शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

Maharashtra Election 2019 : औरंगाबाद जिल्ह्यात मतदानासाठी आल्या ९२९१ शाईच्या बाटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 13:39 IST

२८ लाख ५० हजार मतदारांच्या बोटावर लागेल शाई

ठळक मुद्दे३०३७ मतदान केंद्र आहेत जिल्ह्यात  प्रत्येक बुथवर दोन बाटल्या

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाने मुंबईहून जिल्ह्यात ९२९१ शाईच्या बाटल्या पाठविल्या आहेत. मतदान केल्याची निशाणी म्हणून जिल्ह्यातील २८ लाख ४९ हजार ७५५ मतदारांच्या बोटावर शाई लावण्यात येणार आहे. उल्लेखनीय म्हणजे ५ महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीत ३४ हजार ४५६ नवीन मतदारांची संख्या वाढली आहे. 

विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. हळूहळू प्रचाराचा पारा चढत आहे. २१ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात मतदान होणार आहे. अवघ्या १० दिवसांवर मतदानाची तारीख येऊन ठेपल्याने निवडणूक विभागात लगीनघाई सुरूझाली आहे. मतदानासाठी लागणारी सर्व स्टेशनरी साहित्य आणण्यात आले आहे. सर्व स्टेशनरी जिल्ह्यातील १० निवडणूक निर्णय कार्यालयांकडे पाठविली जात आहे. मतदान केल्यानंतर मतदारांच्या तर्जनीवर निळी शाई लावण्यात येते. जिल्ह्यात ३०३७ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक बुथवर दोन शाईच्या बाटल्या ठेवण्यात येणार आहे. एका बाटलीत १० मिली निळी शाई असते. एकाबाटलीमधून किमान ३५० मतदारांच्या बोटावर शाई लावण्यात येते. यासाठी मुंबईहून ९२९१ शाईच्या बाटल्या आणण्यात आल्या (९३ लिटर) आहेत. जिल्ह्यातील २८ लाख ४९ हजार ७५५ मतदारांच्या बोटावर शाई लावण्यात येणार आहे. एकदा बोटावर लावण्यात आलेली शाई कमीत कमी महिनाभर पुसत नाही. लोकसभा निवडणुकीत ज्यांनी मतदान केले त्यांच्या बोटावरील शाई आता मिटली आहे. या शाईमुळे बोगस मतदानाला आळा बसला आहे. 

बोटावर शाईने आखली जाते उभी रेषा २००४ मधील निवडणुकीच्या वेळी मतदान करणाºया मतदारांच्या बोटावर निळ्या शाईचा केवळ एक ठिपका लावण्यात येत होता. मात्र,२००६ मध्ये निवडणूक आयोगाने ठिपक्याऐवजी उभी रेषा आखण्याचे निर्देश दिले. अर्ध्या नखावर व अर्ध्या बोटाच्या कातडीवर अशी उभी रेषा मारली जात आहे. त्यामुळे शाई जास्त लागत आहे. 

१९६२ च्या निवडणुकीत पहिल्यांदा शाईचा वापर देशात सर्वप्रथम १९६२ च्या लोकसभा निवडणुकीत मतदान करणाºया मतदारांच्या बोटावर शाई लावण्यात आली होती. तेव्हापासून सर्व निवडणुकीत शाईचाच वापर करण्यात येत आहे. खास मतदानावेळी वापरण्यात येणारी शाई म्हैसूर येथील एका वॉर्निश कंपनीमध्ये तयार करण्यात येते. भारतात उत्पादित या शाईचा वापर २५ देश त्यांच्या निवडणुकीत करीत असतात.

१० मिली निळी शाई एका बाटलीत असते. ३५० मतदारांच्या बोटावर एका बाटलीमधून शाई लावतात.२८ लाख ४९ हजार ७५५ मतदारांच्या बोटावर शाई लावण्यात येणार आहे.शाई बोटावर लावल्यानंतर १५ सेकंदात तिचा ओलसरपणा जातो. ही शाई पुसता येत नाही.शाई लावल्यानंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो.मतदान अधिकारी मतदाराच्या डाव्या तर्जनीवर लावलेल्या शाईची तपासणी करतात. डाव्या तर्जनीची तपासणी करून देणारी व्यक्ती मतदानासाठी अपात्र ठरू शकते.एखाद्या मतदाराला डाव्या हाताची तर्जनी नसेल, तर त्या व्यक्तीच्या डाव्या हातावरील कोणत्याही बोटाला शाई लावली जाते. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019AurangabadऔरंगाबादVotingमतदान