शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

मराठा क्रांती मोर्चाचे राज्य सरकारविरोधात एल्गार; सोमवारपासून करणार ढोल बजाओ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 16:32 IST

ऱाज्य , केंद्र आणि न्यायालय तीन मार्ग समाजासमोर आहे. या तिन्ही ठिकाणी लढाई लढण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देशासनाची भूमिका समजू द्या तोपर्यंत समाजबांधवांनी कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नयेआरक्षणाला स्थगिती मिळाली म्हणजे सर्व संपले असे गृहित धरू नये.

औरंगाबाद: मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यामुळे मराठा समाज हवालदिल झाला आहे. मराठा क्रांती मोर्चा सोमवारपासून राज्य सरकार आणि सर्वपक्षिय आमदार खासदारांच्या घरासमोर ढोल बजाओ आंदोलन करणार आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली. या निकालाच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाची महत्वपूर्ण राज्यस्तरीय बैठक आज औरंगाबादेत पार पडली. 

या बैठकीला विविध मराठा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची चिकित्सा करण्यात आली. यानंतर पुढील कायदेशीर मार्ग आणि आंदोलन याविषयी निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. ठोक मोर्चाचे रमेश केरे पाटील म्हणाले की, राज्य शासनाने मराठा समाजाच्या मागे उभे राहावे . शासनाची भूमिका समजू द्या तोपर्यंत समाजबांधवांनी कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये . आरक्षणाला स्थगिती मिळाली म्हणजे सर्व संपले असे गृहित धरू नये. संयम सोडुन कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन केले. 

किशोर चव्हाण म्हणाले ,पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. लोकसभा आणि राज्यसभेत यावर चर्चा होणे अपेक्षीत. मराठा समाजाच्या मुलानी आत्महत्या करायची नाही. ऱाज्य , केंद्र आणि न्यायालय असे तीन पर्यायी मार्ग क्रांतीमोर्चासमोर आहे . आरक्षणाला अंतरिम स्थगिती मिळाली म्हणजे सर्व मार्ग बंद झाले असा त्याचा अर्थ होत नाही . प्रकरण पाच न्यायमूर्तीच्या घटनापीठांकडे वर्ग करतांना केवळ मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याचा झटपट निर्णय झाला. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी तामिळनाडू सरकार आणि केंद्र सरकारच्या आरक्षणाच्या याचिका घटनापीठाकडे वर्ग करतांना आरक्षणाला स्थगिती दिली नव्हती.

या निकालाने मराठा समाजावर अन्याय झाल्याचे राजेंद्र दाते यांनी स्पष्ट केले. पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. लोकसभा आणि राज्यसभेत यावर अपेक्षीत. मराठा आरक्षणासाठी केंद्र आणि राज्य सरकार काय भूमिका घेते हे पाहावे लागेल. आरक्षणाला स्थगिती मिळाली म्हणून मराठा समाजाच्या मुलांनी आत्महत्या करायची नाही. ऱाज्य , केंद्र आणि न्यायालय तीन मार्ग समाजासमोर आहे. या तिन्ही ठिकाणी लढाई लढण्याचा निर्णय घेण्यात आला. आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयात टिकला पाहिजे याकरिता केंद्र सरकारने वकील नियुक्त करणे आवश्यक होते. यामुळे केंद्र सरकारची भूमिकाही महत्वाची आहे.

यावेळी पूजा मोरे, डॉ. शिवानंद भानुसे ,आप्पासाहेब कुढेकर , रवी काळे आदीनी मनोगत व्यक्त केले. मराठा समाज सोमवारपासून आमदार आणि खासदारांच्या घरासमोर ढोल बजाओ आंदोलन करणार असल्याचे यावेळी प्रसारमाध्यमाना सांगण्यात आले. पोलीस बंदोबस्त मराठा क्रांती मोर्चाची बैठक होणार असल्याचे कळताच पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. गुन्हेशाखेचे निरीक्षक अनिल गायकवाड, पो नि. संतोष पाटील , विशेष शाखेचे कंटाळे आदीसह अन्य अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाagitationआंदोलनMaratha Reservationमराठा आरक्षण