शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
3
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
4
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
5
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
7
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
8
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
9
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
10
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
11
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
12
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
13
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
14
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
15
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
17
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
18
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
19
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
20
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?

लग्नानंतर माहेरी आलेल्या विवाहितेचे प्रियकरासोबत पळून जाऊन दुसरे लग्न, १५ तोळे सोनेही नेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 13:18 IST

धुमधडाक्यात लागलेल्या लग्नानंतर माहेरी गेलेली विवाहिता परत सासरी आलीच नाही

औरंगाबाद : लॉकडाऊनच्या काळात मोठ्या धामधुमीत झालेल्या लग्नातील विवाहितेने सासरकडून मिळालेले १५ तोळे सोन्याचे दागिने घेऊन लग्नापूर्वी प्रेम असलेल्या युवकासोबत सुंबाल्या केला. नंतर तिने प्रियकरासोबत दुसरा विवाह केल्याचे समजताच पहिल्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून पत्नी आणि तिच्या दुसऱ्या नवऱ्याच्या विरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पैठण तालुक्यातील बिडकीन येथील आशिष महावीर मोगल यांचा विवाह विष्णूनगर येथील युवती सोबत लॉकडाऊनच्या काळात धार्मिक पद्धतीने झाला होता. लग्नानंतर विवाहिता सासरी गेली. दिवाळीसाठी माहेरी आली होती. १९ नोव्हेंबर रोजी मोगल हे पत्नीला भेटले. त्याच्या दुसऱ्या दिवशी विवाहिता सासरी येणार होती. त्याच रात्री ती विष्णूनगरातून गायब झाली. तिने मोगल यांनी लग्नात घातलेले १५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने सोबत नेले. मोगल यांनी पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार जवाहरनगर पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलिसांना तपासात मोगल यांची पत्नी उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील काटीगाव येथे असल्याची माहिती मिळाली. ती तिचा प्रियकर सूरज गायकवाड सोबत राहत असल्याचे स्पष्ट झाले. 

या दोघांना जवाहरनगर पोलिसांनी बोलावून घेतले. तेव्हा त्यांनी पोलीस ठाण्यात येत जबाब नोंदवला. यात माेगल यांच्या पत्नीने आपल्या मर्जीनुसार सूरज सोबत राहत असून, आम्ही विवाह केला असल्याचेही सांगितले. त्यामुळे पोलीसही काही करु शकले नाहीत. यानंतर पहिले पती मोगल यांनी जवाहरनगर पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीत त्यांनी नमूद केले की, त्यांनी पहिले लग्न झालेले असताना पत्नीने दुसरे लग्न केले. तसेच पहिल्या लग्नात घातलेले १५ तोळे सोने घेऊन पोबारा केला. यावरून पत्नीसह तिच्या दुसऱ्या नवऱ्याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक तपास पोलीस हवालदार भाऊराव गायके करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादmarriageलग्न