शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

१०० टक्क्यांहून अधिक पावसाने मराठवाड्यात २५ लाख हेक्टरचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 20:06 IST

ऑक्टोबरअखेरीस चित्र स्पष्ट होण्याची शक्यता असून, त्यानंतर केंद्रीय पथक पाहणीसाठी येईल.

ठळक मुद्देमराठवाड्यात दोन हजार कोटींचे नुकसान

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे मराठवाड्यात खरीप हंगामातील २५ लाख हेक्टवरील पिके सध्या पाण्यात असून, विभागातील जवळपास ७० तालुक्यांत १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. ६ तालुकेदेखील १०० टक्क्यांच्या उंबरठ्यावर असल्याची माहिती विभागीय आयुक्तालयातून देण्यात आली.

विभागीय प्रशासनाच्या प्राथमिक आकडेवारीनुसार अतिवृष्टीग्रस्तांसाठी दीड ते दोन हजार कोटी रुपयांची मदत लागणार असून, अद्याप अंतिम आकडेवारी समोर आलेली नाही. औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली जिल्ह्यांतील सर्व तालुक्यांनी पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली आहे, तर नांदेड, उस्मानाबाद, परभणी आणि लातूर जिल्ह्यांतील एक-दोन तालुके वगळता सर्व ठिकाणी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील हाती आलेले पीक वाया गेले आहे.परतीच्या पावसाने मराठवाड्यात अंदाजे २००० ते २५०० कोटींच्या आसपास नुकसान केल्याचा प्राथमिक अंदाज विभागीय प्रशासनाने बांधला आहे.

ऑक्टोबरअखेरीस चित्र स्पष्ट होण्याची शक्यता असून, त्यानंतर केंद्रीय पथक पाहणीसाठी येईल. पथकासमोर सध्या प्रशासन करीत असलेले पंचनामे, छायाचित्रे ठेवण्यात येतील. त्यानंतर केंद्र शासनाची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. पुढच्या महिन्यातील शेवटच्या आठवड्यात केंद्राचे पथक पाहणीसाठी येण्याची शक्यता प्रशासकीय वर्तुळात आहे. गेल्यावर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची मदत डिसेंबर २०१९ मध्ये टप्पेनिहाय देण्यास सुरुवात झाली होती. केंद्रीय पथकाच्या पाहणीपूर्वी विभागीय प्रशासनाने पाठविलेल्या अहवालानुसार मदत मिळाली होती. यावर्षीदेखील ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांचे किती क्षेत्र वाया गेले, त्याचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.

गतवर्षी लागले ३,३५० कोटीऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये समुद्रातील चक्रीवादळामुळे राज्याला अवकाळी पावसाने झोडपले होते. ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्यांमधील शेती पिकांचे नुकसान झाले. यात मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील सुमारे ४४ लाख ३३ हजार ५४९ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. ४१ लाख ४९ हजार १७५ हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे आणि बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शासकीय स्तरावर निर्णय झाला होता.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीagricultureशेतीMarathwadaमराठवाडा