शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

मराठवाड्यात मागील पाच वर्षांत पावसाळ्यात ३६९ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 16:10 IST

पावसाळा सुरू झाला असून विभागीय प्रशासनाने सर्व जिल्हा प्रशासनांना मान्सूनच्या अनुषंगाने घ्याव्या लागणाऱ्या खबरदारीबाबत सूचना केल्या आहेत.

ठळक मुद्देपूर, दरड कोसळणे, अपघातांचा समावेश१५७२ गावांसाठी सज्जतेचे निर्देश

औरंगाबाद : मराठवाड्यात मागील पाच वर्षांत पावसाळ्यात होणाऱ्या विविध अपघाती घटनांमध्ये ३६९ जणांचा बळी गेला आहे. यामध्ये पूर, दरड कोसळणे, वीज पडून  झालेल्या अपघाती घटनांचा समावेश आहे. पावसाळा सुरू झाला असून विभागीय प्रशासनाने सर्व जिल्हा प्रशासनांना मान्सूनच्या अनुषंगाने घ्याव्या लागणाऱ्या खबरदारीबाबत सूचना केल्या आहेत.

२०१५ मध्ये पुरात वाहून १७, वीज पडून ६९, भिंत पडून १ अशा ८७ जणांचा मृत्यू झाला.  २०१६ मध्ये ४३ जणांचा पुराने बळी घेतला, तर वीज आणि भिंत पडून ४४ जण दगावले. ८७ जणांचा बळी त्या वर्षी गेला. २०१७ मध्ये विभागात ८१ जणांचा बळी वरील अपघातांमध्ये गेला. २०१८ मध्ये सर्व घटनांमध्ये ३७ जणांचा बळी गेला. २०१९ साली ३५ जणांचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला. दरड कोसळून दोघांचा, तर ३३ जणांचा वीज पडून मृत्यू झाला. भिंत कोसळून व इतर अपघातांमध्ये ७ जण दगावण्यासह ७७ जणांचा मृत्यू २०१९ मध्ये झाला.

१५७२ गावांसाठी सज्जतेचे निर्देशयेणाऱ्या पावसाळ्यात नदीकाठच्या गावांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील गोदावरी नदीकाठच्या १५७२ गावांमध्ये प्राधान्याने विशेष नियंत्रण व्यवस्था तयार ठेवावी, असे आदेश मंगळवारी विभागीय प्रशासनाने सर्व जिल्हा प्रशासनांना दिले आहेत. 

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाDeathमृत्यूAccidentअपघात