शहरं
Join us  
Trending Stories
1
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
4
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
5
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
6
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
7
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
8
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
9
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
10
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
11
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
12
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
13
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
14
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
15
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
16
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
17
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
18
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
19
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

चणे आहेत, पण दात नाहीत! गेट अभावी अनेक कोल्हापुरी बंधारे राहणार कोरडेठाक

By विजय सरवदे | Updated: September 26, 2022 20:15 IST

पावसाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात अर्थात साधारपणे ऑक्टोबरच्या मध्यानंतर कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेट लावून पाणी अडविले जाते.

औरंगाबाद : रबीचे क्षेत्र वाढावे म्हणून जि. प. च्या सिंचन विभागाने जिल्ह्यात ५८५ कोल्हापुरी बंधारे उभारलेले आहेत. मात्र, अनेक कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेटच नसल्यामुळे यंदाही त्यातील पाणी अडवण्यास अडचण येणार आहे.

साधारपणे १९८८ पासून जिल्ह्यात कोल्हापुरी बंधारे उभारण्यात आले आहेत. पावसाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात अर्थात साधारपणे ऑक्टोबरच्या मध्यानंतर कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेट लावून पाणी अडविले जाते. मात्र, अनेक कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेट नसल्यामुळे हे पाणी वाहून जाण्याची शेतकऱ्यांनी भीती व्यक्त केली आहे. जर कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि गेट उपलब्ध झाल्यास सर्व बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा होऊ शकतो आणि साधारणपणे ६ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकते.

बंधाऱ्यांचे गेट गेले कुठे?कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेट नसल्याच्या तक्रारी मागील १५ ते २० वर्षांपासून सुरू आहेत. बंधाऱ्यांचे गेट नेमके गेले कुठे, बहुतांश जणांना या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. मात्र, जि. प. सिंचन विभागाने यासंदर्भात ‘लोकमत’ला सांगितले की, १०-१५ वर्षांपूर्वी काही गेट चोरीला गेले. त्यासंदर्भात गुन्हेही दाखल झाले. काही गेट पावसाळ्यात वाहून गेले. काही वाळूत बुजून गेले. पाण्यामुळे अनेक गेट कुजले. त्यामुळे आजघडीला १०३ बंधाऱ्यांसाठी ३०१३ गेटची आवश्यकता आहे.

गेट खरेदीचा प्रश्न अडला कुठे?काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या उपकर आणि जलयुक्त अभियानातून ४ हजार गेटची खरेदी करण्यात आली. तरही आणखी ३०१३ गेटची आवश्यकता आहे. यासाठी सिंचन विभागाने ३ कोटी ७६ लाख रुपयांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे (डीपीसी) सादर केला. पण ऐनवेळी राज्यात सत्ता बदल झाला आणि जिल्हा नियोजन समितीची बैठकच आतापर्यंत झाली नाही. येणाऱ्या डिसेंबर महिन्यात मागण्यात आलेला निधी पुनर्विनियोजनामध्ये मिळेल, अशी अपेक्षा सिंचन विभागाने व्यक्त केली आहे. डिसेंबरमध्ये पुनर्विनियोजनामध्ये निधी मंजूर होईल. त्यानंतर खर्चाची मंजुरी मिळेल व तेथून पुढे गेट खरेदीची प्रक्रिया सुरू होईल. अर्थात, यंदाही किमान १०३ कोल्हापुरी बंधाऱ्यांतील पाणी अडवता येणार नाही.

पाणी अडविण्याचे नियोजन काय?जिल्ह्यातील १०३ कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेटची आवश्यकता आहे. या बंधाऱ्यांपैकी काहींना ५, १०, १२ अशी गेटची गरज आहे. सर्वच बंधारे सताड उघडे आहेत असे नाही. त्यामुळे यंदा किमान ४०० बंधाऱ्यांना गेट लावून पाणी अडविले जाईल व ६ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे, असे अधिकारी सांगतात.

बंधाऱ्यांची स्थिती :- ५८५ कोल्हापुरी बंधारे- ५१६ बंधारे सुस्थितीत- १०३ बंधाऱ्यांना हवेत गेट- १५ हजार गेट जि.प.कडे आहेत- ३०१३ गेटची गरज- ३ कोटी ७६ लाखांच्या निधीची मागणी-४०० बंधाऱ्यांत पाणी अडविण्याचे नियोजन२५ बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची गरज

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प