शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

मराठवाडा येतोय टंचाईच्या विळख्यात, १०० मि.मी.पावसाची तूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2023 13:31 IST

लहान-मोठ्या सर्व ८७७ प्रकल्पांत ३५ टक्के जलसाठा सध्या आहे. ९८ टक्के पेरण्या झालेल्या आहेत. ५७ गावांमध्ये ८४ टँकर्सने

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा आणि नाशिक विभाग टंचाईच्या विळख्यात येण्यास सुरुवात झाली आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत अलनिनोच्या प्रभावामुळे १०० कोटींचा टंचाई आराखडा तयार करून शासनाकडे पाठविला होता. मात्र, आता त्यात ५० कोटींची भर पडण्याची शक्यता आहे. १५० कोटी रुपयांचा संभाव्य आराखडा असेल.

मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी विभागाच्या जलसाठ्यांसह चारा व इतर उपलब्धततेचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. त्यानंतर बुधवारी विभागीय आयुक्तांनी ऑनलाईन जिल्हाधिकाऱ्यांकडून मराठवाड्याची परिस्थिती जाणून घेतली. विभागात पर्जन्यमानाची स्थिती समाधानकारक नाही. त्यामुळे पिकांच्या वाढीवर होणारे परिणाम तपासावेत. त्यासाठी मंडळनिहाय तपासण्या कराव्यात, चाऱ्याच्या उपलब्धतेचे नियोजन करून ठेवावे. जनावरांना लम्पी प्रतिबंधात्मक लसी देण्याच्या सूचना बुधवारी विभागीय आयुक्तांनी केल्या

५१ दिवस कोरडे२३ ऑगस्टपर्यंत मराठवाड्यात ५४ टक्के पाऊस झाला आहे. ४६३ मि.मी. म्हणजे ७५ टक्के पाऊस आजवर होणे अपेक्षित होते. १०० मि.मी.पावसाची तूट सध्या विभागात आहे. ४६८ पैकी १६९ मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. ८४ पैकी सरासरी ५१ दिवस कोरडे गेले आहेत. पावसाळा सुरू झाल्यानंतर पहिला खंड सरासरी १५ दिवसांचा, दुसरा खंड १८ दिवसांचा, तिसरा १६ तर चौथा खंड ९ दिवसांचा राहिला आहे. ३६ मंडळांत २५ टक्के, २०६ मंडळांत ५० टक्के, १४२ मंडळांत ७५ तर फक्त ८४ मंडळांत १०० टक्के पाऊस आजवर झाला आहे. लहान-मोठ्या सर्व ८७७ प्रकल्पांत ३५ टक्के जलसाठा सध्या आहे. ९८ टक्के पेरण्या झालेल्या आहेत. ५७ गावांमध्ये ८४ टँकर्सने पाणीपुरवठा सुरू आहे.

कमी पाऊस झाल्याने चिंता....मराठवाडा विभागात आतापर्यंत पर्जन्यमान कमी झाले आहे. आतापर्यंतच्या पावसाळ्यात ५१ दिवस कोरडे राहिलेले आहेत. पावसाने अधिक ओढ दिल्यास पर्यायी उपाययोजनांसाठी नियोजन, पीक नुकसानीचे पंचनामे, लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण यासाठी प्रशासनाने प्राधान्याने कामे करावीत.-मधुकरराजे आर्दड, विभागीय आयुक्त

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरी