शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

निजामाच्या पोलीस ठाण्यावर फडकावला तिरंगा; सशस्त्र लढाईत रजाकारांना कोलते पिंपळगावकरांनी आणले होते जेरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 13:38 IST

Marathawada Muktisangram Din : १५ ते २५ वयाच्या १५ ते २० जणांनी अचानक सावखेड्यात वसुलीसाठी आलेल्या रजाकारांवर गनिमी काव्याने हल्ला केल्याने त्यांना पळून जावे लागले.

ठळक मुद्देरजाकारांसोबतच्या लढाईत ३५ स्वातंत्र्यसेनानींना झाली होती अटकचार स्वातंत्र्यसेनानींना आले होते हौतात्म्य

- बापू सोळुंकेऔरंगाबाद : मराठवाडा मुक्तीसंग्रामात कोलते पिंपळगाववासीयांचे (ता. भोकरदन, जि. जालना) मोठे योगदान आहे. निजामाच्या तावडीतून मराठवाडा मुक्त करण्यासाठी पेटून उठलेल्या गावकरी आणि रजाकार यांच्यात २२ जून १९४८ रोजी सशस्त्र लढाई झाली. गावकऱ्यांनी गनिमी कावा पद्धतीने दारूगोळा आणि छोट्या बंदुकींच्या जोरावर मोठ्या हिमतीने रजाकारांशी दिवसभर चिवट झुंज दिली. या स्वातंत्र्यसमरात पिपंळगातील चार जणांना हौतात्म्य आले. सशस्त्र रजाकारांची संख्या जास्त असल्याने शेवटी त्यांनी गावांवर हल्ला करीत मोठे वाडे, गुरांच्या गोठ्यांना आगी लावल्या आणि ३५ तरुणांना पकडून नेले.

भारत स्वतंत्र झाल्यानंतरही वर्षभर मराठवाड्यावर हैदराबाद संस्थानचा राजा निजामाची सत्ता होती. आपणही स्वतंत्र व्हावे, यासाठी मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातील तरुण पेटून उठले होते. कोलते पिंपळगाव, कोलते टाकळी, धानोरा, रिधोरा, ही शेजारी शेजारी असलेली गावे. येथील लाला लक्ष्मीनारायण आणि दगडाबाई शेळके यांच्या प्रेरणेने मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यात ते उतरले होते. अनेक जण भूमिगत राहून काम करीत. १८ जून १९४८ रोजी रजाकाराचे सैनिक शेतसारा वसुलीसाठी पिंपळगावाजवळील सावखेडा गावात आले आहेत. त्यांनी गावांत दवंडी देऊन कर देण्यासाठी दादागिरी सुरू केली आहे. गावांतील दर्ग्याजवळ बोकूड कापून ते शिजवत असल्याची माहिती एका तरुणाने पिंपळगावात येऊन दिली. यानंतर पिंपळगावातील संपत भिल्ल या बंदूकधारीला सोबत घेऊन १५ ते २५ वयाच्या १५ ते २० जणांनी अचानक सावखेड्यात वसुलीसाठी आलेल्या रजाकारांवर गनिमी काव्याने हल्ला केल्याने त्यांना पळून जावे लागले.

या घटनेचा बदला घेण्यासाठी चार दिवसांनी २२ जून १९४८ राेजी सशस्त्र सैनिकांसह पिंपळगावावर चाल केली. रजाकार येतील, याची शाश्वती गावकऱ्यांना होती. यामुळे गावातील महिला, लहान मुले, मुलींना गावातील एका फकिराच्या वाड्यात लपवून ठेवण्यात आले. धाडसी तरुण दारूगोळ्यासह गढींवर जाऊन बसले होते. रजाकारांनी सिमेवरूनच गढीच्या दिशेने गोळीबार सुरू केला. गढीवरील तरूणांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत धुमश्चक्री झाली. यात दाजीबा काशीबा म्हस्के, केशवरा कोलते, पांडुरंग योगीराज बिनोरकर आणि दगडू वीर गोसावी यांना वीरमरण आले. या वेळी निजामांनी दिगंबरदादा, सर्जेराव अण्णा सोळुंके, दगडू रामराव सोळुंके, हिम्मतराव, परभतराव पाटील यांच्यासह सुमारे ३५ ते ४० जणांनी लाल लक्ष्मीनारायण आणि बाबूराव पाटील सोळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली ही लढाई लढली.

निजामाच्या पोलीस ठाण्यावर फडकावला तिरंगा ध्वजनिजामाचे हसनाबाद येथे पोलीस ठाणे होते. पिंपळगावातील काही धाडसी तरुणांनी मे १९४८ मध्ये रात्री हसनाबादला जाऊन त्या पोलीस ठाण्यांवरील निजामाचा झेंडा काढून तेथे तिरंगा ध्वज फडकावला होता. हा ध्वज पिंपळगावाच्या तरुणांनी फडकावल्याचे रजाकारांना समजले. तरुणांना पकडण्यासाठी त्यांनी प्रयत्नही केला. मात्र यात त्यांना यश आले नव्हते.

३५ तरुणांना पकडून नेले हर्सूल जेलमध्येधुमश्चक्रीनंतर गावात आल्यावर रजाकारांनी शामराव ठमाजी सोळुंके यांच्यासह गावातील तीन वाडे पेटवून दिले. अनेकांच्या गुरांचे गोठे आणि चारा पेटवून नुकसान केले. या वेळी त्यांनी ३५ तरुणांना अटक केली. त्यांना अटक केल्यानंतर पिंपळगाव येथून हर्सूल जेलपर्यंत मारहाण करीत नेण्यात आले. तेथे हे सर्व तरुण मराठवाडा मुक्त होईपर्यंत जेलमध्ये होते.

हुतात्मा स्मारकावर दरवर्षी ध्वजारोहणकोलते पिंपळगावकऱ्यांचे मराठवाडा मुक्तीसंग्राम लढाईचे योगदान लक्षात घेऊन १९८२ साली गावात हुतात्मा स्मारक बांधण्यात आले. या स्मारकाच्या देखभाल, दुरुस्तीकडे मात्र शासनाचे लक्ष नाही. स्वातंत्र्य दिन, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि प्रजासत्ताकदिनी तेथे गावकरी ध्वजारोहण करतात.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबाद