शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

लसीकरणाचे मार्केटिंग करा; १०० टक्के लसीकरणानंतरच औरंगाबादचे पर्यटन वाढेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2021 16:12 IST

पंतप्रधानांनी ज्या जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे, अशा जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला.

औरंगाबाद : गोव्यातील पर्यटनवृद्धी ( Tourism ) होण्याचे कारण म्हणजे तेथील यंत्रणेने १०० टक्के लसीकरण केल्याने गोवा कसा सुरक्षित आहे, याचे मार्केटिंग केले. परिणामी, जगभरातील पर्यटक पुन्हा तिकडे येऊ लागले. औरंगाबाद जिल्ह्याला देखील पर्यटनाला ( Aurangabad Tourism ) मोठा वारसा आहे. येथील लसीकरण १०० टक्के (Corona vaccination ) झाल्यास त्याचेही गोवा पॅटर्ननुसार मार्केटिंग करून पर्यटन वाढवावे, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये केल्या.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल हेही उपस्थित होते. जिल्हा पर्यटनासाठी प्रसिद्ध असल्याने याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांमध्ये विश्वास वाढावा. यासाठी पर्यटनाशी संबंधित क्षेत्रातील सर्व व्यक्तींचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण करावे, असे पंतप्रधानांनी सुचविले. २५ डिसेंबर २०२१ पर्यंत १०० टक्के लसीकरणाची मुदत आहे.

पंतप्रधानांनी ज्या जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे, अशा जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यासह इतर राज्यांचे मुख्यमंत्री तसेच विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी सहभागी झाले. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी विविध उपक्रम राबवून लवकरच संपूर्ण जिल्ह्यात लसीकरण पूर्ण करण्यात येईल, असे पंतप्रधानांना सांगितले.

पंतप्रधानांच्या सूचनादुसरा डोस घेण्यासाठी जे लाेक येत नाहीत, त्यांना ट्रॅक करा. बूथवाईज ट्रॅकिंगसाठी यंत्रणांनी तयारी करावी. विशिष्ट समुदायाचे लोक लस घेण्यास पुढे येत नसल्यामुळे धर्मगुरूंची मदत घ्या. त्यांच्या आवाहनाचे व्हिडिओ सर्व माध्यमांतून नागरिकांपर्यंत पोहोचवा. दिवाळीच्या सुटीतदेखील लसीकरणाची मोहीम सुरू ठेवल्यास टक्केवारी घसरणार नाही. काही जिल्हाधिकाऱ्यांना पंतप्रधानांनी कडक शब्दांत समज दिली.

शहरी, ग्रामीण भागात उपक्रम राबविणारलसीकरणाविषयी माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन कवच कुंडल अभियान राबवून लसीकरण वाढविले आहे. ‘मन में है विश्वास’ हा कोरोनाविरुद्धच्या लढाईत मनोबल वाढविणारा उपक्रम राबविला. या कार्यक्रमात विविध धर्मांचे धर्मगुरू उपस्थित होते. सैन्यदलाचाही सहभाग होता. लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या पहिल्या २५ गावांना विशेष निधी देणार आहोत. शहरी तसेच ग्रामीण भागासाठी ‘मेरा वाॅर्ड सौ प्रतिशत टीकाकरण वाॅर्ड’, ‘संतांची भूमी शंभर टक्के लसीकरण भूमी’, असे वेगवेगळे प्रयोग करून टक्का वाढविणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादtourismपर्यटनNarendra Modiनरेंद्र मोदीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाCorona vaccineकोरोनाची लस