शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

मराठवाड्यात टँकरचा आकडा ३०० च्या दिशेने 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 1:25 PM

मराठवाड्याला यंदाचा उन्हाळा गांजणार आहे. विभागातील चार जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्यामुळे सुमारे ३० ते ४० तालुक्यांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद : मराठवाड्याला यंदाचा उन्हाळा गांजणार आहे. विभागातील चार जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्यामुळे सुमारे ३० ते ४० तालुक्यांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. मार्चच्या अखेरपर्यंत १८५ गावांत २५० टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, ३२५ विहिरींचे अधिग्रहण प्रशासनाने केले आहे. जिल्हानिहाय टंचाई आराखड्याचे आदेश विभागीय पातळीवरून देण्यात आले आहेत. टंचाई आराखडा लवकरच अंतिम होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. 

२५० टँकरचा आकडा या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ३०० च्या आसपास जाण्याचा अंदाज प्रशासनाने बांधला आहे. यंदा शेती व इतर उपयोगासाठी जायकवाडीतून ८ आवर्तने देणे सध्या शक्य आहे. तिसऱ्या आवर्तनाचा अंतिम टप्पा सध्या सुरू आहे. बंधाऱ्यांची दुरुस्ती तातडीने करण्याच्या सूचना विभागीय प्रशासनाने केल्या आहेत. विभागातील औरंगाबाद, नांदेड, लातूर, परभणी या जिल्ह्यांमध्ये गेल्या पावसाळ्यात कमी पाऊस झाला. त्यामुळे या उन्हाळ्यात विभागातील सुमारे ३२ ते ४० तालुक्यांत पाणीटंचाईची शक्यता निर्माण होऊ शकते. टंचाई आराखड्याच्या अनुषंगाने संबंधित विभागाला प्रशासकीय पातळीवरून सूचना दिल्या आहेत. विभागात ७५ मध्यम प्रकल्प आहेत. त्यापैकी २७ मध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी, २७ प्रकल्पांत २५ ते ५० टक्के, तर ५० ते ७५ पर्यंत २१ प्रकल्पांत पाणी आहे. विभागातील ७४३ लघु प्रकल्प आहेत. ४७३ प्रकल्पांत कमी साठा आहे. १९६ प्रकल्पांत बऱ्यापैकी पाणी आहे, तर ६६ प्रकल्पांत ५० टक्क्यांहून अधिक पाणी आहे. ८ लघु प्रकल्पांत ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणी आहे.

जायकवाडी वगळता इतरत्र पाणीसाठा कमीविभागातील मोठ्या ११ प्रकल्पांतील ४ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. त्यातील तीन प्रकल्प नांदेड, तर १ प्रकल्प परभणी जिल्ह्यातील आहे. २५ ते ५० टक्क्यांदरम्यान पाणीसाठा हिंगोलीतील एका प्रकल्पात आहे. उस्मानाबादमधील दोन आणि परभणीतील एका मोठ्या प्रकल्पात ५० ते ७५ टक्के पाणीसाठा आहे. बीडमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा असून, औरंगाबादमध्ये जायकवाडीत ७५ टक्के पाणी आहे.

टॅग्स :WaterपाणीJayakwadi Damजायकवाडी धरणMajalgaon Damमाजलगाव धरणMarathwadaमराठवाडा