शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

नोटाबंदीनंतर महाराष्ट्रातील दोन लाख कंपन्या बंद पडल्या - जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 18:04 IST

नोकऱ्या देण्याऐवजी नोकऱ्या गमवाव्या लागण्याचा जोरदार कार्यक्रम

औरंगाबाद : नोटाबंदीनंतर देशभरात ६ लाख कंपन्या बंद पडल्या आणि महाराष्ट्रात ही संख्या जवळपास दोन लाख कंपन्यांपेक्षाही अधिक आहे. म्हणजे  मोदींच्या काळात नोकऱ्या देण्याऐवजी नोकऱ्या गमावण्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे, याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लक्ष वेधले.

औरंगाबाद मध्य मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कदीर मौलाना यांच्या प्रचारार्थ हर्सूल येथे आयोजित सभेत ते काल रात्री बोलत होते. त्यांनी सांगितले की, मनमोहन सिंग पंतप्रधान असतानाही मंदी आली होती; पण मनमोहनसिंगांचे नेतृत्व इतके चांगले होते की, त्यावेळी युवकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या नाहीत. आज नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात मात्र नोकऱ्या देण्याऐवजी नोकऱ्या गमवाव्या लागण्याचा जोरदार कार्यक्रम सुरू आहे. 

औरंगाबादच्या स्कोडा कंपनीत जाऊन पाहा. जिथे शंभर गाड्या बनवल्या जात होत्या, तिथे आता २०-३० गाड्या बनवल्या जात असतील. हाच अनुभव बजाज आॅटोमध्येही येईल. किंबहुना देशातल्या कुठल्याही कंपनीत असाच अनुभव येईल. ही परिस्थिती भयावह असल्याची जाणीव जयंत पाटील यांनी करून दिली. २००९ च्या निवडणुकीत कदीर मौलाना हे अवघ्या काही मतांनी पराभूत झाले होते. त्यावेळी ते निवडून आले असते तर आजही मौलाना हेच आमदार राहिले असते, असे सांगत पाटील यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला विजयी करण्याचे आवाहन केले. अमोल मिटकरी, कदीर मौलाना, शहर काँग्रेसचे अध्यक्ष नामदेवराव पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष विजय साळवे, कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख, माजी उपमहापौर तकी हसन, लक्ष्मण औताडे, नसीर पटेल, राजू औताडे, शमीम पटेल, गफारभाई आदींची मंचावर उपस्थिती होती. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019aurangabad-central-acऔरंगाबाद मध्यNCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटीलAurangabadऔरंगाबाद