शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
2
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
3
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
4
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
5
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
6
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
7
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
8
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
9
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
10
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
11
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
12
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
13
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 
14
दिवाळीत ट्राय करा या फोटोशूट पोझ, दिसाल एकदम खास, प्रत्येक पोस्टवर होईल लाईक्सची बरसात
15
लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
16
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
17
Ajit Agarkar: शमी टीम इंडियामधून का बाहेर? रोहित- कोहली वर्ल्डकप खेळतील का? आगरकर म्हणाले.
18
विदर्भ हादरला! पतीसोबत पूजाचं बिनसलं, एक्स बॉयफ्रेंड शुभमसोबत पुन्हा प्रेमसंबंध अन् झाला भयंकर शेवट
19
'तिच्या'आवाजाला भुलला अन् दोन कोटी गमावून बसला; नाशिकच्या उद्योजकासोबत फेसबुकवर काय घडले?
20
IND vs AUS : कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्यावर रोहित शर्मा पहिल्यांदाच कोच गंभीर यांना भेटला अन्.... (VIDEO)

जिद्दी ! १० वर्षांच्या संघर्षानंतर आले मतदार यादीत नाव; मात्र ओळख पटवताना आले नाकीनऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 13:09 IST

२८ वर्षाऐवजी ५५ वर्ष वय आल्याने ओळख पटविण्यात अडचण 

ठळक मुद्दे   प्रशासनाने छळले : तरीही मतदान केल्याशिवाय माघार नाहीच

औरंगाबाद : एका नवमतदाराला त्याचे नाव मतदार यादीत दाखल करण्यासाठी तब्बल दहा वर्षे संघर्ष करावा लागला. महत्प्रयासाने मतदार यादीत नाव आले. मात्र, मतदानासाठी ओळख पटविताना ‘त्या’ मतदाराच्या अक्षरश: नाकीनऊ आल्याची आपबिती त्याने सांगितली.     

छावणीतील होलीक्रॉस इंग्रजी शाळेतील मतदान केंद्रावर नवीन मतदार संजय साहेबराव उमाप (२८) यांनी सांगितले की, त्यांचे वय १८ वर्षे झाल्यापासून गेली दहा वर्षे त्यांनी लोकसभा, विधानसभा आणि छावणी परिषदेच्या निवडणुकांच्या वेळी मतदार यादीत त्यांचे नाव दाखल करण्यासाठी नोंदणी केली. मात्र, त्यांचे नाव मतदार यादीत आले नाही. सध्याच्या विधानसभेच्या मतदार यादीत त्यांचे नाव यादी भाग १२२ मध्ये अनुक्रमांक १२४३ वर आहे. यावेळी तरी नक्की मतदान करता येईल, म्हणून त्यांना आनंद झाला.  मात्र, सोमवरी (दि.२१) प्रत्यक्ष मतदानासाठी गेल्यानंतर त्यांना वेगळाच अनुभव आला. मतदार यादीत त्यांचे वय ५५ वर्षे दर्शविले आहे. त्यामुळे मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे ओळखपत्राची मागणी केली. मतदार यादीत ५५ वर्षे वय दाखविल्याची महसूल कर्मचाऱ्यांची चूक असल्याचे संजयने सांगितले. वस्तुत: त्यांचे वय २८ वर्षे आहे. 

संजय साहेबराव उमाप हे ‘तेच’ असल्याचे पटवून देण्यासाठी त्यांनी मतदान केंद्रावरील पोलिंग एजंटची ओळख दिली. तोच संजय असल्याचेही एजंट आणि मतदानासाठी आलेल्या संजयच्या शेजाऱ्यांनी सांगितले. मात्र, शासनाने ठरवून दिलेल्या ओळखपत्रापैकी एक असल्याशिवाय मतदान करता येणार नाही, असे त्याला सांगण्यात आले. परिणामी, संजयला पुन्हा पायी ख्रिस्तनगर येथे त्याच्या घरी जाऊन ‘पॅन कार्ड’ आणून ओळख पटवून द्यावी लागली. ओळख पटविताना मात्र, त्याच्या नाकीनऊ आले. यापेक्षा मतदान न करता घरी जाण्याचा विचारही त्याच्या मनात आला; परंतु तसे न करता पुन्हा निर्धार करून तो मतदान केंद्रावर गेला. हे दिव्य पार पडल्यानंतर प्रत्यक्ष मतदान करण्यासाठी बोटाला शाई लावून पहिल्यांदाच मतदान केल्यानंतर ‘आता मी खऱ्या अर्थाने भारताचा नागरिक असल्याचा आलेला अनुभव’ अविस्मरणीय असल्याचे संजयने सांगितले. 

काही असे काही तसे...सुशिक्षित वर्गात दिवसेंदिवस मतदानाबाबत उदासीनता वाढत आहे. त्याची विविध कारणे आहेत. मतदार यादीत नाव नसणे, मतदान केंद्र बदलणे, दूरच्या मतदान केंद्रावर नाव असणे, यामुळे सुशिक्षित मतदार मतदानाकडे पाठ फिरवीत असल्याचे दिसते, तर ज्यांना मतदानाची उत्सुकता आहे, त्यांना रोखले जाते. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019aurangabad-central-acऔरंगाबाद मध्यVotingमतदान