शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

Maratha Reservation : औरंगाबादमध्ये मराठा आरक्षणासाठी आणखी एकाची आत्महत्या  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2018 10:52 IST

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विजयनगर येथील कारभारी शेळके (४३) यांनी शुक्रवारी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विजयनगर येथील कारभारी शेळके (४३) यांनी शुक्रवारी (10 ऑगस्ट) आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. शेळके यांनी घरातील लोखंडी अँगलला गळफास घेत आत्महत्या केली. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शेळके यांनी आत्महत्येआधी एक चिठ्ठी लिहीली होती. यामध्ये मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याचा उल्लेख असल्याने परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

शेळके यांच्यावर श्रीराम फायनान्सचे २ लाखांचे कर्ज होते. या चिठ्ठीमध्ये मराठा आरक्षण आणि श्रीराम फायनान्सकडून कर्ज वसुलीसाठी होत असलेल्या दबावामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. तसेच माझ्या मरणानंतर माझ्या मुलांना आरक्षण द्या अशी मागणी शेळकेंनी चिठ्ठीत केली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने गुरुवारी बंद पुकारण्यात आला होता. त्यानंतर आज ही घटना घडल्याने विजयनगर येथे मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा  फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाAurangabadऔरंगाबाद