शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

औरंगाबाद पूर्व व पश्चिममध्ये काँग्रेसचे उमेदवार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 17:35 IST

काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी गृहीत धरली जात आहे.

ठळक मुद्देजागा आघाडीतल्या मित्र पक्षाला सुटते की काय, अशी परिस्थिती आहे. युतीच्या भवितव्यावर चित्र

औरंगाबाद : आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार राहतील, याचे अंदाज बांधले जात आहेत. तद्वतच औरंगाबाद पूर्व आणि पश्चिम मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार कोण राहतील, याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा नुकताच औरंगाबादचा दौरा झाला. ते ज्या पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्यास होते, तेथे काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा राबता राहिला व राजकीय खलबतेही झाली. काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी गृहीत धरली जात आहे. मतदारसंघ झाला तेव्हापासून औरंगाबाद पूर्ववर काँग्रेसने ताबा मिळवला. राजेंद्र दर्डा यांच्या रूपाने विकासाभिमुख आमदार व कर्तृत्ववान मंत्री मिळाले. मागच्या वेळीही तेच या मतदारसंघातून लढले होते. यावेळी कोण? असा सवाल उपस्थित झाला आहे.काँग्रेसने घेतलेल्या मुलाखतीसाठी उमेदवार आलेच नाहीत, असे नाही; पण हमखास विजय मिळवू शकेल, असा एकही चेहरा सध्या तरी काँग्रेसकडे दिसत नाही. त्यामुळेच ही जागा आघाडीतल्या मित्र पक्षाला सुटते की काय, अशी परिस्थिती आहे. 

शरद पवार यांना काँग्रेसचे जे पदाधिकारी जाऊन भेटले, त्यांनीही पूर्व आणि कन्नड राष्ट्रवादीला सोडून त्या बदल्यात पैठण आणि मध्य काँग्रेसला देण्यात यावे, असा प्रस्ताव मांडल्याचे समोर येत आहे. त्यावरून काँग्रेसअंतर्गत सध्या बरीच खदखद सुरू आहे. काँग्रेसजनच काँग्रेस संपवत आहेत, अशी प्रतिक्रिया यासंदर्भात एका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने दिली. औरंगाबाद पश्चिम हा राखीव मतदारसंघही काँग्रेसच्या वाट्याचा. तिथे यापूर्वी चंद्रभान पारखे व डॉ. जितेंद्र देहाडे यांनी आपले नशीब अजमावले; पण यश पदरी पडले नाही.यावेळीही बरेच उमेदवार पश्चिमची निवडणूक लढवू इच्छित आहेत; पण शिवसेनेचे, वंचित बहुजन आघाडीचे, एमआयएम व इतर रिपब्लिकन पक्ष- संघटनांच्या उमेदवारांचे तगडे आव्हान येथे राहील. ते मोडून काढणे म्हणावे तेवढे सोपे वाटत नाही. या जागेवरही काँग्रेसच्या मित्र पक्षांनी दावा ठोकलेला आहे. ही जागा त्यांना देऊ केल्यास औरंगाबाद शहरातून काँग्रेस हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती व्यक्त करण्यात  येत आहे. 

युतीच्या भवितव्यावर चित्रपश्चिममधून किती उमेदवार उभे राहतील, याचा अंदाज बांधणेही कठीण आहे. भाजप- सेनेची युती न झाल्यास आणखी वेगळेच चित्र निर्माण होईल. अधिकृत उमेदवार जाहीर होऊन त्यांच्या हातात एबी फॉर्म देईपर्यंत घोळ सुरू राहणारच नाही, याची कुणीही शाश्वती देऊ शकत नाही. काँग्रेसची परंपरा अशीच राहत आलेली आहे, हेही नाकारता येत नाही.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Aurangabadऔरंगाबादcongressकाँग्रेसBJPभाजपा