शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबाबतीत बोलायला नको होते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
3
'लोकसभेवेळी सर्वांचं आय लव्ह यू असतं. मात्र विधानसभेवेळी...', गुलाबराव पाटील यांचं सूचक विधान, रोख कुणाकडे, चर्चांना उधाण
4
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
5
मराठी-गुजराती वादाची 'राजकीय फोडणी'; घाटकोपरच्या 'त्या' सोसायटीतील रहिवाशी म्हणतात...
6
राजकारण तापले उद्धव सेनेच्या जिल्हाप्रमुख बडगुजर यांना हद्दपारची नोटीस
7
‘१५ सेकंदांसाठी पोलीस हटवा, कळणारही नाही की…’ नवनीत राणांचं ओवेसी बंधूंना आव्हान, एमआयएम संतप्त
8
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
9
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं खुलं पत्र; अभिनेत्री रेणुका शहाणेंना सुनावले खडे बोल
10
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरणीचं सत्र सुरूच; Hero Motocorp मध्ये तेजी, डॉ. रेड्डीज घसरला
11
सोनालीच्या जगण्याची होती ३० टक्के शक्यता; मृत्युच्या दारातून परतलेल्या अभिनेत्रीने सांगितला कॅन्सरचा प्रवास
12
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द
13
Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ
14
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त
15
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
16
संपादकीय: ऋण काढून सण! बचत घसरली, आता कोण वाचविणार...
17
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
18
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
19
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
20
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत

औरंगाबादमध्ये अनेक वसाहतींना पाणी मिळेना; मनपा अधिकारी म्हणतात, सर्व आलबेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2018 5:38 PM

शहरातील अनेक वसाहतींना मागील पाच ते आठ दिवसांपासून एक थेंबभरही पाणी देण्यात आलेले नाही.

औरंगाबाद : शहरातील अनेक वसाहतींना मागील पाच ते आठ दिवसांपासून एक थेंबभरही पाणी देण्यात आलेले नाही. उलट पाणी दिल्याचा अजब दावा महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी शुक्रवारी दिवसभर करताना दिसून आले. नागरिक आक्रमक होताच पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी बॅकफुटवर आले. आज पाणी आले नसले तरी उद्या येईल, टँकरने पाणी देण्यात येईल, असे सांगून निव्वळ टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला.

संपूर्ण शहराला तीन दिवसांआड पाणी देण्यात येत असल्याचा दावा मनपाकडून करण्यात येत आहे. हा दावा अत्यंत फोल असल्याचे निदर्शनास येत आहे. मंगळवारी आणि बुधवारी जायकवाडी, फारोळा येथे केबल जळाल्याने काही वेळ पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. युद्धपातळीवर काम करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आल्याचा दावा गुरुवारी मनपाच्या अधिकाऱ्यांनी केला. शहरातील काही वसाहतींचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आल्याचे मनपाने कळविले होते.

प्रत्यक्षात मनपाने एक दिवसाची घोषणा करून पाणीपुरवठा तीन ते चार दिवस पुढे ढकलला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तीन दिवसांआड नाही तर चौथ्या, पाच दिवशी नागरिकांना पाणी अपेक्षित होते. पाच दिवसांनंतरही अनेक वसाहतींना एक थेंबही पाणी देण्यात आले नाही. उलट संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा सुरळीत असल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाने केला आहे. नंदनवन कॉलनी, संगीता कॉलनी, पुंडलिकनगर आदी अनेक वसाहतींना मागील आठ दिवसांपासून पाणी नसल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर मनपाने पाणी दिल्याचा चक्क खोटा दावा केला. रात्री उशिरापर्यंतही पाणी न आल्याने कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांना विचारणा केली. उद्या टँकरने पाणी देण्याचे आश्वासन  दिले

कोणत्या वसाहतींना पाणी कधीपुंडलिकनगर : ५ दिवसांनंतरही पाणी नाहीनंदनवन कॉलनी : ८ दिवसांनंतरही पाणी नाहीशिवाजीनगर : ५ व्या दिवशी पाणी मिळालेगजानननगर : ४ दिवसांनंतर पाणी आलेशास्त्रीनगर : ६ दिवसांपासून पाणीच नाहीखिंवसरा पार्क : ४ दिवसांनंतर पाणी आले 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीAurangabadऔरंगाबाद