शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शाळेत जाण्यासाठीची बोट माथेफिरुने तोडली; विद्यार्थिनी धायमोकलून रडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 19:17 IST

अज्ञात माथेफिरुने बोट तोडली;विद्यार्थ्यांच्या नशिबी पुन्हा तोच थर्माकॉलचा तराफा

कायगाव : गंगापूर तालुक्यातील शिवना काठावरच्या शेतवस्त्यांवरील मुलांना शाळेत ये-जा करण्याचा जीवघेणा प्रवास थर्माकॉलच्या तराफ्यावर करावा लागतो. या आशयाची बातमी लोकमतने गेल्या वर्षी प्रसिद्ध केली होती. त्यामुळे राज्यभर चर्चा होऊन मुंबईचे दिवंगत आमदार भाई सावंत यांच्या कुटुंबियांनी दोन लाखांची बोट या विद्यार्थ्यांसाठी दिली होती. मात्र या बोटीला ६ ऑक्टोबर रोजी कोण्यातरी अज्ञात माथेफिरूने तोडून टाकले. यामुळे या विद्यार्थ्यांच्या नशिबी पुन्हा तोच जीवघेणा प्रवास व तराफा आला आहे.

गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा शिवारातील काही भाग शिवना नदीच्या पलीकडे आहे. जायकवाडी धरण झाल्यामुळे येथील शेतकऱ्यांना आणि त्यांच्या मुलांना दररोज धरणाच्या पाण्यातून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. मागील दोन वर्षांपासून हा विषय चव्हाट्यावर आला आहे. आजवर अनेकदा तहसील, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, शिक्षण विभाग आणि जिल्हाधिकारी असे विविध सरकारी विभागाचे अधिकारी- कर्मचाऱ्यांनी येथे पाहणी दौरे केले.

२०२३ साली अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानपरिषदेत याबाबतची लक्षवेधी मांडण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने याविषयाची स्वतःहून दखल घेतली. याबाबत औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका सुद्धा दाखल करून घेतली. मात्र यातून अद्यापर्यंत तरी काही तोडगा निघाला नाही. त्यामुळे लोकमतने या विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवासावर गतवर्षी बातमी प्रकाशित केली होती. याची संपूर्ण राज्यभर चर्चा झाली. याची दखल घेत मुंबईचे दिवंगत आमदार भाई सावंत यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबियांनी २ लाखांची बोट या विद्यार्थ्यांसाठी पाठवून दिली होती. तेव्हापासून या विद्यार्थ्यांचा प्रवास सुखकर झाला होता. मात्र हे सुख कोण्या तरी अज्ञात समाजकंटकाच्या डोळ्यात खुपले व त्याने या बोटीची तोडफोड केली. याबाबत सोमवारी रात्री पालक विष्णू काळे यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात माथेफिरूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

६ ऑक्टोबरला बोट झाली गायबविद्यार्थी नेहमीप्रमाणे शाळेतून आल्यावर शनिवार, ५ ऑक्टोबर रोजी त्यांनी सायंकाळी बोट नदीकाठी दोरीच्या साह्याने बांधून ठेवली होती. मात्र रविवार, ६ ऑक्टोबर रोजी सकाळी बोटीच्या नेहमीच्या ठिकाणी पालकांना बोट गायब असल्याचे लक्षात आले. पालकांनी बोटीबाबत स्थानिक मच्छिमारांकडे चौकशी केली. रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास बबन पवार यांना सदर बोट जायकवाडी धरणाच्या संपादित क्षेत्रातील पाण्यात बुडालेली आढळली. कोण्या तरी अज्ञात समाजकंटकाने ती बोट तोडून टाकल्याने सदर दोन लाखांची बोट निकामी झाली आहे.

विद्यार्थिनी धायमोकलून रडल्याया शेतवस्तीवरील विद्यार्थी व विद्यार्थिनींना थर्माकॉलच्या तराफ्यावरून जीवघेणा प्रवास करावा लागत होता. मात्र या बोटीमुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र अज्ञाताने या बोटीची तोडफोड केल्याने विद्यार्थ्यांना पुन्हा तराफ्यावरूनच प्रवास करावा लागणार आहे. तुटलेली बोट पाहून रविवारी विद्यार्थिनी धायमोकलून रडल्या. यावेळी पालकांना त्यांना आवरणे कठीण झाले होते.

टॅग्स :Studentविद्यार्थीAurangabadऔरंगाबादriverनदी