शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मराठवाड्यातील युवकाची दमदार कहाणी; प्राध्यापक होण्यासाठी पैसे नसल्याने व्यवसाय थाटून झाला आत्मनिर्भर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 1:27 PM

सेट-नेट जीआरएफमध्ये उत्तीर्ण; एमफील पूर्ण, पीएच.डी. सुरू

ठळक मुद्देविद्यापीठातील युवकाचा निर्णय आज मिळवतोय ५० हजार रुपये महिना  

- राम शिनगारे

औरंगाबाद :  प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक असलेल्या सेट-नेट परीक्षा जीआरएफमध्ये ५ वर्षांपूर्वीच उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळेना. संस्थाचालकांकडे जावे तर लाखो रूपयांची मागणी करतात. त्यामुळे एम.ए., एम.फिल. पूर्ण करून पीएच.डी.चे संशोधन शेवटच्या टप्प्यात असलेल्या युवकांने चक्क प्राध्यापक होण्याचा नाद सोडून देत व्यवसायाचा मार्ग पत्कारला आहे. व्यवसाय कौशल्यावर आधारित असल्यामुळे सर्व खर्च जाऊन प्रतिमहिना ५० ते ६० हजार रूपयांचा निव्वळ नफाही  मिळत आहे.

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील बेलुरा गावातील सतीश आश्रुबा भोसले हा युवक २०११ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागात पदव्युत्तरचे शिक्षण घेण्यासाठी आला होता. एम.ए. पूर्ण केल्यानंतर त्याने प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक असलेल्या सेट-नेट परीक्षांची तयारी सुरु केली. दुसऱ्या प्रयत्नातच दोन्ही परीक्षा जीआरएफमध्ये उत्तीर्ण झाला. जीआरएफमध्ये उत्तीर्ण झाल्यामुळे एम.फिल., पीएच.डी.च्या संशोधनासाठी शिष्यवृत्ती मंजूर झाली. दोन वर्ष एम.फिल.चे संशोधन केले. त्यानंतर पीएच.डी.चे संंशोधन अद्याप सुरू आहे.

मात्र पाच वर्षांच्या कालावधीत पात्र असूनही प्राध्यापक होण्यासाठी कोठेही संधी मिळाली नाही. दोन-तीन ठिकाणी मुलाखती दिल्या. मात्र लाखो रूपयांची देण्यासाठी पैसे नसल्यामुळे शांत बसावे लागले. वय वाढत होते. किती दिवस नोकरीचाच शोध घेणार असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. घरातील लोक लग्न करण्यासाठी मागे लागले. शिष्यवृत्ती मिळत असल्यामुळे संशोधनाचे काम सुरू होते. त्यामुळे २०१८ संपताच काही तरी व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. मित्रमंडळींसह मिळणाऱ्या शिष्यवृत्तीतुन काही पैसे वाचवून ५ लाख रूपये जमा केले. गावाकडील नातेवाईक वैजनाथ पवार यांना सोबत घेत माजलगाव येथे यशराज मल्टीसर्व्हिसेस दुकान टाकले. यात पॅन कार्ड काढून देणे, नॉनक्रिमिलेअर, रहिवाशी, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, रेल्वे, विमान, बसचे तिकिट बुकिंग, तिरुपती बालाजी दर्शन पास काढून देणे. याशिवाय शेतकऱ्यांना सातबारा काढून देणे, पिक विमा अर्ज भरून देणे, बँकेतुन पैसे काढणे-भरणे, एमटीएम अशी सेवा सुरु केली.  ग्रामीण भागातील नागरिकांना या सेवा आवश्यक असल्यामुळे काही दिवसात अपेक्षित गर्दी होऊ लागली.

हा व्यवसाय सुरु करण्यासाठी नातेवाईकांसह दोघांना १० रूपयांची गुंतवणूक करावी लागली. मात्र दोन महिन्याच्या आतच त्याचा परतावा सर्व खर्च जाऊन ५० ते ६० हजार  रूपये महिना मिळू लागला आहे. सतीश चार दिवस पीएच.डी.चे संशोधन पूर्ण करण्यासाठी औरंगाबादेत असतो. त्याचवेळी नातेवाईक दुकान सांभाळतो. तसेच गावातील दोन युवकांनाही त्याने रोजगार उपलब्ध करून देत दुकानावर कामाला ठेवले आहे. या व्यवसायात आणखी गुंतवणूक करण्यासाठी मोठी रक्कम नसल्यामुळे वाढ करता येत नाही.  तरीही येत्या काही दिवसात मोठी भरारी घेता येईल, असेही सतीश सांगतो.

व्यवसायाची लाज वाटत नाही प्राध्यापक होण्यासाठी ४५ ते ५० लाख रूपये द्यावे लागतील. त्याशिवाय नोकरी मिळणार नाही. प्राध्यापक होण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र आता परिस्थिती पाहून प्राध्यापक होऊ वाटेना गेले आहे. एवढे पैसे देऊन तर कधीच प्राध्यपक व्हायचे नाही. त्यामुळे व्यवसाय सुरु केला. एवढे शिक्षण घेऊनही दुकानावर बसताना काही लाज वाटत नाही. उलट स्वकृत्वातुन सुरू केलेल्या व्यवसायाचा अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया ही सतीश याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

पहा व्हिडिओ

टॅग्स :Studentविद्यार्थीbusinessव्यवसायDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादMONEYपैसाProfessorप्राध्यापक