शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शहरासाठीच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम एमजीपीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 18:57 IST

मंत्रिमंडळाची मंजुरी मिळणार 

ठळक मुद्दे१७०० कोटींची योजना ८ दिवसांनंतर निविदा

औरंगाबाद : शहराची तहान भागविण्यासाठी राज्य शासनाने युद्धपातळीवर नवीन पाणीपुरवठा योजना मनपाकडून तयार करून घेतली आहे. तब्बल १७०० कोटी रुपयांची ही योजना असून, मंत्रिमंडळाच्या बैठकीत या महत्त्वपूर्ण योजनेला मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे. शासन मंजुरी मिळताच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून हे काम करून घेणार आहे. निविदा आठ दिवसांनंतर म्हणजेच आचारसंहिता लागण्यापूर्वी काढण्याच्या वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत.

समांतर जलवाहिनीचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आजही पडून आहे. मागील दोन वर्षांपासून महापालिका सर्वोच्च न्यायालयात पाठपुरावा करीत आहे. निर्णय येत नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास विभागाच्या मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासोबत चर्चा करून पाणीप्रश्नी मध्यम मार्ग काढला. महापालिकेला युद्धपातळीवर नवीन प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले. महापालिकेनेही मागील महिन्यात प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावाला नियमानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मंजुरीही घेण्यात आली. या तांत्रिक मंजुरीचे १७ कोटी रुपये शासनाने देण्याची हमी दिली. आता नवीन पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या अखत्यारीत आहे. मंत्रिमंडळाची बैठक एक ते दोन दिवसांमध्ये होईल. या बैठकीत औरंगाबाद शहराच्या महत्त्वपूर्ण अशा पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळेल. शासनाची मंजुरी मिळताच योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सोपविण्यात येईल. प्राधिकरणच योजनेसाठी निविदा प्रसिद्ध करणार असल्याची माहिती उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांनी सोमवारी रात्री एका कार्यक्रमात दिली.

नवीन पाणीपुरवठा योजनेत जायकवाडीपासून नक्षत्रवाडीपर्यंत २५०० मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकणे, शहरात २१०० कि.मी.च्या अंतर्गत जलवाहिन्या टाकणे, नक्षत्रवाडी येथे नवीन एमबीआर बनविणे, जलशुद्धीकरण केंद्र उभारणे आदी कामांचा समावेश आहे. ही योजना दोन टप्प्यांत पूर्ण केली जाईल. पहिला टप्पा पंधरा वर्षाचा राहील. या टप्प्यात शहराला ४५१ एमएलडी पाणी मिळेल. त्यानंतर पुढील पंधरा वर्षांत शहराला ६०४ एमएलडी पाणी मिळेल. १६७३ कोटी योजनेचा प्राथमिक खर्च गृहीत आहे. 

अशी आहे नवीन योजना :

1673 कोटी योजनेचा एकूण खर्च 533 कोटी मुख्य जलवाहिनी2500 मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी273 कोटी अंतर्गत जलवाहिनी254 कोटी पाणी शुद्धीकरण केंद्र27 टाक्या जुन्या वापरणार27 टाक्या नवीन बांधणार660 मीटर उंचीवर नक्षत्रवाडीत नवीन एमबीआर 700 कि.मी. नवीन अंतर्गत जलवाहिन्या08 कोटी दरमहा विजेचा खर्च 

सातारा, देवळाईचा समावेशनवीन पाणीपुरवठा योजनेत सातारा, देवळाईसह महापालिका हद्दीतील सर्व भागांचा समावेश करण्यात आला आहे. सद्य:स्थितीत पालिका हद्दीचे क्षेत्रफळ १७६ वर्ग कि.मी. एवढे आहे. या सर्व भागात एकूण २१०० कि.मी.च्या अंतर्गत जलवाहिन्या टाकण्यात येतील.

मुख्य जलवाहिनीची किंमत ५३३ कोटीनवीन पाणीपुरवठा योजनेसाठी १६७३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये सर्वाधिक खर्च ५३३ कोटी रुपये मुख्य जलवाहिनीसाठी, २७३ कोटी अंतर्गत जलवाहिन्यांसाठी आणि २५४ कोटी शुद्धीकरण केंद्र व तेथून पुढे जलकुंभापर्यंत जलवाहिन्यांसाठी लागणार आहेत.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीParallel Waterline Aurangabadसमांतर जलवाहिनी औरंगाबादState Governmentराज्य सरकारAurangabadऔरंगाबाद