शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

चिकलठाण्यात मध्यरात्री आगडोंब; चार गॅरेज जळून खाक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 14:30 IST

या घटनेत चारही गॅरेजमध्ये ३० ते ४० कार दुरुस्तीसाठी आलेल्या होत्या.

औरंगाबाद : चिकलठाणा येथील हिनानगरसमोरील मार्केटमधील चार मोटार गॅरेजला सोमवारी मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेत गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या अनेक कार आणि वेगवेगळी चार गॅरेज जळून खाक झाली. अग्निशमन दलाचे चार बंब आणि जवानांनी दोन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविले.

चिकलठाणा  येथील हिनानगरसमोर पत्र्याच्या शेडमध्ये शॉपिंग मार्केट आहे. या मार्केटमधील बहुतेक दुकाने ही चारचाकी वाहनांची दुरुस्ती करणारी आहेत. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे मार्केटमधील दुकानदारांनी त्यांची दुकाने बंद करून ते घरी गेले. नंतर रात्री १२ वाजेच्या सुमारास एकापाठोपाठ चार गॅरेजला आग लागली. या घटनेत शेख शरीफ यांच्या मालकीची भूमी मोटार्सपासून आगीला सुरुवात झाली. या आगीने (पान १ वरून) अवघ्या काही मिनिटांत  मोहसीन शेख यांची मिरॅकल फिनिशिंग, शेख उमर यांच्या मालकीची सारा मोटार्स आणि शेख फईम यांच्या मालकीची मनोज मोटार्सला वेढा दिला.

या आगीची घटना कळताच हिनानगर येथील रहिवासी आसिफ शेख या तरुणाने अग्निशमन दलाला फोन लावला. मात्र, अनेकदा प्रयत्न केल्यानंतरही अग्निशमन दलाच्या १०१ नंबरकडून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी त्याने पोलिसांना कॉल केला. नंतर पोलिसांनी अग्निशमन दलाला कळविले आणि अग्निशमन दलाच्या चिकलठाणा आणि सिडको स्टेशनचे बंब तेथे दाखल झाले. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केल्याने आणखी दोन बंब आणि पाण्याचे चार टँकर मागविण्यात आले. 

अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेल्या प्रयत्नानंतर  रात्री दोन वाजेच्या सुमारास संपूर्ण आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. यामुळे या गॅरेजशेजारील तारा मोटार्स, गुडलक मोटार्ससह अन्य दुकाने आगीपासून वाचले. सिडको एमआयडीसी ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे, सिडको ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी आणि कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. आग विझविण्यासाठी मुख्य अग्निशमन अधिकारी एस.के. भगत आणि कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

लाखो रुपयांचे नुकसानया घटनेत चारही गॅरेजमध्ये ३० ते ४० कार दुरुस्तीसाठी आलेल्या होत्या. यापैकी काही कार गॅरेजमधून बाहेर काढण्यात आल्याने त्या आगीपासून वाचल्या. मात्र, किती गाड्या या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. मात्र, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

टॅग्स :fireआगAurangabadऔरंगाबादchikhalthanaचिखलठाणाPoliceपोलिस