शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
2
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
3
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
4
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
5
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
6
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
7
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
8
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
9
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
10
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
11
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
12
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
13
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
14
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
15
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
16
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
17
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
18
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
19
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
20
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…

हक्काच्या पाण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे मराठवाड्याचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 10:44 PM

जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासंदर्भात बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत असून, हक्काच्या पाण्यासाठी अवघ्या मराठवाड्याचे त्याकडे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देआज सुनावणी : जलतज्ज्ञांच्या मते, मराठवाड्याची बाजू कायदेशीर आणि मजबूत; फक्त योग्य मांडणीची गरज

औरंगाबाद : जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासंदर्भात बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत असून, हक्काच्या पाण्यासाठी अवघ्या मराठवाड्याचे त्याकडे लक्ष लागले आहे. मराठवाड्याची बाजू कायदेशीर आणि मजबूत आहे. केवळ ती योग्यरीत्या मांडली गेली पाहिजे, असे मत जलतज्ज्ञांनी व्यक्त केले.प्रारंभी तयारी करण्याच्या नावाखाली आणि नगर, नाशिक जिल्ह्यांत होणाऱ्या विरोधाचे कारण पुढे करून पाणी सोडण्यास विलंब केला गेला. या सगळ्यात जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली. तीन सदस्यीय न्यायपीठ बुधवारी सुनावणी करणार आहे. त्यामुळे दोन दिवस जायकवाडीमध्ये पाणी सोडण्यास मनाई केली आहे. त्यामुळे निकाल काय लागतो, याकडे मराठवाड्यासह नगर, नाशिक जिल्ह्यांतील जनतेचे लक्ष लागले आहे.गोदावरी आंतरराज्य नदी असल्याने केंद्र शासनाने लवादामार्फत पाण्याची वाटणी करून दिलेली आहे. त्यामुळे पाणी एकाच भागाचे आहे, असे म्हणता येत नाही. पाण्याची समन्यायी वाटणी झालेली आहे. त्यामुळे ही बाब न्यायालयात मांडली पाहिजे. जायकवाडीवरील २३ मोठ्या व मध्यम धरणांत ८७.७० टीएमसी पाणी क्षमता आहे. खरिपातील वापर आणि आजची शिल्लक असे ९६.५० टीएमसी पाणी आहे. त्यातून महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या कायद्याप्रमाणे जायकवाडीसाठी ९ टीएमसी पाणी सोडणे आवश्यक आहे. हे पाणी दिल्यानंतरही वरच्या धरणांत ८७.५० टीएमसी पाणी राहील. त्यामुळे नगर, नाशिकमधून विरोध होता कामा नये, असे जलतज्ज्ञांचे म्हणणे आहे.पाणी सोडण्यापर्यंत कार्यवाही१५ आॅक्टोबरला हिशोब आणि समन्यायी पाणी वाटप करून ३१ आॅक्टोबरपर्यंत वरच्या धरणांतून जायकवाडीसाठी पाणी द्यावे, असा जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने सप्टेंबर २०१४ मध्ये निर्णय दिलेला आहे. त्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश होते; परंतु एखाद्या धरण समूहातून पाणी सोडण्याची कार्यवाही तांत्रिक अपरिहार्य कारणामुळे ३१ आॅक्टोबरपर्यंत पूर्ण करणे शक्य झाले नाही तर निर्धारित पाणीसाठा सोडण्यापर्यंत कार्यवाही चालू ठेवावी, असेही आदेश आहेत. त्यामुळे मराठवाड्याच्या बाजूने निकाल लागण्यास कोणतीही अडचण येणार नसल्याचा विश्वास जलतज्ज्ञतांनी व्यक्त केला.शासन मराठवाड्याच्या बाजूनेजायकवाडीतील पाण्याचा लाभ ज्यांना मिळतो, ते सध्या काहीही बोलताना दिसत नाहीत. हक्काच्या पाण्यासाठी मराठवाड्याची बाजू मजबूत, कायदेशीर आहे. यावेळी शासनही आपल्या बाजूने आहे. न्यायालयात ते मांडणी करीत आहे. पाणी सोडण्याचा निर्णय झाला, तर ३१ आॅक्टोबर तारखेची कोणतीही अडचण येणार नाही.- या. रा. जाधव, जलतज्ज्ञतारखेचा मुद्दामहाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिलेल्या निर्णयाचा मुद्दा पुढे करून पाणी सोडण्यास स्थगिती मिळविण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो; परंतु गोदावरी नदी ही आंतरराज्य नदी आहे. वरच्या धरणांतून सोडण्यात येणारे पाणी समन्यायी पाणी वाटपाप्रमाणे दिले जात आहे आणि कायद्यानुसार आहे, हे पटवून देण्याची गरज आहे.- शंकर नागरे, जलतज्ज्ञपाणी सोडणे शक्यमहाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशाप्रमाणे पाणी सोडावे लागणार आहे, हे गृहीत धरूनच तयारी करण्याची गरज होती. त्यानुसार खूप आधीच पाणी सोडण्याची तयारी केली पाहिजे होती; परंतु पाटबंधारे विभागाने योग्य भूमिका घेतली नाही.- प्रदीप पुरंदरे, जलतज्ज्ञ

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMarathwadaमराठवाडा