शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

Maharashtra HSC result 2018 : औरंगाबाद विभागात मुलींची बाजी; सरासरी निकाल ८८.७४ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 17:20 IST

औरंगाबाद विभागाचा सरासरी निकाल ८८.७४ टक्के एवढा लागला. यात ९२.१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून, मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८६.७४ आहे

ठळक मुद्देऔरंगाबाद विभागात औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचा समावेश पाचही जिल्ह्यात मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ५. २७ टक्क्यांनी अधिक असल्याचे निकालातुन स्पष्ट झाले.

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या  उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षाचा (१२ वी) निकाल बुधवारी (दि.३०) दुपारी १ वाजता जाहीर झाला. औरंगाबाद विभागाचा सरासरी निकाल ८८.७४ टक्के एवढा लागला. यात ९२.१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून, मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८६.७४ असल्याची माहिती विभागीय मंडळाच्या अध्यक्षा सुगता पुन्ने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

औरंगाबाद विभागात सामाविष्ठ  असलेल्या औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा बुधवारी दुपारी निकाल जाहीर झाला. या निकालात परभणी जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली. परभणी जिल्ह्याचा सरासरी निकाल ८९.९० टक्के एवढा लागला. तर औरंगाबादचा ८९.१४ टक्के, बीडचा ८९.०८ टक्के, जालना ८७.४५ आणि हिंगोली जिल्ह्याचा निकाल ८६.४० टक्के एवढा लागला आहे. या पाचही जिल्ह्यात मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ५. २७ टक्क्यांनी अधिक असल्याचे निकालातुन स्पष्ट झाले.

गुणपत्रिकांचे वाटप १२ जून रोजी कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका व तपशीलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेखाचे वाटप विभागीय मंडळामार्फत मंगळवारी (दि.१२ जून) होणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका संबंधित महाविद्यालायात याच दिवशी दुपारी ३ वाजता होणार असल्याचे सुगता पुन्ने यांनी स्पष्ट केले. तर नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा मागील वर्षीप्रमाणे सप्टेंबर-आॅक्टोबर ऐवजी जुलै महिन्यातच घेण्यात येणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

आकडेवारी- औरंगाबाद विभागातील पाच जिल्ह्यात ११८१ कनिष्ठ महाविद्यालयातील ३७४ केंद्रावर परीक्षा झाली.- परीक्षेसाठी ६१ परिरक्षक, ३७४ केंद्र संचालक, ६६०० पर्यवेक्षक, ३० मुख्य नियामक, ८९७ नियामक, ५९९१ परीरक्षक कार्यरत होते.- परीक्षेसाठी एकुण १४३ विषय.

-परीक्षेत गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्या ३०१ विद्यार्थ्यांना पकडण्यात आले 

जिल्हानिहाय आकडेवारीजिल्हा            नोंदणी        हजेरी        उत्तीर्ण        टक्केवारीपरभणी         २२,६६४        २२,५८७        २०३०६         ८९.९०औरंगाबाद     ५९,७०१        ५९,६०९        ५३,१४१        ८९.१५बीड               ३७,६६२        ३७,५५६        ३३,४५५        ८९.०८जालना         २७,२३४        २७,१८२        २३,७७२         ८७.४५हिंगोली         १२,१९१        १२,१५२        १०,४९९        ८६.४०-------------------------------------------------------------------एकुण        १,५९,४५२     १,५९,०८६    १,४१,१७३        ८८.७४ 

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८examपरीक्षाMarathwadaमराठवाडाStudentविद्यार्थी