शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

मेहमूद गेटचे अवशेष निखळले; इतिहासतज्ज्ञांचा महापालिकेवर रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 13:52 IST

जगप्रसिद्ध पाणचक्कीसमोरील मेहमूद दरवाजाचे अवशेष शुक्रवारी सकाळी ७ वाजता निखळले.

ठळक मुद्देदरवाजाच्या आतील भागात असलेले लाकडी गेट अचानक निखळल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

औरंगाबाद : जगप्रसिद्ध पाणचक्कीसमोरील मेहमूद दरवाजाचे अवशेष शुक्रवारी सकाळी ७ वाजता निखळले. दरवाजाच्या आतील भागात असलेले लाकडी गेट अचानक निखळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. शहरात ५२ दरवाजांपैकी केवळ १४ दरवाजे शिल्लक राहिले आहेत. महापालिका प्रशासन या ऐतिहासिक दरवाजांकडे दुर्लक्ष करीत असल्याने वाताहत होत असल्याचा आरोप इतिहासतज्ज्ञांनी केला. 

पाणचक्कीच्या दर्शनी भागातच मेहमूद दरवाजा मागील ३५० वर्षांपासून दिमाखात उभा आहे. जगप्रसिद्ध पाणचक्की पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना याच दरवाजातून पुढे जावे लागते. खाम नदीवरील हा बुलंद दरवाजा पर्यटकांसाठीही आकर्षण केंद्र आहे. शुक्रवारी सकाळी ७ वाजता दरवाजातून नेहमीप्रमाणे वाहतूक सुरू असताना अचानक आतील लाकडी १५ फूट उंच आणि ८ फूट रुंद दरवाजा कोसळला. त्यामुळे परिसरात एकच धावपळ उडाली. सुदैवाने जेव्हा हा दरवाजा कोसळला तेव्हा गेटमधून एकही वाहन ये-जा नव्हती. नागसेनवन व विद्यापीठ परिसरात जाणारे विद्यार्थी तसेच कंपनीच्या कामगारांची सकाळी याच गेटमधून वर्दळ असते.

गेटच्या आतील भागातच लाकडी दरवाजा कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. शालेय विद्यार्थ्यांना मार्ग बदलून जावे लागले. सकाळी शासकीय कार्यालयांना ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांनाही मार्ग बदलून जावे लागले. सकाळी १० वाजता अग्निशमन दलाने लाकडी गेट बाजूला केल्यानंतर गेटमधील वाहतूक सुरळीत झाली. महापालिकेने यापूर्वीच दरवाजांकडे लक्ष दिले असते तर आज ही वेळच आली नसती, असा आरोप इतिहासतज्ज्ञ डॉ. रमजान शेख, डॉ. दुलारी कुरैशी आदींनी केला आहे. 

मनपाने युद्धपातळीवर दुरुस्ती करावीशहरातील मोजक्याच आणि शिल्लक राहिलेल्या दरवाजांकडे महापालिकेने नेहमीच दुर्लक्ष केले. त्यामुळे एकानंतर एक ऐतिहासिक गेट नामशेष होत आहेत. शुक्रवारी सकाळी महेमूद दरवाजातील लाकडी भाग सागवानाचा आहे. पावसाच्या पाण्यामुळे खालील भाग पूर्णपणे सडला होता. त्यामुळे दरवाजा निखळला. महापालिकेने युद्धपातळीवर दरवाजा जशास तसा दुरुस्त करून बसवावा. गेटमधील दुसऱ्या बाजूचा लाकडी दरवाजाही पडू नये म्हणून मनपाने दुरुस्ती सुरू करावी.

जीव जाण्याची वाट पाहताय का?मेहमूद दरवाजाला तडे गेले आहेत. त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे, ही बाब महापालिकेच्या निदर्शनास अनेकदा आणून दिली आहे. मनपाने गेटच्या दोन्ही बाजूने पूल उभारून रस्ता करण्याची योजना आखली आहे. त्याची अंमलबजावणी आजपर्यंत झाली नाही. उद्या गेट पडून निष्पाप नागरिकांचा जीव गेल्यावर महापालिका डागडुजी करणार आहे का?- डॉ. दुलारी कुरैशी, इतिहास व पर्यटनतज्ज्ञ

टॅग्स :Archaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाRainपाऊस