शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शहरासाठीच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम एमजीपीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 18:57 IST

मंत्रिमंडळाची मंजुरी मिळणार 

ठळक मुद्दे१७०० कोटींची योजना ८ दिवसांनंतर निविदा

औरंगाबाद : शहराची तहान भागविण्यासाठी राज्य शासनाने युद्धपातळीवर नवीन पाणीपुरवठा योजना मनपाकडून तयार करून घेतली आहे. तब्बल १७०० कोटी रुपयांची ही योजना असून, मंत्रिमंडळाच्या बैठकीत या महत्त्वपूर्ण योजनेला मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे. शासन मंजुरी मिळताच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून हे काम करून घेणार आहे. निविदा आठ दिवसांनंतर म्हणजेच आचारसंहिता लागण्यापूर्वी काढण्याच्या वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत.

समांतर जलवाहिनीचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आजही पडून आहे. मागील दोन वर्षांपासून महापालिका सर्वोच्च न्यायालयात पाठपुरावा करीत आहे. निर्णय येत नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास विभागाच्या मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासोबत चर्चा करून पाणीप्रश्नी मध्यम मार्ग काढला. महापालिकेला युद्धपातळीवर नवीन प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले. महापालिकेनेही मागील महिन्यात प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावाला नियमानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मंजुरीही घेण्यात आली. या तांत्रिक मंजुरीचे १७ कोटी रुपये शासनाने देण्याची हमी दिली. आता नवीन पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या अखत्यारीत आहे. मंत्रिमंडळाची बैठक एक ते दोन दिवसांमध्ये होईल. या बैठकीत औरंगाबाद शहराच्या महत्त्वपूर्ण अशा पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळेल. शासनाची मंजुरी मिळताच योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सोपविण्यात येईल. प्राधिकरणच योजनेसाठी निविदा प्रसिद्ध करणार असल्याची माहिती उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांनी सोमवारी रात्री एका कार्यक्रमात दिली.

नवीन पाणीपुरवठा योजनेत जायकवाडीपासून नक्षत्रवाडीपर्यंत २५०० मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकणे, शहरात २१०० कि.मी.च्या अंतर्गत जलवाहिन्या टाकणे, नक्षत्रवाडी येथे नवीन एमबीआर बनविणे, जलशुद्धीकरण केंद्र उभारणे आदी कामांचा समावेश आहे. ही योजना दोन टप्प्यांत पूर्ण केली जाईल. पहिला टप्पा पंधरा वर्षाचा राहील. या टप्प्यात शहराला ४५१ एमएलडी पाणी मिळेल. त्यानंतर पुढील पंधरा वर्षांत शहराला ६०४ एमएलडी पाणी मिळेल. १६७३ कोटी योजनेचा प्राथमिक खर्च गृहीत आहे. 

अशी आहे नवीन योजना :

1673 कोटी योजनेचा एकूण खर्च 533 कोटी मुख्य जलवाहिनी2500 मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी273 कोटी अंतर्गत जलवाहिनी254 कोटी पाणी शुद्धीकरण केंद्र27 टाक्या जुन्या वापरणार27 टाक्या नवीन बांधणार660 मीटर उंचीवर नक्षत्रवाडीत नवीन एमबीआर 700 कि.मी. नवीन अंतर्गत जलवाहिन्या08 कोटी दरमहा विजेचा खर्च 

सातारा, देवळाईचा समावेशनवीन पाणीपुरवठा योजनेत सातारा, देवळाईसह महापालिका हद्दीतील सर्व भागांचा समावेश करण्यात आला आहे. सद्य:स्थितीत पालिका हद्दीचे क्षेत्रफळ १७६ वर्ग कि.मी. एवढे आहे. या सर्व भागात एकूण २१०० कि.मी.च्या अंतर्गत जलवाहिन्या टाकण्यात येतील.

मुख्य जलवाहिनीची किंमत ५३३ कोटीनवीन पाणीपुरवठा योजनेसाठी १६७३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये सर्वाधिक खर्च ५३३ कोटी रुपये मुख्य जलवाहिनीसाठी, २७३ कोटी अंतर्गत जलवाहिन्यांसाठी आणि २५४ कोटी शुद्धीकरण केंद्र व तेथून पुढे जलकुंभापर्यंत जलवाहिन्यांसाठी लागणार आहेत.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीParallel Waterline Aurangabadसमांतर जलवाहिनी औरंगाबादState Governmentराज्य सरकारAurangabadऔरंगाबाद