शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

'फुले- आंबेडकरांनी भीक मागून शाळा चालवल्या'; चंद्रकांत पाटलांच्या विधानाने वाद, लगेच खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 18:19 IST

राज्यातील  भाजप नेत्यांकडून महापुरुषांविषयी वादग्रस्त वक्तव्ये सुरूच आहेत. त्यात चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याची भर पडली आहे.

औरंगाबाद: राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यांवरील वाद अजूनही सुरूच आहे, तोच आता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या एका वक्तव्याने वादाला तोंड फूटले आहे. या देशात कर्मवीर भाऊराव पाटील- महात्मा फुले- बाबासाहेब आंबेडकरांनी भीक मागून शाळा चालवल्या, असे वादग्रस्त वक्तव्य मंत्री पाटील यांनी केले आहे. यावरून आता सर्वत्र टीका होत आहे. 

राज्यातील  भाजप नेत्यांकडून महापुरुषांविषयी वादग्रस्त वक्तव्ये सुरूच आहेत. त्यात चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याची भर पडली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संचलित पैठण येथील संतपीठाचा पहिला प्रमाणपत्र वितरण सोहळा आज पार पडला. यावेळी कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी अध्यक्षस्थानी होते. यावेळी पालकमंत्री संदीपान भुमरे रोहयो व फलोत्पादन मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, संतपीठाचे समन्वयक डॉ.प्रवीण वक्ते आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, तुम्ही अनुदानावर अवलंबून का रहाता? या देशामध्ये शाळा कुणी सुरू केल्या? कर्मवीर भाऊराव पाटील, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या सगळ्यांनी शाळा सुरू केल्या. या सगळ्यांनी शाळा सुरू करताना सरकारने त्यांना अनुदान दिले नाही. त्यांनी लोकांकडे भीक मागितली. शाळा सुरू करायच्या आहेत, आम्हाला पैसे द्या. त्याकाळी दहा रुपये द्यायचे. आता दहा-दहा कोटी रुपये देणारे आहेत, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. 

मंत्री पाटील यांनी केला खुलासा दरम्यान, यावर मंत्री पाटील यांनी यावर खुलासा केला आहे. त्याकाळी वापरातील माधुकरी म्हणजे काय? हा प्रचलित शब्द आहे. भीक मागून संस्था चालवल्या असे म्हटले जाते. मी त्याबाबत भाषणात पुढे सीएसआर शब्द वापरला आहे, असा बचाव मंत्री पाटील यांनी केला आहे. तसेच माझ्या भाषणात कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबद्दल कौतुकच केले आहे, असेही ते म्हणाले.  

वादग्रस्त वक्तव्यांची मालिकाचऔरंगाबादेतच काही दिवसांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ‘शिवाजी तो पुराने जमाने की बात है,’ असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यापूर्वी त्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावरून निर्माण झालेला वाद अजून शमलेला नाही. राज्यपाल हटावच्या मागणीसाठी १७ डिसेंबरला महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईत विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. आता चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याची त्यात भर पडली आहे.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलAurangabadऔरंगाबादBJPभाजपा