शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यापेक्षा हैदराबाद प्रिय; ध्वजारोहणानंतर शिवसेनेने पुन्हा केले अभिवादन

By सुमेध उघडे | Updated: September 17, 2022 13:40 IST

Marathwada Muktisangram Din: दिल्लीची मर्जी राखण्यासाठी मुख्यमंत्री मराठवाड्यातून लवकर गेले

औरंगाबाद: मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी हैदराबाद येथे जाण्यासाठी वर्षानुवर्ष ठरलेली कार्यक्रमाची वेळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलली. दिल्लीची मर्जी राखण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे लागलीच तिकडे, त्यांना मराठवाड्यापेक्षा हैदराबाद प्रिय आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर शिवसेनेकडून सकाळी ९ वाजता पुन्हा अभिवादन कार्यक्रम घेतला. (Marathwada Muktisangram Din )

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज सिद्धार्थ उद्यान येथील शहीद स्तंभास सकाळी ७ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केले. दरवर्षी अभिवादनाचा कार्यक्रम सकाळी ९ वाजता होतो, मात्र हैदराबाद येथे गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यक्रमास जाण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केवळ १५ मिनिटांत ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पाडला, अशी टीका शिवसेनेकडून होत आहे. यामुळे दरवर्षीप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारा कार्यक्रम झाला नाही. त्यांना महाराष्ट्र, मराठवाडयापेक्षा हैद्राबाद प्रिय आहे, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली. मुख्यमंत्री येथील कार्यक्रम करून हैदराबादला जाऊ शकले असते. मात्र, दिल्लीची मर्जी राखण्यासाठी कार्यक्रमाची वेळ बदलून ते हैदराबादकडे रवाना झाले, असेही दानवे म्हणाले.   

हा मराठवाड्याचा अपमान दरम्यान, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले की, दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी शासकीय कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाते. या कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार होतो. आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा अमृत महोत्सवी कार्यक्रम आहे. असे असताना मुख्यमंत्र्यानी मराठवाड्याच्या स्वातंत्र्यसंग्राम कार्यक्रमाची औपचारिकता 15 मिनिटात पूर्ण केल्याचे दिसून येते. मुख्यमंत्र्यानी मराठवाड्यातील जनतेचा स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAmbadas Danweyअंबादास दानवेEknath Shindeएकनाथ शिंदे