शहरं
Join us  
Trending Stories
1
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
2
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
5
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
6
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
7
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
8
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
9
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
10
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
11
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
12
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
13
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
14
बुध प्रदोष २०२६: कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा आणि कोणाचा सुरु होणार कठीण काळ?
15
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
16
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
17
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
18
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
19
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
20
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
Daily Top 2Weekly Top 5

गुरुद्वारा प्रशासकीय समितीच्या निष्क्रियतेमुळे अनेक समस्या

By admin | Updated: September 11, 2014 00:41 IST

अमरिकसिंघ वासरीकर, नांदेड नांदेड: गुरुद्वारा सचखंडच्या प्रशासनिक व्यवस्थेकरिता महाराष्ट्र शासनाने प्रशासन समितीची नियुक्ती केली

अमरिकसिंघ वासरीकर, नांदेडनांदेड: गुरुद्वारा सचखंडच्या प्रशासनिक व्यवस्थेकरिता महाराष्ट्र शासनाने प्रशासन समितीची नियुक्ती केली. परंतु प्रशासकीय समितीच्या निष्क्रीय कार्यपद्धतीमुळे नित्य उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यास बोर्ड प्रशासनाला अपयश येत असल्याचे पहावयास मिळत आहे.गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने धार्मिक, शैक्षणिक, वैद्यकीय व क्रीडा क्षेत्रात विविध उपक्रम राबविले जातात. महाराष्ट्र शासनाने गुरुद्वारा बोर्डाच्या प्रशासनाकरीता नुकतीच प्रशासकीय समिती गठीत केली. या समितीच्या अध्यक्षपदी सनदी अधिकारी विजय सतबीरसिंघ यांची नियुक्ती केली. या समितीच्या वतीने गुरुद्वारा बोर्डाचा कारभार पहावा, असे अपेक्षित आहे. परंतु अध्यक्षांना गुरुद्वाराच्या प्रशासनिक कामात लक्ष देण्याकरीता वेळ नसल्याने तेथे विविध समस्या निर्माण होत आहेत. बोर्ड प्रशासनाकडे शिरेपावचा असलेला साठा पूर्णपणे संपला असून नवीन खरेदीसंदर्भात निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे गुरुद्वाराच्या पूजा-अर्चनेत इतर साहित्य, रुमालेचा वापर करावा लागत आहे. यामुळे भाविकांत मोठा रोष निर्माण होत आहे. गुरुद्वारामध्ये व परिसरात लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. कॅमेऱ्यांच्या दुरुस्तीचा निर्णय देखील प्रलंबित आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेले गुरुगोविंदसिंघजी वास्तुसंग्रहालय अद्यापही पूर्णत्वास गेले नसून केवळ इमारत उभी करण्यात आली आहे. दशमेश हॉस्पिटल हे गुरुद्वारा प्रशासनामार्फत चालविण्यात येते. येथील लाखो रुपये खर्च करुन आणण्यात आलेली एक्सरे मशीन गेल्या अनेक दिवसांपासून चालकाच्याअभावी बंद पडून आहे. यामुळे येणाऱ्या रुग्णांना अनंत अडचणींना सामना करावा लागत आहे. प्रतिवर्षी दसरा उत्सव सचखंड येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे. याकरीता देश-विदेशातून लाखो भाविक येथे येतात.त्याकरीता मोठ्या प्रमाणावर व्यवस्थेचे नियोजन करावे लागते. उत्सवात सहभागी होण्याकरीता लहेंगसिंघांचे दल आपल्या घोडस्वारांसह सचखंड येथे दाखल होतात. येथे नित्य येणाऱ्या समस्या तत्काळ सोडविण्यात याव्यात व दसरा उत्सव निर्विघ्न संपन्न व्हावा, याकरीता तत्काळ निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी शीख समाजातून होत आहे.