शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra HSC result 2018 : औरंगाबाद विभागात मुलींची बाजी; सरासरी निकाल ८८.७४ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 17:20 IST

औरंगाबाद विभागाचा सरासरी निकाल ८८.७४ टक्के एवढा लागला. यात ९२.१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून, मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८६.७४ आहे

ठळक मुद्देऔरंगाबाद विभागात औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचा समावेश पाचही जिल्ह्यात मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ५. २७ टक्क्यांनी अधिक असल्याचे निकालातुन स्पष्ट झाले.

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या  उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षाचा (१२ वी) निकाल बुधवारी (दि.३०) दुपारी १ वाजता जाहीर झाला. औरंगाबाद विभागाचा सरासरी निकाल ८८.७४ टक्के एवढा लागला. यात ९२.१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून, मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८६.७४ असल्याची माहिती विभागीय मंडळाच्या अध्यक्षा सुगता पुन्ने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

औरंगाबाद विभागात सामाविष्ठ  असलेल्या औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा बुधवारी दुपारी निकाल जाहीर झाला. या निकालात परभणी जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली. परभणी जिल्ह्याचा सरासरी निकाल ८९.९० टक्के एवढा लागला. तर औरंगाबादचा ८९.१४ टक्के, बीडचा ८९.०८ टक्के, जालना ८७.४५ आणि हिंगोली जिल्ह्याचा निकाल ८६.४० टक्के एवढा लागला आहे. या पाचही जिल्ह्यात मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ५. २७ टक्क्यांनी अधिक असल्याचे निकालातुन स्पष्ट झाले.

गुणपत्रिकांचे वाटप १२ जून रोजी कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका व तपशीलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेखाचे वाटप विभागीय मंडळामार्फत मंगळवारी (दि.१२ जून) होणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका संबंधित महाविद्यालायात याच दिवशी दुपारी ३ वाजता होणार असल्याचे सुगता पुन्ने यांनी स्पष्ट केले. तर नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा मागील वर्षीप्रमाणे सप्टेंबर-आॅक्टोबर ऐवजी जुलै महिन्यातच घेण्यात येणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

आकडेवारी- औरंगाबाद विभागातील पाच जिल्ह्यात ११८१ कनिष्ठ महाविद्यालयातील ३७४ केंद्रावर परीक्षा झाली.- परीक्षेसाठी ६१ परिरक्षक, ३७४ केंद्र संचालक, ६६०० पर्यवेक्षक, ३० मुख्य नियामक, ८९७ नियामक, ५९९१ परीरक्षक कार्यरत होते.- परीक्षेसाठी एकुण १४३ विषय.

-परीक्षेत गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्या ३०१ विद्यार्थ्यांना पकडण्यात आले 

जिल्हानिहाय आकडेवारीजिल्हा            नोंदणी        हजेरी        उत्तीर्ण        टक्केवारीपरभणी         २२,६६४        २२,५८७        २०३०६         ८९.९०औरंगाबाद     ५९,७०१        ५९,६०९        ५३,१४१        ८९.१५बीड               ३७,६६२        ३७,५५६        ३३,४५५        ८९.०८जालना         २७,२३४        २७,१८२        २३,७७२         ८७.४५हिंगोली         १२,१९१        १२,१५२        १०,४९९        ८६.४०-------------------------------------------------------------------एकुण        १,५९,४५२     १,५९,०८६    १,४१,१७३        ८८.७४ 

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८examपरीक्षाMarathwadaमराठवाडाStudentविद्यार्थी