शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सिंचनात पश्चिम महाराष्ट्राची बरोबरी साधण्यासाठी मराठवाड्यास १५ वर्षांत ३० हजार कोटींची गरज

By बापू सोळुंके | Updated: March 29, 2023 19:56 IST

आमचं पाणी आमचा हक्क: पुढील दहा वर्षांत मराठवाड्यातील जास्तीत जास्त २५ टक्के क्षेत्रच येईल सिंचनाखाली

छत्रपती संभाजीनगर : कोणत्याही देशाची प्रगती पाण्याशिवाय होऊच शकत नाही. मराठवाड्यावर निसर्गासोबतच शासनकर्त्यांनीही कायम अन्याय केल्याने मराठवाड्याला ‘दुष्काळवाडा’, ‘टँकरवाडा’ अशा नावांनी ओळखले जाते. मराठवाड्यातील ७६ पैकी ५३ तालुके (७० टक्के ) कमी पावसाच्या क्षेत्रात मोडतात. महाराष्ट्रातील विद्यमान अपूर्ण प्रकल्पांचा अभ्यास केला तर सर्व कामे पुढील १० वर्षांत पूर्ण झाल्यास उर्वरित महाराष्ट्राची सिंचन क्षमता ४१ टक्के आणि विदर्भाची ३९ टक्क्यांपर्यंत पोहोचेल. मराठवाड्यातील उपलब्ध पाणी आणि उर्वरित प्रकल्प पाहता, सर्वांत कमी केवळ २५ टक्के सिंचनापर्यंत पोहोचू शकते. उर्वरित महाराष्ट्राच्या सिंचनाची बरोबरी करण्यासाठी मराठवाड्यासाठी इतर पाणी समृद्ध क्षेत्रातूनच १५० टीएमसी पाणी आयात करावे लागेल. त्यासाठी नवीन सिंचन प्रकल्प प्रस्तावित करावे लागतील. ही प्रकल्प करण्यासाठी सुमारे ३० हजार कोटी रुपयांची आवश्यकता असेल.

कमी पर्जन्यमानामुळे मराठवाड्यातील जनतेला दुष्काळाचा सामना करावा लागतो. दरवर्षी डिसेंबरनंतर पिण्याच्या पाण्याचे स्रोत कोरडे पडतात. यामुळे २०१९ पर्यंत मराठवाड्यातील शेकडो गावांतील जनतेला जानेवारी ते जूनपर्यंत चार ते पाच हजार टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला होता. मात्र, गेली दोन ते तीन वर्षे मुबलक पाऊस होत असल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाईच्या झळा सध्या जाणवत नाही. असे असले तरी ही परिस्थिती केवळ लहरी निसर्गावर अवलंबून आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मराठवाड्याला कायमस्वरूपी पाण्याची गरज आहे. उर्वरित महाराष्ट्राच्या समृद्ध पाणी क्षेत्रातून सुमारे १५० टीएमसी पाणी मराठवाड्यात आयात करून आणावे लागेल. यासाठी नदीजोड प्रकल्प हाच एकमेव पर्याय असल्याचे जलतज्ज्ञ सांगतात.

प. महाराष्ट्रातील नेत्यांच्या दबावतंत्राचा बळीपिण्याच्या पाण्यासोबत सिंचनाच्या बाबतीतही मराठवाडा अन्य प्रातांच्या तुलनेत पिछाडीवर आहे. केवळ राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे आणि मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींची उदासीनता आणि पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या दबावातंत्राचे राजकारण यास प्रमुख कारणीभूत असल्याचे बोलले जाते.

मराठवाड्यातील ५६ लाख हेक्टरसाठी केवळ ८ टक्के पाणीसिंचनाच्या बाबतीत मराठवाड्याची उर्वरित महाराष्ट्र आणि विदर्भ या विभागांची तुलना केली तर मराठवाड्यावर मागील ६२ वर्षांत कायम अन्याय होत असल्याचे दिसते. परिणामी, मराठवाड्यातील सिंचनाचा अनुशेष वाढतच आहे. पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील पेरणीलायक ९७.६० लाख हेक्टर जमिनीच्या सिंचनासाठी ७४ टक्के पाणी उपलब्ध आहे, तर विदर्भातील ५६.७४ लाख हेक्टर (२७ टक्के) क्षेत्रासाठी १८ टक्के पाणी उपलब्ध आहे. मराठवाड्यातील ५६.२८ लाख हेक्टर (२७ टक्के) क्षेत्रासाठी केवळ ८ टक्के पाणी उपलब्ध आहे.

राज्यात निर्माण झालेली सिंचन क्षमता आणि (कंसात २०३५ पर्यंत टक्केवारी)उर्वरित मराठवाडा - ३० टक्के (४१.८ टक्के)विदर्भ - २३.२ टक्के (३९.१ टक्के)मराठवाडा - २०.९ टक्के (२५.६ टक्के)

 

टॅग्स :MarathwadaमराठवाडाWaterपाणीAurangabadऔरंगाबाद