शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

औरंगाबादमध्ये अनेक वसाहतींना पाणी मिळेना; मनपा अधिकारी म्हणतात, सर्व आलबेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 17:39 IST

शहरातील अनेक वसाहतींना मागील पाच ते आठ दिवसांपासून एक थेंबभरही पाणी देण्यात आलेले नाही.

औरंगाबाद : शहरातील अनेक वसाहतींना मागील पाच ते आठ दिवसांपासून एक थेंबभरही पाणी देण्यात आलेले नाही. उलट पाणी दिल्याचा अजब दावा महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी शुक्रवारी दिवसभर करताना दिसून आले. नागरिक आक्रमक होताच पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी बॅकफुटवर आले. आज पाणी आले नसले तरी उद्या येईल, टँकरने पाणी देण्यात येईल, असे सांगून निव्वळ टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला.

संपूर्ण शहराला तीन दिवसांआड पाणी देण्यात येत असल्याचा दावा मनपाकडून करण्यात येत आहे. हा दावा अत्यंत फोल असल्याचे निदर्शनास येत आहे. मंगळवारी आणि बुधवारी जायकवाडी, फारोळा येथे केबल जळाल्याने काही वेळ पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. युद्धपातळीवर काम करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आल्याचा दावा गुरुवारी मनपाच्या अधिकाऱ्यांनी केला. शहरातील काही वसाहतींचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आल्याचे मनपाने कळविले होते.

प्रत्यक्षात मनपाने एक दिवसाची घोषणा करून पाणीपुरवठा तीन ते चार दिवस पुढे ढकलला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तीन दिवसांआड नाही तर चौथ्या, पाच दिवशी नागरिकांना पाणी अपेक्षित होते. पाच दिवसांनंतरही अनेक वसाहतींना एक थेंबही पाणी देण्यात आले नाही. उलट संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा सुरळीत असल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाने केला आहे. नंदनवन कॉलनी, संगीता कॉलनी, पुंडलिकनगर आदी अनेक वसाहतींना मागील आठ दिवसांपासून पाणी नसल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर मनपाने पाणी दिल्याचा चक्क खोटा दावा केला. रात्री उशिरापर्यंतही पाणी न आल्याने कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांना विचारणा केली. उद्या टँकरने पाणी देण्याचे आश्वासन  दिले

कोणत्या वसाहतींना पाणी कधीपुंडलिकनगर : ५ दिवसांनंतरही पाणी नाहीनंदनवन कॉलनी : ८ दिवसांनंतरही पाणी नाहीशिवाजीनगर : ५ व्या दिवशी पाणी मिळालेगजानननगर : ४ दिवसांनंतर पाणी आलेशास्त्रीनगर : ६ दिवसांपासून पाणीच नाहीखिंवसरा पार्क : ४ दिवसांनंतर पाणी आले 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीAurangabadऔरंगाबाद