शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

चणे आहेत, पण दात नाहीत! गेट अभावी अनेक कोल्हापुरी बंधारे राहणार कोरडेठाक

By विजय सरवदे | Updated: September 26, 2022 20:15 IST

पावसाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात अर्थात साधारपणे ऑक्टोबरच्या मध्यानंतर कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेट लावून पाणी अडविले जाते.

औरंगाबाद : रबीचे क्षेत्र वाढावे म्हणून जि. प. च्या सिंचन विभागाने जिल्ह्यात ५८५ कोल्हापुरी बंधारे उभारलेले आहेत. मात्र, अनेक कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेटच नसल्यामुळे यंदाही त्यातील पाणी अडवण्यास अडचण येणार आहे.

साधारपणे १९८८ पासून जिल्ह्यात कोल्हापुरी बंधारे उभारण्यात आले आहेत. पावसाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात अर्थात साधारपणे ऑक्टोबरच्या मध्यानंतर कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेट लावून पाणी अडविले जाते. मात्र, अनेक कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेट नसल्यामुळे हे पाणी वाहून जाण्याची शेतकऱ्यांनी भीती व्यक्त केली आहे. जर कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि गेट उपलब्ध झाल्यास सर्व बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा होऊ शकतो आणि साधारणपणे ६ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकते.

बंधाऱ्यांचे गेट गेले कुठे?कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेट नसल्याच्या तक्रारी मागील १५ ते २० वर्षांपासून सुरू आहेत. बंधाऱ्यांचे गेट नेमके गेले कुठे, बहुतांश जणांना या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. मात्र, जि. प. सिंचन विभागाने यासंदर्भात ‘लोकमत’ला सांगितले की, १०-१५ वर्षांपूर्वी काही गेट चोरीला गेले. त्यासंदर्भात गुन्हेही दाखल झाले. काही गेट पावसाळ्यात वाहून गेले. काही वाळूत बुजून गेले. पाण्यामुळे अनेक गेट कुजले. त्यामुळे आजघडीला १०३ बंधाऱ्यांसाठी ३०१३ गेटची आवश्यकता आहे.

गेट खरेदीचा प्रश्न अडला कुठे?काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या उपकर आणि जलयुक्त अभियानातून ४ हजार गेटची खरेदी करण्यात आली. तरही आणखी ३०१३ गेटची आवश्यकता आहे. यासाठी सिंचन विभागाने ३ कोटी ७६ लाख रुपयांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे (डीपीसी) सादर केला. पण ऐनवेळी राज्यात सत्ता बदल झाला आणि जिल्हा नियोजन समितीची बैठकच आतापर्यंत झाली नाही. येणाऱ्या डिसेंबर महिन्यात मागण्यात आलेला निधी पुनर्विनियोजनामध्ये मिळेल, अशी अपेक्षा सिंचन विभागाने व्यक्त केली आहे. डिसेंबरमध्ये पुनर्विनियोजनामध्ये निधी मंजूर होईल. त्यानंतर खर्चाची मंजुरी मिळेल व तेथून पुढे गेट खरेदीची प्रक्रिया सुरू होईल. अर्थात, यंदाही किमान १०३ कोल्हापुरी बंधाऱ्यांतील पाणी अडवता येणार नाही.

पाणी अडविण्याचे नियोजन काय?जिल्ह्यातील १०३ कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेटची आवश्यकता आहे. या बंधाऱ्यांपैकी काहींना ५, १०, १२ अशी गेटची गरज आहे. सर्वच बंधारे सताड उघडे आहेत असे नाही. त्यामुळे यंदा किमान ४०० बंधाऱ्यांना गेट लावून पाणी अडविले जाईल व ६ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे, असे अधिकारी सांगतात.

बंधाऱ्यांची स्थिती :- ५८५ कोल्हापुरी बंधारे- ५१६ बंधारे सुस्थितीत- १०३ बंधाऱ्यांना हवेत गेट- १५ हजार गेट जि.प.कडे आहेत- ३०१३ गेटची गरज- ३ कोटी ७६ लाखांच्या निधीची मागणी-४०० बंधाऱ्यांत पाणी अडविण्याचे नियोजन२५ बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची गरज

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प