शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याच्या जन्माचा साक्षीदार ढासळतोय्

By admin | Updated: September 17, 2014 01:13 IST

संतोष अन्नदाते, तांदूळजा भारतीय संस्कृताचा इतिहास फार प्राचीन व ऐतिहासिक असून, शासनाच्या उदासिन धोरणांमुळे अनेक गावागावातील एैतिहासिक ठेवा नष्ठ होण्याची

संतोष अन्नदाते, तांदूळजाभारतीय संस्कृताचा इतिहास फार प्राचीन व ऐतिहासिक असून, शासनाच्या उदासिन धोरणांमुळे अनेक गावागावातील एैतिहासिक ठेवा नष्ठ होण्याची भिती निर्माण तर झालीच आहे; परंतू यापैकीच प्रमुख व इ़स़ १७६० साली उदगीरच्या लढाईत निजामांचा पराभव होऊन निजाम व मराठे यांच्यातील तहनामा ज्या गढीत झाला तहनामान्यातील करारानुसार निजामांनी मराठ्यांना मराठवाडी भाषिकांचा ‘वाडा’ म्हणून तसेच तुंगभद्रा नदी पर्यंतचा प्रदेश दिला़ याचपैकी याचे नामकरण ‘मराठवाडा’ असे करण्याचे ठिकाण म्हणजे सुमारे अडीचशे वर्षापासून त्या इतिहासाची साक्ष देत असलेली तांदूळज्याच्या सरदार नाईक बावणे यांची गढी आज ढासळू लागली आहे़ सुमारे अडीचशे वर्षापूर्वी ‘मराठवाडा’ या प्रांताला ‘मराठवाडा’ हे नाव देण्याचा ‘ऐतिहासिक निर्णय’ ज्या गढीमध्ये झाला़ त्या लातूर तालुक्यातील तांदूळजा येथील ‘सरदार नाईक बावणे’ यांच्या गर्दीचा विसर पर्यटन मंत्रालयाने पडला आहे़ मराडवाड्याची जन्मभुमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गडीच्या विकासासाठी ऐतिहासिक स्थळ विकास योजनेअंतर्गत साधा उल्लेखही दिसून येत नाही़ निजामाचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी शिवरायाने त्याकाळी सरदार नावाची उपाधी देवून कर्तव्यदक्ष मावळे तयार केले़ या सरदारांना विशिष्ट अशा पाच-पन्नास गावाची जहागीरी देवून टाकली व अशा प्रकारे तांदूळजा येथील नाईक बावणे हे त्यावेळचे सरदार होते़ त्याप्रमाणे या सरदारांसाठी व त्याभोवतालच्या प्रदेश संरक्षणासाठी त्यांनी बुरुजवजा मोठमोठ्या किल्ल्याप्रमाणे गढीची निर्मिती झाली़ गढीचे बांधकाम गनिमीकावा पद्धतीने केले गेले़ त्यामुळे शत्रुपासून आले संरक्षण व्हावे तसेच शत्रु आणि त्यांचे मानसे आढळून येताच तोफेचा गोळा शत्रुला लागावा अशा पद्धतीने निर्मिती करण्यात आली़ मराठवाड्याची जन्मभुमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गढीने अनेक घडामोडी पाहिल्या आहेत़ १९४८ मध्ये तांदुळजा, सारसा, देवळा येथील गावाच्या लोकांवर रजाकाराने जेव्हा अत्याचार सुरु केले तेव्हा तांदुळजाच्या सरदार जगजीवन उर्फ युवराज नाईक बावणे, बाबुराव बंडेराव शिंदे आदी मंडळींनी रजाकाराला सळो की पळो करुन सोडले़ बन्सीलाल मारवाडी यांच्या मुलाची हत्या करुन सोने-नाणे घेवून जाणाऱ्या ४० रजाकारी पठाणांना मांजरा नदीच्या पुरात गराडा घालून जलसमाधी दिली़ तसेच आज तांदुळजा येथे असलेल्या सामाजिक वनिकरणातही काही रजाकाराला ठार करण्यात आले़