शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराने वाचवले लाखो टन लाकूड; स्मशानभूमीत होतोय गट्टूचा वापर सुरू

By मुजीब देवणीकर | Updated: March 18, 2023 16:13 IST

शेतातून जाळण्यायोग्य कचरा खरेदी करून त्यापासून गट्टू तयार केले जातात.

छत्रपती संभाजीनगर : अंत्यसंस्कारासाठी शहरातील विविध स्मशानभूमींमध्ये दरमहा हजारो टन लाकूड लागत होते. आता महापालिकेने एका खासगी कंपनीच्या सहकार्याने पर्यावरणपूरक लाकडी गट्टूचा वापर सुरू केला आहे. २५० ते ३०० किलो लाकडी गट्टूत आता अंत्यसंस्कार होत आहेत. शहरातील १४ स्मशानभूमींमध्ये लाकडी गट्टू वापरले जात आहेत. आणखी चार ठिकाणी लवकरच सुरुवात होणार आहे. राज्यात मुंबई, पुणे या मोठ्या शहरानंतर छत्रपती संभाजीनगर शहराने हा प्रयोग सुरू केला आहे.

अंत्यसंस्कार विधीवतच झाले पाहिजे, यावर आजही नागरिक भर देतात. कोट्यवधी रुपये खर्च करून मनपाने विद्युतदाहिनी सुरू केली. मात्र, त्यात अंत्यसंस्कार करायला नातेवाईक तयारच होत नाहीत. त्यामुळे कैलासनगर येथील विद्युतदाहिनी बंद पडली आहे. लाकूड, शेण्यांचा वापर करूनच अंत्यसंस्कार व्हावेत, याकडे अधिक कल असल्याने या प्रकारामुळे शहरातील विविध स्मशानभूमींमध्ये दरमहा हजारो टन लाकडाचा वापर होत होता. लाखो झाडांची कत्तल करावी लागत होती. यावर केंद्र व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने लाकडी गट्टूचा पर्याय सुचविला. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर महापालिकेने २८ जून २०२२ पासून लाकडी गट्टूचा वापर करून अंत्यसंस्कार करण्यास सुरुवात केली. कोणत्या स्मशानभूमीत वापर? पुष्पनगरी, भीमनगर भावसिंगपुरा, कैलासनगर, मिटमिटा, पडेगाव, एन-६, बेगमपुरा, गादीया विहार, कांचनवाडी, मसनतपूर, मुकुंदवाडी, मुकुंदवाडी गाव आदी ठिकाणी लाकडी गट्टू वापरले जातात.

गट्टूचे दर काय? पंजाब रिनिवल कंपनीकडून लाकडी गट्टूचा पुरवठा प्रत्येक स्मशानभूमीवर स्मशानजोगींना केला जातोय. ७ रुपये ७५ पैसे एका किलोसाठी दर आकारला जातोय. ९० मिमीचा एक गट्टू असतो. अंत्यसंस्कारासाठी लागणारे लोखंडी केजसुद्धा या कंपनीने मोफत तयार करून दिले. आतापर्यंत १६० टन गट्टूचा पुरवठा करण्यात आला. २०२४ नंतर किलोमागे दरवर्षी १ रुपयांची वाढ होणार आहे. मनपाने कंपनीसोबत पाच वर्षांचा करार केला.

लाकूड गट्टूत फरक काय? अंत्यसंस्कार करण्यासाठी पूर्वी ३५० ते ४०० किलो लाकूड लागत होते. आता २५० ते ३०० किलो लाकडी गट्टूत अंत्यसंस्कार होत आहेत. विशेष बाब म्हणजे आता धूर अजिबात होत नाही. प्रदूषण रोखण्यात मनपाची भूमिका महत्त्वाची ठरत आहे.

कसे तयार होतात गट्टूखासगी कंपनीची जिल्ह्यात गट्टू तयार करणारी पाच केंद्रे आहेत. प्रत्येक केंद्राच्या जवळील शेतकऱ्यांच्या शेतातून जाळण्यायोग्य कचरा खरेदी केला जातो. या कचऱ्यापासून गट्टू तयार होतात.

गट्टूचे फायदेलाकडी गट्टूमुळे प्रदूषण रोखण्यात बरीच मदत होईल. शेतकरी त्यांच्या शेतात कचरा जाळून टाकत होते, ते आता थांबेल. यामुळे त्यांच्याकडून होणारे प्रदूषण थांबेल, त्यांना आता कंपनीद्वारे चार पैसेही मिळत आहेत. यामुळे अनेकांना राेजगार मिळाला आहे. डॉ. पारस मंडलेचा, आरोग्य वैद्यकीय अधिकारी.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादenvironmentपर्यावरणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका