शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

मेहमूद गेटचे अवशेष निखळले; इतिहासतज्ज्ञांचा महापालिकेवर रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 13:52 IST

जगप्रसिद्ध पाणचक्कीसमोरील मेहमूद दरवाजाचे अवशेष शुक्रवारी सकाळी ७ वाजता निखळले.

ठळक मुद्देदरवाजाच्या आतील भागात असलेले लाकडी गेट अचानक निखळल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

औरंगाबाद : जगप्रसिद्ध पाणचक्कीसमोरील मेहमूद दरवाजाचे अवशेष शुक्रवारी सकाळी ७ वाजता निखळले. दरवाजाच्या आतील भागात असलेले लाकडी गेट अचानक निखळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. शहरात ५२ दरवाजांपैकी केवळ १४ दरवाजे शिल्लक राहिले आहेत. महापालिका प्रशासन या ऐतिहासिक दरवाजांकडे दुर्लक्ष करीत असल्याने वाताहत होत असल्याचा आरोप इतिहासतज्ज्ञांनी केला. 

पाणचक्कीच्या दर्शनी भागातच मेहमूद दरवाजा मागील ३५० वर्षांपासून दिमाखात उभा आहे. जगप्रसिद्ध पाणचक्की पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना याच दरवाजातून पुढे जावे लागते. खाम नदीवरील हा बुलंद दरवाजा पर्यटकांसाठीही आकर्षण केंद्र आहे. शुक्रवारी सकाळी ७ वाजता दरवाजातून नेहमीप्रमाणे वाहतूक सुरू असताना अचानक आतील लाकडी १५ फूट उंच आणि ८ फूट रुंद दरवाजा कोसळला. त्यामुळे परिसरात एकच धावपळ उडाली. सुदैवाने जेव्हा हा दरवाजा कोसळला तेव्हा गेटमधून एकही वाहन ये-जा नव्हती. नागसेनवन व विद्यापीठ परिसरात जाणारे विद्यार्थी तसेच कंपनीच्या कामगारांची सकाळी याच गेटमधून वर्दळ असते.

गेटच्या आतील भागातच लाकडी दरवाजा कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. शालेय विद्यार्थ्यांना मार्ग बदलून जावे लागले. सकाळी शासकीय कार्यालयांना ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांनाही मार्ग बदलून जावे लागले. सकाळी १० वाजता अग्निशमन दलाने लाकडी गेट बाजूला केल्यानंतर गेटमधील वाहतूक सुरळीत झाली. महापालिकेने यापूर्वीच दरवाजांकडे लक्ष दिले असते तर आज ही वेळच आली नसती, असा आरोप इतिहासतज्ज्ञ डॉ. रमजान शेख, डॉ. दुलारी कुरैशी आदींनी केला आहे. 

मनपाने युद्धपातळीवर दुरुस्ती करावीशहरातील मोजक्याच आणि शिल्लक राहिलेल्या दरवाजांकडे महापालिकेने नेहमीच दुर्लक्ष केले. त्यामुळे एकानंतर एक ऐतिहासिक गेट नामशेष होत आहेत. शुक्रवारी सकाळी महेमूद दरवाजातील लाकडी भाग सागवानाचा आहे. पावसाच्या पाण्यामुळे खालील भाग पूर्णपणे सडला होता. त्यामुळे दरवाजा निखळला. महापालिकेने युद्धपातळीवर दरवाजा जशास तसा दुरुस्त करून बसवावा. गेटमधील दुसऱ्या बाजूचा लाकडी दरवाजाही पडू नये म्हणून मनपाने दुरुस्ती सुरू करावी.

जीव जाण्याची वाट पाहताय का?मेहमूद दरवाजाला तडे गेले आहेत. त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे, ही बाब महापालिकेच्या निदर्शनास अनेकदा आणून दिली आहे. मनपाने गेटच्या दोन्ही बाजूने पूल उभारून रस्ता करण्याची योजना आखली आहे. त्याची अंमलबजावणी आजपर्यंत झाली नाही. उद्या गेट पडून निष्पाप नागरिकांचा जीव गेल्यावर महापालिका डागडुजी करणार आहे का?- डॉ. दुलारी कुरैशी, इतिहास व पर्यटनतज्ज्ञ

टॅग्स :Archaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाRainपाऊस