शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Maharashtra HSC result 2018 : औरंगाबाद विभागात मुलींची बाजी; सरासरी निकाल ८८.७४ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 17:20 IST

औरंगाबाद विभागाचा सरासरी निकाल ८८.७४ टक्के एवढा लागला. यात ९२.१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून, मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८६.७४ आहे

ठळक मुद्देऔरंगाबाद विभागात औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचा समावेश पाचही जिल्ह्यात मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ५. २७ टक्क्यांनी अधिक असल्याचे निकालातुन स्पष्ट झाले.

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या  उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षाचा (१२ वी) निकाल बुधवारी (दि.३०) दुपारी १ वाजता जाहीर झाला. औरंगाबाद विभागाचा सरासरी निकाल ८८.७४ टक्के एवढा लागला. यात ९२.१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून, मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८६.७४ असल्याची माहिती विभागीय मंडळाच्या अध्यक्षा सुगता पुन्ने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

औरंगाबाद विभागात सामाविष्ठ  असलेल्या औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा बुधवारी दुपारी निकाल जाहीर झाला. या निकालात परभणी जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली. परभणी जिल्ह्याचा सरासरी निकाल ८९.९० टक्के एवढा लागला. तर औरंगाबादचा ८९.१४ टक्के, बीडचा ८९.०८ टक्के, जालना ८७.४५ आणि हिंगोली जिल्ह्याचा निकाल ८६.४० टक्के एवढा लागला आहे. या पाचही जिल्ह्यात मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ५. २७ टक्क्यांनी अधिक असल्याचे निकालातुन स्पष्ट झाले.

गुणपत्रिकांचे वाटप १२ जून रोजी कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका व तपशीलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेखाचे वाटप विभागीय मंडळामार्फत मंगळवारी (दि.१२ जून) होणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका संबंधित महाविद्यालायात याच दिवशी दुपारी ३ वाजता होणार असल्याचे सुगता पुन्ने यांनी स्पष्ट केले. तर नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा मागील वर्षीप्रमाणे सप्टेंबर-आॅक्टोबर ऐवजी जुलै महिन्यातच घेण्यात येणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

आकडेवारी- औरंगाबाद विभागातील पाच जिल्ह्यात ११८१ कनिष्ठ महाविद्यालयातील ३७४ केंद्रावर परीक्षा झाली.- परीक्षेसाठी ६१ परिरक्षक, ३७४ केंद्र संचालक, ६६०० पर्यवेक्षक, ३० मुख्य नियामक, ८९७ नियामक, ५९९१ परीरक्षक कार्यरत होते.- परीक्षेसाठी एकुण १४३ विषय.

-परीक्षेत गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्या ३०१ विद्यार्थ्यांना पकडण्यात आले 

जिल्हानिहाय आकडेवारीजिल्हा            नोंदणी        हजेरी        उत्तीर्ण        टक्केवारीपरभणी         २२,६६४        २२,५८७        २०३०६         ८९.९०औरंगाबाद     ५९,७०१        ५९,६०९        ५३,१४१        ८९.१५बीड               ३७,६६२        ३७,५५६        ३३,४५५        ८९.०८जालना         २७,२३४        २७,१८२        २३,७७२         ८७.४५हिंगोली         १२,१९१        १२,१५२        १०,४९९        ८६.४०-------------------------------------------------------------------एकुण        १,५९,४५२     १,५९,०८६    १,४१,१७३        ८८.७४ 

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८examपरीक्षाMarathwadaमराठवाडाStudentविद्यार्थी