रोहित्रासाठी महावितरणपुढे ग्रामस्थांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 01:13 IST2017-10-27T01:13:39+5:302017-10-27T01:13:45+5:30
ग्रामीण भागातील नादुरूस्त व नवीन रोहित्रांसाठी ग्रामस्थांनी गुरूवारी महावितरण कार्यालयासमोर ठिय्या मांडला होता. वेळोवेळी मागणी करूनही रोहित्र दुरूस्ती किंवा बदलून दिले जात नाही. त्यामुळे ग्रामस्थ हैराण आहेत. शिवाय काही गावांनी बिलभरणा करूनही अद्याप रोहित्रांसाठी चकरा माराव्या लागत असल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले.

रोहित्रासाठी महावितरणपुढे ग्रामस्थांचा ठिय्या
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : ग्रामीण भागातील नादुरूस्त व नवीन रोहित्रांसाठी ग्रामस्थांनी गुरूवारी महावितरण कार्यालयासमोर ठिय्या मांडला होता. वेळोवेळी मागणी करूनही रोहित्र दुरूस्ती किंवा बदलून दिले जात नाही. त्यामुळे ग्रामस्थ हैराण आहेत. शिवाय काही गावांनी बिलभरणा करूनही अद्याप रोहित्रांसाठी चकरा माराव्या लागत असल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले.
मागील अनेक महिन्यांपासून रोहित्र दुरूस्ती व बदलून दिले जात नसल्याने ग्रामीण भागात अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. तसेच गावात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन सुरू असून वीजेमुळे व्यत्यय निर्माण होत आहे. महावितरणचे संबधित कर्मचारीही याकडे दुर्लक्ष करीत असून कार्यालयाच्या शेतकºयांना चकरा माराव्या लागत आहेत. महावितरणच्या अधिकाºयांना वेळोवेळी लेखी व तोंडी सांगूनही दुर्लक्ष केले जात असल्याचे शेतकरी व ग्रामस्थांतून सांगितले जात होते. बिलभरणा करूनही रोहित्र बदलून अथवा दुरूस्ती करून दिले जात नाही. २६ आॅक्टोबर रोजी जिल्हाभरातील शेतकरी व ग्रामस्थ रोहित्रांसाठी हिंगोली येथील महाविरण कार्यालयात आले होते. वसमत तालुक्यातील महागाव, सोमठाणा, कुरूंदा, टाकळगाव, सेनगाव तालुक्यातील जवळा बु. येथील ग्रामस्थ रोहित्रांच्या मागणीसाठी महावितरण कार्यालयात ठिय्या मांडून बसले होते. तर काही ठिकाणच्या डीपी वीज पडून जळून खाक झाल्या आहेत. वीज पडून जळालेल्या रोहित्रांचाही प्रश्न गंभीर असून तेही अद्याप बदलून दिले नाही. त्यामुळे ग्रामस्थांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.