शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

शाळेत जाण्यासाठीची बोट माथेफिरुने तोडली; विद्यार्थिनी धायमोकलून रडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 19:17 IST

अज्ञात माथेफिरुने बोट तोडली;विद्यार्थ्यांच्या नशिबी पुन्हा तोच थर्माकॉलचा तराफा

कायगाव : गंगापूर तालुक्यातील शिवना काठावरच्या शेतवस्त्यांवरील मुलांना शाळेत ये-जा करण्याचा जीवघेणा प्रवास थर्माकॉलच्या तराफ्यावर करावा लागतो. या आशयाची बातमी लोकमतने गेल्या वर्षी प्रसिद्ध केली होती. त्यामुळे राज्यभर चर्चा होऊन मुंबईचे दिवंगत आमदार भाई सावंत यांच्या कुटुंबियांनी दोन लाखांची बोट या विद्यार्थ्यांसाठी दिली होती. मात्र या बोटीला ६ ऑक्टोबर रोजी कोण्यातरी अज्ञात माथेफिरूने तोडून टाकले. यामुळे या विद्यार्थ्यांच्या नशिबी पुन्हा तोच जीवघेणा प्रवास व तराफा आला आहे.

गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा शिवारातील काही भाग शिवना नदीच्या पलीकडे आहे. जायकवाडी धरण झाल्यामुळे येथील शेतकऱ्यांना आणि त्यांच्या मुलांना दररोज धरणाच्या पाण्यातून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. मागील दोन वर्षांपासून हा विषय चव्हाट्यावर आला आहे. आजवर अनेकदा तहसील, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, शिक्षण विभाग आणि जिल्हाधिकारी असे विविध सरकारी विभागाचे अधिकारी- कर्मचाऱ्यांनी येथे पाहणी दौरे केले.

२०२३ साली अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानपरिषदेत याबाबतची लक्षवेधी मांडण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने याविषयाची स्वतःहून दखल घेतली. याबाबत औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका सुद्धा दाखल करून घेतली. मात्र यातून अद्यापर्यंत तरी काही तोडगा निघाला नाही. त्यामुळे लोकमतने या विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवासावर गतवर्षी बातमी प्रकाशित केली होती. याची संपूर्ण राज्यभर चर्चा झाली. याची दखल घेत मुंबईचे दिवंगत आमदार भाई सावंत यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबियांनी २ लाखांची बोट या विद्यार्थ्यांसाठी पाठवून दिली होती. तेव्हापासून या विद्यार्थ्यांचा प्रवास सुखकर झाला होता. मात्र हे सुख कोण्या तरी अज्ञात समाजकंटकाच्या डोळ्यात खुपले व त्याने या बोटीची तोडफोड केली. याबाबत सोमवारी रात्री पालक विष्णू काळे यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात माथेफिरूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

६ ऑक्टोबरला बोट झाली गायबविद्यार्थी नेहमीप्रमाणे शाळेतून आल्यावर शनिवार, ५ ऑक्टोबर रोजी त्यांनी सायंकाळी बोट नदीकाठी दोरीच्या साह्याने बांधून ठेवली होती. मात्र रविवार, ६ ऑक्टोबर रोजी सकाळी बोटीच्या नेहमीच्या ठिकाणी पालकांना बोट गायब असल्याचे लक्षात आले. पालकांनी बोटीबाबत स्थानिक मच्छिमारांकडे चौकशी केली. रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास बबन पवार यांना सदर बोट जायकवाडी धरणाच्या संपादित क्षेत्रातील पाण्यात बुडालेली आढळली. कोण्या तरी अज्ञात समाजकंटकाने ती बोट तोडून टाकल्याने सदर दोन लाखांची बोट निकामी झाली आहे.

विद्यार्थिनी धायमोकलून रडल्याया शेतवस्तीवरील विद्यार्थी व विद्यार्थिनींना थर्माकॉलच्या तराफ्यावरून जीवघेणा प्रवास करावा लागत होता. मात्र या बोटीमुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र अज्ञाताने या बोटीची तोडफोड केल्याने विद्यार्थ्यांना पुन्हा तराफ्यावरूनच प्रवास करावा लागणार आहे. तुटलेली बोट पाहून रविवारी विद्यार्थिनी धायमोकलून रडल्या. यावेळी पालकांना त्यांना आवरणे कठीण झाले होते.

टॅग्स :Studentविद्यार्थीAurangabadऔरंगाबादriverनदी