शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ८४ ग्रामपंंचायतींची लॉटरी, इमारत बांधकामासाठी मिळणार निधी

By विजय सरवदे | Updated: May 15, 2024 11:34 IST

स्वनिधीच्या खर्चापासून सुटका, काय आहे योजना?

छत्रपती संभाजीनगर : पंचायतराज व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक म्हणून ग्रामपंचायतींकडे पाहिले जाते. त्यामुळेच अलीकडे वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींच्या खात्यावर जमा केला जातो. त्यातून गावांत विकासकामे करणे सुकर झाले आहे. मात्र, जिल्ह्यातील ८७० पैकी १४३ ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारतच नव्हती. इमारत उभारण्यासाठी जिल्हा परिषदेकडे सुमारे १२० ग्रामपंचायतींनी प्रस्ताव सादर केले होते. त्यापैकी शासनाने ‘बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनें’तर्गत ८४ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव मंजूर केले आहेत.

शासनाने तूर्तास ८४ प्रस्तावांना मंजुरी दिली असली तरी आचारसंहिता उठल्यानंतर उर्वरित ३६ प्रस्तावांतील त्रुटींची पूर्तता करून जि. प. पंचायत विभागामार्फत ते शासनाकडे सादर केले जाणार असल्याचे पंचायत विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे.

जिल्ह्यात ८७० पैकी १४३ ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारत नाही. इमारत नसलेल्या अनेक ग्रामपंचायतींचा कारभार शाळांच्या खोल्यांत, अंगणवाड्या तसेच किरायाच्या खोलींतून चालतो. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीसमोर जिल्हा परिषदेने ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी निधीचा प्रस्ताव ठेवला होता. पण, त्यावर निर्णय झाला नव्हता. दरम्यान, गेल्या नोव्हेंबर महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय तर झालाच. शिवाय, या योजनेत ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी स्वनिधी खर्च करण्याची असलेली अटही रद्द करण्यात आली.

या योजनेंतर्गत २००० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना आता १५ लाखांऐवजी २० लाख रुपये आणि २००० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना १८ लाखांऐवजी २५ लाख अनुदान मिळणार आहे. ग्रामपंचायतींना इमारत बांधकामासाठी यापेक्षा अधिक निधीची गरज पडली तर शासनाच्या इतर योजना, वित्त आयोगाचा निधी, जिल्हा ग्रामविकास निधी, स्थानिक विकास निधी (खासदार, आमदार निधी) यामधून तो दिला जाणार आहे.

काय आहे योजना?या योजनेंतर्गत स्वतंत्र इमारत नसलेल्या ग्रामपंचायतींना स्वत:ची कार्यालयीन इमारत उभारण्यासाठी शासन निधी देणार आहे. ही योजना १७ जानेवारी २०१८ पासून सुरू झाली. पण, तेव्हा शासनाकडून ९० टक्के निधी देण्याची याेजनेत तरतूद होती. तसेच, ग्रामपंचायतींना स्वत:चा १० टक्के निधी खर्च करण्याची अट होती. आता शासन १०० टक्के निधी देणार आहे. सुरुवातीला सन २०१८-१९ ते २०२१-२२ पर्यंतच ही योजनेची मुदत होती. ती आता सन २०२७-२८ या वर्षापर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgram panchayatग्राम पंचायतAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद