शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
2
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
3
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
6
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
7
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
8
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
9
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
10
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
11
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
12
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
13
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
14
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
15
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
16
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
17
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम उधळून लावण्याचा मराठा महासभेचा इशारा, राज्यस्तरीय बैठकीत झाला निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 3:14 PM

मराठा समाजाच्या मागण्यावर सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मराठा महासभेचे आयोजन करून यापुढील मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम उधळून लावण्याचा निर्णय राज्यस्तरीय महासभेत घेण्यात आला. 

ठळक मुद्दे मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी आता सरकारविरोधी वातावरण तयार करणे हा ऐकमेव पर्याय असल्याचे यावेळी सर्वानी नमूद केले.वर्षभर विविध मोर्चे काढूनही मराठा समाजाच्या मागण्या आजही जैसे थे असल्याने समाजात राज्य शासनाविरोधात प्रचंड चीड निर्माण झाली आहे.

औरंगाबाद: वर्षभर विविध मोर्चे काढूनही मराठा समाजाच्या मागण्या आजही जैसे थे असल्याने समाजात राज्य शासनाविरोधात प्रचंड चीड निर्माण झाली आहे. सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मराठा महासभेचे आयोजन करून यापुढील मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम उधळून लावण्याचा निर्णय २९ आॅक्टोबर रोजी औरंगाबादेतील गारखेडा परिसरातील एका मंगलकार्यालयात पार पडलेल्या राज्यस्तरीय महासभेत घेण्यात आला. 

कोपर्डीत घडलेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेनंतर ९आॅगस्ट २०१६ पासून राज्यभर मराठा क्र ांती मोर्चे काढण्यात आले. शेवटचा मोर्चा ९ आॅगस्ट रोजी मुंबईत पार पडला. या मोर्चानंतरही राज्यशासनाने मराठा समाजाच्या मागण्यांकडे सोडविण्यात आल्या नाही. यापार्श्वभूमीवर रविवारी शहरात राज्यस्तरीय मराठा महासभेचे आयोजन करण्यात आले.या सभेला राज्यभरातून आलेल्या मराठा समाजातील पदाधिका-यांनी मनोगत व्यक्त करताना राज्यशासनाकडून निर्णयास होत असलेल्या विलंबातून शासन आपला सयंम पहात असल्याचे नमूद करण्यात आले. राज्यशासनाला मराठा समाजाशी काहीही देणे-घेणे नाही,असे मुख्यमंत्र्यांचे वर्तन आहे. कोपर्डीतील पीडितेला अद्याप न्याय नाही, शेतक-यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या मागणीलाही बगल देण्यात आली, स्वामीनाथन आयोग लागू करण्याबाबत शासनाची उदासिनता आहे. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करून आरक्षणाच्या प्रमुख मागणीकडेही शासनाने दुर्लक्ष केले. या सर्व मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी आता सरकारविरोधी वातावरण तयार करणे हा ऐकमेव पर्याय असल्याचे यावेळी सर्वानी नमूद केले.

यापुढील मुख्यमंत्र्यांचे कार्यक्र म मराठा महासभा उधळून लावावा, राज्यातील सर्व आमदार आणि खासदार यांच्या दारासमोर जाऊन बसावे आणि मराठा समाजाच्या मागण्यांचे काय झाले याबाबत त्यांना जाब विचारावा. पुढील दोन वर्षात निर्णय न झाल्यास आगामी निवडणूकांमध्ये विद्यमान, आमदार,खासदार यांना मतदान करू नये, असे आवाहन मराठा समाजाला करावे,त्यासाठी राज्यभर  मराठा महासभेचे आयोजनन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. आजच्या महासभेसाठी तरुण, तरुणींची संख्या अधिक होती. 

मराठा क्र ांती मोर्चाच्या काही समन्वयकांनी आजच्या महासभेकडे पाठ फिरविली होती. संयोजकांनी महासभेचे आयोजन करताना विश्वासात न घेतल्याचा आरोप त्यांनी केला. आजच्या सभेला उपस्थित नसलेल्या आणि मराठा समाजासाठी तन-मन धनाने काम करणा-या प्रत्येकाला सोबत घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाAurangabadऔरंगाबाद