

लाकूड गट्टूत फरक काय? अंत्यसंस्कार करण्यासाठी पूर्वी ३५० ते ४०० किलो लाकूड लागत होते. आता २५० ते ३०० किलो लाकडी गट्टूत अंत्यसंस्कार होत आहेत. विशेष बाब म्हणजे आता धूर अजिबात होत नाही. प्रदूषण रोखण्यात मनपाची भूमिका महत्त्वाची ठरत आहे.

कसे तयार होतात गट्टूखासगी कंपनीची जिल्ह्यात गट्टू तयार करणारी पाच केंद्रे आहेत. प्रत्येक केंद्राच्या जवळील शेतकऱ्यांच्या शेतातून जाळण्यायोग्य कचरा खरेदी केला जातो. या कचऱ्यापासून गट्टू तयार होतात.

गट्टूचे फायदेलाकडी गट्टूमुळे प्रदूषण रोखण्यात बरीच मदत होईल. शेतकरी त्यांच्या शेतात कचरा जाळून टाकत होते, ते आता थांबेल. यामुळे त्यांच्याकडून होणारे प्रदूषण थांबेल, त्यांना आता कंपनीद्वारे चार पैसेही मिळत आहेत. यामुळे अनेकांना राेजगार मिळाला आहे. डॉ. पारस मंडलेचा, आरोग्य वैद्यकीय अधिकारी.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादenvironmentपर्यावरणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका