शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये अनेक वसाहतींना पाणी मिळेना; मनपा अधिकारी म्हणतात, सर्व आलबेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 17:39 IST

शहरातील अनेक वसाहतींना मागील पाच ते आठ दिवसांपासून एक थेंबभरही पाणी देण्यात आलेले नाही.

औरंगाबाद : शहरातील अनेक वसाहतींना मागील पाच ते आठ दिवसांपासून एक थेंबभरही पाणी देण्यात आलेले नाही. उलट पाणी दिल्याचा अजब दावा महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी शुक्रवारी दिवसभर करताना दिसून आले. नागरिक आक्रमक होताच पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी बॅकफुटवर आले. आज पाणी आले नसले तरी उद्या येईल, टँकरने पाणी देण्यात येईल, असे सांगून निव्वळ टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला.

संपूर्ण शहराला तीन दिवसांआड पाणी देण्यात येत असल्याचा दावा मनपाकडून करण्यात येत आहे. हा दावा अत्यंत फोल असल्याचे निदर्शनास येत आहे. मंगळवारी आणि बुधवारी जायकवाडी, फारोळा येथे केबल जळाल्याने काही वेळ पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. युद्धपातळीवर काम करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आल्याचा दावा गुरुवारी मनपाच्या अधिकाऱ्यांनी केला. शहरातील काही वसाहतींचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आल्याचे मनपाने कळविले होते.

प्रत्यक्षात मनपाने एक दिवसाची घोषणा करून पाणीपुरवठा तीन ते चार दिवस पुढे ढकलला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तीन दिवसांआड नाही तर चौथ्या, पाच दिवशी नागरिकांना पाणी अपेक्षित होते. पाच दिवसांनंतरही अनेक वसाहतींना एक थेंबही पाणी देण्यात आले नाही. उलट संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा सुरळीत असल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाने केला आहे. नंदनवन कॉलनी, संगीता कॉलनी, पुंडलिकनगर आदी अनेक वसाहतींना मागील आठ दिवसांपासून पाणी नसल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर मनपाने पाणी दिल्याचा चक्क खोटा दावा केला. रात्री उशिरापर्यंतही पाणी न आल्याने कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांना विचारणा केली. उद्या टँकरने पाणी देण्याचे आश्वासन  दिले

कोणत्या वसाहतींना पाणी कधीपुंडलिकनगर : ५ दिवसांनंतरही पाणी नाहीनंदनवन कॉलनी : ८ दिवसांनंतरही पाणी नाहीशिवाजीनगर : ५ व्या दिवशी पाणी मिळालेगजानननगर : ४ दिवसांनंतर पाणी आलेशास्त्रीनगर : ६ दिवसांपासून पाणीच नाहीखिंवसरा पार्क : ४ दिवसांनंतर पाणी आले 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीAurangabadऔरंगाबाद