शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ८४ ग्रामपंंचायतींची लॉटरी, इमारत बांधकामासाठी मिळणार निधी

By विजय सरवदे | Updated: May 15, 2024 11:34 IST

स्वनिधीच्या खर्चापासून सुटका, काय आहे योजना?

छत्रपती संभाजीनगर : पंचायतराज व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक म्हणून ग्रामपंचायतींकडे पाहिले जाते. त्यामुळेच अलीकडे वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींच्या खात्यावर जमा केला जातो. त्यातून गावांत विकासकामे करणे सुकर झाले आहे. मात्र, जिल्ह्यातील ८७० पैकी १४३ ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारतच नव्हती. इमारत उभारण्यासाठी जिल्हा परिषदेकडे सुमारे १२० ग्रामपंचायतींनी प्रस्ताव सादर केले होते. त्यापैकी शासनाने ‘बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनें’तर्गत ८४ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव मंजूर केले आहेत.

शासनाने तूर्तास ८४ प्रस्तावांना मंजुरी दिली असली तरी आचारसंहिता उठल्यानंतर उर्वरित ३६ प्रस्तावांतील त्रुटींची पूर्तता करून जि. प. पंचायत विभागामार्फत ते शासनाकडे सादर केले जाणार असल्याचे पंचायत विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे.

जिल्ह्यात ८७० पैकी १४३ ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारत नाही. इमारत नसलेल्या अनेक ग्रामपंचायतींचा कारभार शाळांच्या खोल्यांत, अंगणवाड्या तसेच किरायाच्या खोलींतून चालतो. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीसमोर जिल्हा परिषदेने ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी निधीचा प्रस्ताव ठेवला होता. पण, त्यावर निर्णय झाला नव्हता. दरम्यान, गेल्या नोव्हेंबर महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय तर झालाच. शिवाय, या योजनेत ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी स्वनिधी खर्च करण्याची असलेली अटही रद्द करण्यात आली.

या योजनेंतर्गत २००० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना आता १५ लाखांऐवजी २० लाख रुपये आणि २००० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना १८ लाखांऐवजी २५ लाख अनुदान मिळणार आहे. ग्रामपंचायतींना इमारत बांधकामासाठी यापेक्षा अधिक निधीची गरज पडली तर शासनाच्या इतर योजना, वित्त आयोगाचा निधी, जिल्हा ग्रामविकास निधी, स्थानिक विकास निधी (खासदार, आमदार निधी) यामधून तो दिला जाणार आहे.

काय आहे योजना?या योजनेंतर्गत स्वतंत्र इमारत नसलेल्या ग्रामपंचायतींना स्वत:ची कार्यालयीन इमारत उभारण्यासाठी शासन निधी देणार आहे. ही योजना १७ जानेवारी २०१८ पासून सुरू झाली. पण, तेव्हा शासनाकडून ९० टक्के निधी देण्याची याेजनेत तरतूद होती. तसेच, ग्रामपंचायतींना स्वत:चा १० टक्के निधी खर्च करण्याची अट होती. आता शासन १०० टक्के निधी देणार आहे. सुरुवातीला सन २०१८-१९ ते २०२१-२२ पर्यंतच ही योजनेची मुदत होती. ती आता सन २०२७-२८ या वर्षापर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgram panchayatग्राम पंचायतAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद