शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

मराठवाडा शिक्षक निवडणूक: उस्मानाबादेत सर्वाधिक, तर औरंगाबादेत सर्वांत कमी मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 11:56 IST

सरासरी ८६.०१ टक्के गुरुजींनी बजावला हक्क

औरंगाबाद :मराठवाडाशिक्षक मतदारसंघासाठी सोमवारी विभागात शांततेत मतदान पार पडले. सरासरी ८६.०१ शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून सर्वाधिक ९२.३८ टक्के मतदान उस्मानाबाद जिल्ह्यात झाले, तर सर्वांत कमी ७९.४० टक्के मतदान औरंगाबाद जिल्ह्यात झाले. २ फेब्रुवारी रोजी या १४ उमेदवारांच्या भवितव्याचा निकाल लागेल. चिकलठाणा एमआयडीसीतील कलाग्रामसमोरील कंपनीच्या आवारात मतमोजणी होईल. सुमारे १०० टेबलवर मतमोजणी होणार असल्यामुळे निकाल लवकर हाती येऊ शकतो.

विभागात २२७ मतदान केंद्रांवर मतदान सुरू होते. ४६,७८० पुरुष, तर १४,७४९ महिला मतदारांचा समावेश होता. ६१ हजार ५२९ मतदारांपैकी ५३ हजार ६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नांदेड जिल्ह्यात सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत मतदान सुरू होते. जालना ८१.९९ टक्के, परभणी ९०.१७ टक्के, हिंगोली ९१.२७ टक्के, नांदेड ८६.४५ टक्के, लातूर ८५.७६, तर बीडमध्ये ९०.२७ टक्के मतदान झाले. २०१७ च्या तुलनेत १ हजार १८ मतदान जास्त झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ. विक्रम काळे यांनी लातूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला. भाजपचे किरण पाटील यांनी अपर तहसील कार्यालय, औरंगाबाद येथे मतदान केले. मराठवाडा शिक्षक संघाचे सूर्यकांत विश्वासराव यांनी कंधार तालुक्यात मतदानाचा हक्क बजावला. शिक्षक सेनेचे मनोज पाटील यांनी रेल्वे स्टेशन भागातील मतदान केंद्रावर मतदान केले. काळे यांनी कुठेही प्रचार कार्यालय उघडले नव्हते. नेटवर्क आणि तीन टर्ममधील कामांच्या जोरावर त्यांनी निवडणूक लढविली. किरण पाटील यांनी पक्षाच्या नेटवर्कवर मैदानात उडी घेतली.

जुन्या पेन्शन योजनेवरूनच प्रचार.....यावेळच्या निवडणुकीत जुनी पेन्शन लागू करण्यावरून जोरदार प्रचार करण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुनी पेन्शन योजना बंद करण्यासाठी तत्कालीन आघाडी सरकारला दोषी ठरविले, तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पेन्शन योजनेवरून राज्यातील सत्ताधारी वेळकाढू धोरण अवलंबित असल्याचे प्रत्युत्तर दिले. आ. काळे कुटुंबांचे २००२ पासून या मतदारसंघावर वर्चस्व आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात अँटी इन्मकबन्सीच्या वातावरणाची लहर निवडणुकीत होती. भाजपचे उमेदवार किरण पाटील यांनी त्या वातावरणाचा फायदा घेत प्रचार केला. त्यातच राष्ट्रवादीचे प्रदीप सोळुंके यांनी, तर भाजपचे नितीन कुलकर्णी यांनी बंडखोरी केली. मराठवाडा शिक्षक संघाचे सूर्यकांत विश्वासराव, शिक्षक समन्वय संघाचे उमेदवार मनोज पाटील यांनी मतदारसंघ पिंजून काढला. शिवाय संजय तायडे, कालिदास माने यांनीही मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. २०१७ साली २० उमेदवार मैदानात होते. त्यामुळे पहिल्या पसंतीची मते फुटली होती. यावेळीदेखील तशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

५० वर्षांत मतदारसंघावर कुणाचे नेतृत्व?२००४ पर्यंत शिक्षक संघाचे वर्चस्व मतदारसंघावर राहिले. १९७४ साली पहिल्यांदा या मतदारसंघात निवडणूक झाली. तेव्हा शिक्षक संघाचे डी. के. देशमुख आमदार झाले. १९८६ पर्यंत त्यांनीच मतदारसंघाचे नेतृत्व केले. त्यानंतर १९९२ पर्यंत राजाभाऊ उदगीरकर यांनी मतदारसंघाचे नेतृत्व केले. १९९८ पर्यंत पी. जी. दस्तूरकर हे आमदार होते. २००४ पर्यंत प. म. पाटील यांनी नेतृत्व केले. २००४ साली राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंतराव काळे यांनी शिक्षक संघाकडून हा मतदारसंघ हिसकावला. २००६ पासून २०२३ पर्यंत विक्रम काळे यांनी या मतदारसंघातून हॅट्ट्रिक केली. भाजपाने २००६ पासून या मतदारसंघाकडे पूर्ण ताकदीने लक्ष देण्यास सुरुवात केली. भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत यावेळच्या निवडणुकीत झाली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादElectionनिवडणूकTeacherशिक्षकMarathwadaमराठवाडा