शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

लग्नानंतर माहेरी आलेल्या विवाहितेचे प्रियकरासोबत पळून जाऊन दुसरे लग्न, १५ तोळे सोनेही नेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 13:18 IST

धुमधडाक्यात लागलेल्या लग्नानंतर माहेरी गेलेली विवाहिता परत सासरी आलीच नाही

औरंगाबाद : लॉकडाऊनच्या काळात मोठ्या धामधुमीत झालेल्या लग्नातील विवाहितेने सासरकडून मिळालेले १५ तोळे सोन्याचे दागिने घेऊन लग्नापूर्वी प्रेम असलेल्या युवकासोबत सुंबाल्या केला. नंतर तिने प्रियकरासोबत दुसरा विवाह केल्याचे समजताच पहिल्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून पत्नी आणि तिच्या दुसऱ्या नवऱ्याच्या विरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पैठण तालुक्यातील बिडकीन येथील आशिष महावीर मोगल यांचा विवाह विष्णूनगर येथील युवती सोबत लॉकडाऊनच्या काळात धार्मिक पद्धतीने झाला होता. लग्नानंतर विवाहिता सासरी गेली. दिवाळीसाठी माहेरी आली होती. १९ नोव्हेंबर रोजी मोगल हे पत्नीला भेटले. त्याच्या दुसऱ्या दिवशी विवाहिता सासरी येणार होती. त्याच रात्री ती विष्णूनगरातून गायब झाली. तिने मोगल यांनी लग्नात घातलेले १५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने सोबत नेले. मोगल यांनी पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार जवाहरनगर पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलिसांना तपासात मोगल यांची पत्नी उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील काटीगाव येथे असल्याची माहिती मिळाली. ती तिचा प्रियकर सूरज गायकवाड सोबत राहत असल्याचे स्पष्ट झाले. 

या दोघांना जवाहरनगर पोलिसांनी बोलावून घेतले. तेव्हा त्यांनी पोलीस ठाण्यात येत जबाब नोंदवला. यात माेगल यांच्या पत्नीने आपल्या मर्जीनुसार सूरज सोबत राहत असून, आम्ही विवाह केला असल्याचेही सांगितले. त्यामुळे पोलीसही काही करु शकले नाहीत. यानंतर पहिले पती मोगल यांनी जवाहरनगर पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीत त्यांनी नमूद केले की, त्यांनी पहिले लग्न झालेले असताना पत्नीने दुसरे लग्न केले. तसेच पहिल्या लग्नात घातलेले १५ तोळे सोने घेऊन पोबारा केला. यावरून पत्नीसह तिच्या दुसऱ्या नवऱ्याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक तपास पोलीस हवालदार भाऊराव गायके करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादmarriageलग्न