शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गावरून मेट्रो रेल्वे धावणे सध्या शक्य नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 17:41 IST

समृद्धी महामार्गावर ३७ वर्षे लागणार टोल 

ठळक मुद्देसध्या १२० पैकी ४९ मीटर जागा वापरली आहे.  १२० कि़मी. कोड बदलून ते १५० कि़मी. ताशी वेग

औरंगाबाद : मुंबई-नागपूर महामार्ग अर्थात समृद्धी महामार्गावरूनमेट्रोरेल्वे धावणे सध्या शक्य नसल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी सांगितले. जागा उपलब्ध नसल्यामुळे मेट्रो धावणे शक्य नाही. जर भविष्यात मेट्रोसाठी नियोजन करायचे ठरले, तर नव्याने भूसंपादन करावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.

हाय स्पीड रेल्वे चा सध्यातरी मुद्दा नाही. ही रेल्वे महामार्गावरून जाणार तरी कुठून? कारण महामार्गाचा मध्य दुभाजक १५ मीटरचा आहे. रेल्वेसाठी किमान १७ मीटरचा दुभाजक लागतो. त्यामुळे सध्या तरी जागा वाढविणे शक्य नाही. नव्याने भूसंपादन करून रेल्वेचा विचार करावा लागेल. आठ पदरी महामार्ग होणार आहे. १५ मीटरचा काँक्रीटचा पट्टा त्यामध्ये असेल. २० कोटींचा पेव्हर त्यासाठी टाकण्यात येणार आहे. १२० कि़मी. कोड बदलून ते १५० कि़मी. ताशी वेग असे करण्यात आले आहे. आयआयटी मुंबईकडून त्यासाठी बदल करण्यात आले आहेत, असे गायकवाड यांनी सांगितले. सध्या चौपदरीकरण सुरू असलेल्या समृद्धी महामार्गाचा भविष्यात विस्तार करायचा ठरल्यास त्यासाठी वाव असेल. १२० मीटरपर्यंत भूसंपादन केलेले आहे. सध्या १२० पैकी ४९ मीटर जागा वापरली आहे. 

आठ लाख वृक्षांची लागवडआवाज आणि तापमानाला आटोक्यात ठेवण्यासाठी सुमारे आठ लाख झाडे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लावण्यात येतील, असा दावा गायकवाड यांनी केला. सध्या १ लाख ७४ हजार ८९६ पैकी १ लाख ३० हजार ९३२ वृक्षतोड करण्यात आली आहेत, असेही त्यांनी सांगितले.

समृद्धीवर ३७ वर्षे लागणार टोल राज्याची राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूरला जोडणारा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम सुरू झाले आहे. २०२१ च्या जुलैपर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण होईल, त्या मार्गावरून प्रवास करायचा झाल्यास प्रति कि़मी. एक रुपया ६५ पैसे एवढी रक्कम चारचाकी वाहनाला प्रवासासाठी मोजावी लागेल. ११६५ रुपये ७०१ कि़मी.साठी टोल लागणार आहे. वाहनांनुसार टोलचा दर असणार आहे. २०२१ पासून रस्ता वाहतुकीसाठी पूर्ण जोमाने खुला होईल. तेव्हापासून दिवसाकाठी ४० हजार वाहने त्यावरून धावतील, असा अंदाज एमएसआरडीसीने बांधला आहे. महामार्ग बांधणीचा कालावधी धरून एकूण ४० वर्षांपर्यंत वाहनधारकांना टोल द्यावा लागेल.  

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAurangabadऔरंगाबादMetroमेट्रोrailwayरेल्वे