शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

जिद्दी ! १० वर्षांच्या संघर्षानंतर आले मतदार यादीत नाव; मात्र ओळख पटवताना आले नाकीनऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 13:09 IST

२८ वर्षाऐवजी ५५ वर्ष वय आल्याने ओळख पटविण्यात अडचण 

ठळक मुद्दे   प्रशासनाने छळले : तरीही मतदान केल्याशिवाय माघार नाहीच

औरंगाबाद : एका नवमतदाराला त्याचे नाव मतदार यादीत दाखल करण्यासाठी तब्बल दहा वर्षे संघर्ष करावा लागला. महत्प्रयासाने मतदार यादीत नाव आले. मात्र, मतदानासाठी ओळख पटविताना ‘त्या’ मतदाराच्या अक्षरश: नाकीनऊ आल्याची आपबिती त्याने सांगितली.     

छावणीतील होलीक्रॉस इंग्रजी शाळेतील मतदान केंद्रावर नवीन मतदार संजय साहेबराव उमाप (२८) यांनी सांगितले की, त्यांचे वय १८ वर्षे झाल्यापासून गेली दहा वर्षे त्यांनी लोकसभा, विधानसभा आणि छावणी परिषदेच्या निवडणुकांच्या वेळी मतदार यादीत त्यांचे नाव दाखल करण्यासाठी नोंदणी केली. मात्र, त्यांचे नाव मतदार यादीत आले नाही. सध्याच्या विधानसभेच्या मतदार यादीत त्यांचे नाव यादी भाग १२२ मध्ये अनुक्रमांक १२४३ वर आहे. यावेळी तरी नक्की मतदान करता येईल, म्हणून त्यांना आनंद झाला.  मात्र, सोमवरी (दि.२१) प्रत्यक्ष मतदानासाठी गेल्यानंतर त्यांना वेगळाच अनुभव आला. मतदार यादीत त्यांचे वय ५५ वर्षे दर्शविले आहे. त्यामुळे मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे ओळखपत्राची मागणी केली. मतदार यादीत ५५ वर्षे वय दाखविल्याची महसूल कर्मचाऱ्यांची चूक असल्याचे संजयने सांगितले. वस्तुत: त्यांचे वय २८ वर्षे आहे. 

संजय साहेबराव उमाप हे ‘तेच’ असल्याचे पटवून देण्यासाठी त्यांनी मतदान केंद्रावरील पोलिंग एजंटची ओळख दिली. तोच संजय असल्याचेही एजंट आणि मतदानासाठी आलेल्या संजयच्या शेजाऱ्यांनी सांगितले. मात्र, शासनाने ठरवून दिलेल्या ओळखपत्रापैकी एक असल्याशिवाय मतदान करता येणार नाही, असे त्याला सांगण्यात आले. परिणामी, संजयला पुन्हा पायी ख्रिस्तनगर येथे त्याच्या घरी जाऊन ‘पॅन कार्ड’ आणून ओळख पटवून द्यावी लागली. ओळख पटविताना मात्र, त्याच्या नाकीनऊ आले. यापेक्षा मतदान न करता घरी जाण्याचा विचारही त्याच्या मनात आला; परंतु तसे न करता पुन्हा निर्धार करून तो मतदान केंद्रावर गेला. हे दिव्य पार पडल्यानंतर प्रत्यक्ष मतदान करण्यासाठी बोटाला शाई लावून पहिल्यांदाच मतदान केल्यानंतर ‘आता मी खऱ्या अर्थाने भारताचा नागरिक असल्याचा आलेला अनुभव’ अविस्मरणीय असल्याचे संजयने सांगितले. 

काही असे काही तसे...सुशिक्षित वर्गात दिवसेंदिवस मतदानाबाबत उदासीनता वाढत आहे. त्याची विविध कारणे आहेत. मतदार यादीत नाव नसणे, मतदान केंद्र बदलणे, दूरच्या मतदान केंद्रावर नाव असणे, यामुळे सुशिक्षित मतदार मतदानाकडे पाठ फिरवीत असल्याचे दिसते, तर ज्यांना मतदानाची उत्सुकता आहे, त्यांना रोखले जाते. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019aurangabad-central-acऔरंगाबाद मध्यVotingमतदान