शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

‘स्वातंत्र्य संग्राम’ स्मारकाचे पावित्र्य कायम ठेवा, मराठवाडा मुक्तिसंग्राम पाठ्यपुस्तकात यावा - राज्यपाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 1:36 AM

मराठवाडा- हैदराबाद मुक्तिसंग्रामाची साक्ष देणारे क्रांतीचौक हे स्थळ आता स्वातंत्र्यसंग्राम स्मारकातील २०० फूट ध्वजस्तंभामुळे विश्वपटलावर ओळख निर्माण करण्यासाठी निघाले आहे. देशभक्ती, स्वाभिमान, आत्मविश्वास, आत्मगौरव वाढविणाºया ध्वजस्तंभाची गरिमा (पावित्र्य) कायम ठेवावी, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शनिवारी केले.

औरंगाबाद : मराठवाडा- हैदराबाद मुक्तिसंग्रामाची साक्ष देणारे क्रांतीचौक हे स्थळ आता स्वातंत्र्यसंग्राम स्मारकातील २०० फूट ध्वजस्तंभामुळे विश्वपटलावर ओळख निर्माण करण्यासाठी निघाले आहे. देशभक्ती, स्वाभिमान, आत्मविश्वास, आत्मगौरव वाढविणाºया ध्वजस्तंभाची गरिमा (पावित्र्य) कायम ठेवावी, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शनिवारी केले.क्रांतीचौक येथे अडीच कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या स्वातंत्र्यसंग्राम स्मारकातील ध्वजस्तंभाचे लोकार्पण राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत पार पडले.मराठवाडा- हैदराबाद मुक्तिसंग्राम हा हिंदू, मुस्लीम, शीख, इसार्इंचा स्वातंत्र्यलढा आहे. त्यामुळे या लढ्याची नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, यासाठी पाठ्यपुस्तकात त्याचा समावेश करावा, अशी अपेक्षादेखील राज्यपालांनी याप्रसंगी व्यक्त केली.वंदेमातरम म्हणायचे की नाही. राष्ट्रगीतासाठी उभे राहायचे की नाही, यावरून वाद होण्याचे प्रकार दुर्दैवाने आज घडत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, जे इतिहास विसरतात ते इतिहास निर्माण करू शकत नाहीत, असे सांगून राज्यपाल म्हणाले, निजामाला औरंगाबाद ताब्यात घ्यायचे होते; परंतु आपल्या पूर्वजांनी ते होऊ दिले नाही. १९४७ साली देश स्वतंत्र झाला; परंतु आम्ही निजामाच्या गुलामगिरी, अत्याचाराच्या जोखडात होतो. तत्कालीन शासनाने निजामाबरोबर करार केला, राष्ट्रनिर्मिती आणि वेगळे चलन यामुळे निजामाला जोश आला. त्याचे अत्याचार वाढल्यामुळे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पोलीस अ‍ॅक्शनमुळे मराठवाडा-हैदराबाद- कर्नाटक या प्रांतांचे विलीनीकरण भारतात झाले. विलीनीकरण झाले नसते तर आज या प्रांतांची स्थिती दयनीय असती. या प्रांतांविना भारताचा नकाशा अर्धवट राहिला असता.या स्वातंत्र्यसंग्रामात अनेक मुस्लीमवीरांनी बलिदान दिले आहे. तुरेबाजखान, मौलवी अलाउद्दीन, शोएबउल्ला खान, पवार यांचा उल्लेख करून ते म्हणाले, मुक्तिसंग्रामात ज्या वीरांनी बलिदान दिले, त्यांची स्मारके झाली पाहिजेत. स्वामी रामानंद तीर्थ, भाऊसाहेब वैशंपायन, अनंत भालेराव, विजेंयद्र काबरा, बाबासाहेब परांजपे, चंद्रगुप्त चौधरी, तारामती लड्डा, रमणभाई पारिख, दिगंबरराव बिंदू, देविसिंग चौहान यांच्या योगदानाचे स्मरणही यावेळी त्यांनी केले.विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महापौर नंदकुमार घोडेले, जि. प. अध्यक्ष देवयानी डोणगावकर, खा.रावसाहेब दानवे, खा.चंद्रकांत खैरे, आ.अतुल सावे, संजय शिरसाट, इम्तियाज जलील, सतीश चव्हाण, सुभाष झांबड, विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर, आयुक्त डी. एम. मुगळीकर, आयकर विभागाचे प्रधान आयुक्त शिवदयाल श्रीवास्तव, समितीचे सदस्य राम भोगले, मानसिंग पवार यांच्यासह राजकीय, उद्योग, प्रशासकीय अधिकारी व नागरिकांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन मुकुंद कुलकर्णी यांनी केले.क्रांतिचौकातच ध्वजस्तंभ का उभारला..?ध्वजस्तंभ उभारण्यासाठी शहरातील चार ते पाच जागांचा विचार करण्यात आला. त्यापैकी बहुतांश जागांचा वाद होता. त्यामुळे क्रांतिचौकातील ही जागा स्तंभासाठी निवडली. शहरात सर्व बाजूंनी हा ध्वज दिसेल, असे समिती सदस्य भोगले यांनी सांगितले. या उद्यानाची दुरवस्था झालेली होती, तसेच गैरवापरही होत असे. त्यामुळे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला, शिवाय लोकसहभागातूनच स्तंभ उभारण्याची संकल्पना पुढे आली. क्रांतिचौकातील ही जागा ऐतिहासिक आहे. राष्ट्रीय उठावापासून मराठवाडा मुक्तिसंग्रामापर्यंत या जागेचे महत्त्व अधोरेखित आहे, असे भोगले यांनी नमूद केले. तत्कालीन विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी या स्तंभ उभारणीसाठी पाठपुरावा केला. त्यांना या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले होते.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद