शहरं
Join us  
Trending Stories
1
शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?
2
“मुंबईत कामे केली आहेत, सर्व जागा महायुती नक्की जिंकेल”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
3
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
4
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
5
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
6
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची संपत्ती किती? रिव्हॉल्व्हर, बंदूक, 12 किलो चांदी...
7
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
8
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
9
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
10
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
11
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
12
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
13
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
14
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
15
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
16
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
17
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
18
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
19
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
20
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे

Maharashtra Election 2019: विकासकामांकडे पाठ फिरवल्याने एमआयएम आली संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 4:40 PM

संतप्त नागरिक ठिकठिकाणी एमआयएमच्या उमेदवाराला विरोध दर्शवीत आहेत.

ठळक मुद्देनगरसेवक प्रचारातून गायब उमेदवारांसोबत नातेवाईक

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता फक्त चार दिवस शिल्लक राहिले आहेत; परंतु एमआयएमला प्रचारात अद्याप प्रभाव पाडता आलेला नाही. पक्षाच्या २४ नगरसेवकांनी मागील पाच वर्षांमध्ये विकासकामांकडे पाठ फिरवली. त्यामुळे उमेदवारांना ठिकठिकाणी नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. अनेक नगरसेवकांनी प्रचारातून अंग काढून घेतले आहे. पक्षातील अंतर्गत कलहाचा फायदा विरोधकांच्या पथ्यावर पडतो आहे.  

२०१४ मध्ये औरंगाबाद शहरातील मुस्लिम मतदारांनी एमआयएमला भरभरून मतदान केले. त्यामुळे औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात पक्षाला यश मिळाले. त्यापाठोपाठ झालेल्या महापालिका निवडणुकीत पक्षाचे तब्बल २५ नगरसेवक निवडून आले. मतदारांनी टाकलेला विश्वास एमआयएमला टिकवता आला नाही. अनेक वॉर्डांमध्ये विकासकामेच झाली नाहीत. त्यामुळे संतप्त नागरिक ठिकठिकाणी एमआयएमच्या उमेदवाराला विरोध दर्शवीत आहेत. अनेक वॉर्डांमध्ये, तर उमेदवारास प्रचारासाठी पायही ठेवू दिला नाही. पक्ष संकटात असताना नगरसेवक पुढे येऊन परिस्थितीचा मुकाबला करायला तयार नाहीत. उमेदवार वॉर्डात आल्यावर त्याच्यासोबत औपचारिकता म्हणून नगरसेवक फिरत आहेत. उमेदवारांची पाठ फिरली की, नगरसेवकही प्रचाराकडे पाठ फिरवीत आहेत. पक्षात नगरसेवकांचेही दोन गट पडले आहेत.

एका गटाचे नगरसेवक दुसऱ्या नेत्याचे नेतृत्व मान्य करीत नाहीत. पक्षातील अंतर्गत कलह बराच वाढला आहे. मतदानासाठी फक्त ६ दिवस शिल्लक असतानाही तिन्ही मतदारसंघांत पक्षाच्या उमेदवारांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. पक्षप्रमुख असदोद्दीन ओवेसी १७ आॅक्टोबरपासून शहरात तळ ठोकून बसणार आहेत. पदयात्रा, जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. ते आल्यानंतरच परिस्थिती सुधारेल, अशी उमेदवारांना आशा आहे. तोपर्यंत विरोधक प्रचारात बाजी मारणार आहेत.

जातीयवादी शक्तींसोबत हात मिळवणीचे परिणामएमआयएम पक्षाच्या नेत्यांनी आजपर्यंत जातीयवादी शक्तींचा कडाडून विरोधाचा आभासच निर्माण केला. मागील पाच वर्षांमध्ये महापालिकेत एमआयएमने जातीयवादी शक्तींसोबत थेट हातमिळविणीच केली.  त्याचेही परिणाम या विधानसभा निवडणुकीत एमआयएमला त्रासदायक ठरत आहेत. स्थायी समितीचा सभापती निवडताना एमआयएमने शिवसेनेसमोर उमेदवारच उभा केला नव्हता. मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांच्यावर सेना-भाजपने अविश्वास ठराव आणल्यावर एमआयएमने युतीला साथ दिली होती. अलीकडेच झालेल्या औरंगाबाद- जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अंबादास दानवे यांना एमआयएम नगरसेवकांनी मतदान केले होते.

जावेद कुरैशी फॅक्टरऔरंगाबाद मध्य विधानसभा मतदरसंघातून एमआयएमचे माजी जिल्हाध्यक्ष जावेद कुरैशी यांना तिकीट मिळेल असे कार्यकर्त्यांना वाटत होते. मात्र, कुरैैशी यांना तिकीट मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी अगोदर बंडखोरी केली. नंतर धर्मगुरूंच्या आदेशावरून माघारही घेतली. जावेद कुरैशी पुन्हा एमआयएम पक्षात सक्रिय होतील, असे वाटले होते. मात्र, त्यांनी पक्षापासून दूर राहणे पसंत केले आहे. गुरुवारी सायंकाळी पक्षप्रमुख शहरात येत आहेत. ते कुरैशी यांच्याबाबत कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनAurangabadऔरंगाबादaurangabad-central-acऔरंगाबाद मध्यaurangabad-east-acऔरंगाबाद पूर्वaurangabad-west-acऔरंगाबाद पश्चिम