शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शेतकऱ्यांना बसणार १५ हजार कोटींचा फटका; निवडणुकीच्या प्रचारातून मूळ मुद्दाच गायब 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 18:28 IST

निवडणुकीच्या धामधुमीत शेती आणि शेतकऱ्यांच्या मूळ मुद्याकडे दुर्लक्ष

ठळक मुद्दे यावर्षी कापसाचे, रुईचे दर अमेरिका व जगाच्या बाजारात घटले आहेत

औरंगाबाद : आर्थिक मंदीच्या संकटामुळे कापड उद्योगाकडून कापसाची मागणी घटत आहे. परिणामी राज्यासह मराठवाड्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना १० ते १५ हजार कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या धामधुमीत शेती आणि शेतकऱ्यांच्या मूळ मुद्याकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका होत आहे. 

देशातील कापसाचे उत्पादन मागच्या वर्षापर्यंत सरासरी ३ कोटी ६० ते ८० लाख गाठी इतके होत आहे. राज्यात ६० ते ८० लाख गाठींचे उत्पादनाचे प्रमाण आहे. गेल्यावर्षी जगासह देशात सरकी ढेपीचे दर प्रतिक्विंटल ३ हजार २०० रुपयांपर्यंत पोहोचले. त्यामुळे कापसाला प्रतिक्विंटल ५८०० रुपये दर मिळाला. तथापि, यावर्षी कापसाचे, रुईचे दर अमेरिका व जगाच्या बाजारात घटले आहेत. 

सरकी व ढेपीचे दरही कमी होण्याचे संकेत आहेत. यामुळे मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाचे दर २ हजार रुपयांनी कमी होऊन ते यावर्षी ५८०० रुपयांवरून ते ३५०० रुपये प्रतिक्विंटलच्या खाली आले आहेत. बाजारात कापसाला अपेक्षित दर मिळणार नसल्याने कापूस पणन महासंघ तसेच सीसीआय (कॉटन कॉर्पोरेशन आॅफ इंडिया) कडेच कापसाचा ओघ वाढेल, असे असताना सरकारी यंत्रणा मात्र १५ नोव्हेंबरपर्यंत कापूस खरेदी सुरूकरणार नाहीत. जर निवडक संकलन केंद्रांवर खरेदी सुरूकेली तरी प्रचंड जाचक अटी टाकतील, अशी भीती वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी  यांनी व्यक्त केली आहे. 

निवडणुकीच्या धामधुमीत कुणी लक्ष देईना देशात सर्वाधिक कापूस लागवड महाराष्ट्रात होते. राज्यात पाच वर्षांपासून सरासरी ४० लाख हेक्टरवर कपाशीची लागवड होत आली आहे. विदर्भ, मराठवाडा, खान्देशसह पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश शेतीचे अर्थकारण कापूस पिकावरच अवलंबून आहे. सुमारे १० टक्के क्षेत्रावरच पूर्वहंगामी कापूस लागवड असते. गेली चार ते पाच वर्षे कापूस उत्पादकांसाठी खडतर गेली. मागील वर्षी राज्यात २०१८-१९ च्या हंगामात ४२.५४ लाख हेक्टर क्षेत्रात कापूस लागवड करण्यात आली होती. उत्पादन केवळ ७१ लाख गाठी झाले. उत्पादकता २८३.७३ किलोग्रॅम प्रतिहेक्टर इतकी कमी आहे. कॉटन असोसिएशन आॅफ इंडियाच्या अहवालात या अल्प उत्पादकतेकडे लक्ष वेधण्यात आले आहे. मात्र एकही नेता, सत्तेतील व विरोधी बाकावरील राजकीय पक्ष या विषयावर बोलत नाही याची खंत वाटते, असे मत तिवारी यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Aurangabadऔरंगाबादvidhan sabhaविधानसभा