शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
3
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
4
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
5
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
6
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
7
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
8
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
9
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
10
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
11
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
12
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
13
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
14
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
15
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
16
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
17
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
18
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
19
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
20
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब

चणे आहेत, पण दात नाहीत! गेट अभावी अनेक कोल्हापुरी बंधारे राहणार कोरडेठाक

By विजय सरवदे | Updated: September 26, 2022 20:15 IST

पावसाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात अर्थात साधारपणे ऑक्टोबरच्या मध्यानंतर कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेट लावून पाणी अडविले जाते.

औरंगाबाद : रबीचे क्षेत्र वाढावे म्हणून जि. प. च्या सिंचन विभागाने जिल्ह्यात ५८५ कोल्हापुरी बंधारे उभारलेले आहेत. मात्र, अनेक कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेटच नसल्यामुळे यंदाही त्यातील पाणी अडवण्यास अडचण येणार आहे.

साधारपणे १९८८ पासून जिल्ह्यात कोल्हापुरी बंधारे उभारण्यात आले आहेत. पावसाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात अर्थात साधारपणे ऑक्टोबरच्या मध्यानंतर कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेट लावून पाणी अडविले जाते. मात्र, अनेक कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेट नसल्यामुळे हे पाणी वाहून जाण्याची शेतकऱ्यांनी भीती व्यक्त केली आहे. जर कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि गेट उपलब्ध झाल्यास सर्व बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा होऊ शकतो आणि साधारणपणे ६ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकते.

बंधाऱ्यांचे गेट गेले कुठे?कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेट नसल्याच्या तक्रारी मागील १५ ते २० वर्षांपासून सुरू आहेत. बंधाऱ्यांचे गेट नेमके गेले कुठे, बहुतांश जणांना या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. मात्र, जि. प. सिंचन विभागाने यासंदर्भात ‘लोकमत’ला सांगितले की, १०-१५ वर्षांपूर्वी काही गेट चोरीला गेले. त्यासंदर्भात गुन्हेही दाखल झाले. काही गेट पावसाळ्यात वाहून गेले. काही वाळूत बुजून गेले. पाण्यामुळे अनेक गेट कुजले. त्यामुळे आजघडीला १०३ बंधाऱ्यांसाठी ३०१३ गेटची आवश्यकता आहे.

गेट खरेदीचा प्रश्न अडला कुठे?काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या उपकर आणि जलयुक्त अभियानातून ४ हजार गेटची खरेदी करण्यात आली. तरही आणखी ३०१३ गेटची आवश्यकता आहे. यासाठी सिंचन विभागाने ३ कोटी ७६ लाख रुपयांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे (डीपीसी) सादर केला. पण ऐनवेळी राज्यात सत्ता बदल झाला आणि जिल्हा नियोजन समितीची बैठकच आतापर्यंत झाली नाही. येणाऱ्या डिसेंबर महिन्यात मागण्यात आलेला निधी पुनर्विनियोजनामध्ये मिळेल, अशी अपेक्षा सिंचन विभागाने व्यक्त केली आहे. डिसेंबरमध्ये पुनर्विनियोजनामध्ये निधी मंजूर होईल. त्यानंतर खर्चाची मंजुरी मिळेल व तेथून पुढे गेट खरेदीची प्रक्रिया सुरू होईल. अर्थात, यंदाही किमान १०३ कोल्हापुरी बंधाऱ्यांतील पाणी अडवता येणार नाही.

पाणी अडविण्याचे नियोजन काय?जिल्ह्यातील १०३ कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेटची आवश्यकता आहे. या बंधाऱ्यांपैकी काहींना ५, १०, १२ अशी गेटची गरज आहे. सर्वच बंधारे सताड उघडे आहेत असे नाही. त्यामुळे यंदा किमान ४०० बंधाऱ्यांना गेट लावून पाणी अडविले जाईल व ६ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे, असे अधिकारी सांगतात.

बंधाऱ्यांची स्थिती :- ५८५ कोल्हापुरी बंधारे- ५१६ बंधारे सुस्थितीत- १०३ बंधाऱ्यांना हवेत गेट- १५ हजार गेट जि.प.कडे आहेत- ३०१३ गेटची गरज- ३ कोटी ७६ लाखांच्या निधीची मागणी-४०० बंधाऱ्यांत पाणी अडविण्याचे नियोजन२५ बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची गरज

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प