शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
2
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
3
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
4
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
5
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
6
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
7
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
8
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
9
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
10
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
11
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
12
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
13
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
14
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
15
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
16
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
17
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
18
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
19
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
20
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल

Maharashtra Election 2019 : धरलं तर चावतंय अन् सोडलं तर पळतंय...! हर्षवर्धन प्रकरणात शिवसेनेची झाली कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 6:43 PM

Aurangabad Election 2019 : उत्तर दिल्यास जाधव यांना सामाजिक लाभ होईल, अशी भीती शिवसेनेला वाटू लागली आहे.

ठळक मुद्देनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. त्याचे पडसाद वेगळ्या प्रकारे उमटतील

औरंगाबाद : कन्नड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या शब्दात टीका केल्यामुळे शिवसेना संतापली आहे; परंतु संतापापलीकडे शिवसेनेला सध्या काहीही करता येत नाही. जाधव यांना जशास तसे उत्तर दिल्यास त्याचा फायदा सेनेऐवजी जाधव यांनाच होईल. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. त्याचे पडसाद वेगळ्या प्रकारे उमटतील, अशी भीती शिवसेनेला वाटू लागली आहे. त्यामुळे ‘धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय’अशा प्रकारची कोंडी शिवसेनेची जाधव यांच्या प्रकरणात होऊन बसली आहे. 

जाधव यांनी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून शिवसेनेला आव्हान दिले. लोकसभेच्या निकालाची कारणमीमांसा करताना काय घडले हे सर्वपरिचित आहे. लोकसभेत शिवसेनेच्या पराभवाचे शल्य पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनातून जाण्यास तयार नाही. त्यांनी कन्नड आणि औरंगाबादमध्ये १० आॅक्टोबरच्या सभेत जाधव यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या टीका केली. येथील भगवा खाली उतरण्यास जाधव जबाबदार असल्याचा हल्ला ठाकरे यांनी चढविला. त्या टीकेचे उत्तर देताना जाधव यांनी कन्नडमधील एका प्रचार सभेत ठाकरेंबाबत खालचे शब्द वापरले. यातूनच शिवसेनाविरुद्ध जाधव असे चित्र उभे राहिले आहे. बुधवारी रात्री जाधव यांच्या घरावर हल्लादेखील याच प्रकरणातून झाला. 

शिवसेनेच्या औरंगाबादेतील पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रारीदेखील दिल्या. हे सगळे झाले तरी शिवसेना जाधव यांना थेट उत्तर देऊ शकत नाही. तसे उत्तर दिल्यास जाधव यांना सामाजिक लाभ होईल, अशी भीती शिवसेनेला वाटू लागली आहे. त्यामुळे इतर मतदारसंघातदेखील वेगळाच संदेश जाईल. परिणामी सबुरीच्या भूमिकेतून शिवसेना या प्रकरणाकडे सध्या तरी पाहत आहे.

Maharashtra Election 2019 : हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

पाच वर्षे जमलेच नाहीमागील ५ वर्षे जाधव यांनी कन्नड मतदारसंघात शिवसेनेकडून काम केले; परंतु ते काम करीत असताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि त्यांच्यात फारसे सख्ख्य राहिले नाही. मतदारसंघात खैरे लुडबुड करीत असल्याचा आरोप त्यांनी वारंवार केला. त्यातूनच बाजार समिती, नगरपालिका, पंचायत समितीच्या निवडणुकीत जाधव यांनी शिवसेनेच्या विरोधात जाऊन काम केले. स्वत:चे पॅनल उभे करून त्यांनी शिवसेनेला आव्हान दिले. कालांतराने त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडून स्वत:चा पक्ष स्थापन केला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kannad-acकन्नडHarshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधवShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019