शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

१०० टक्क्यांहून अधिक पावसाने मराठवाड्यात २५ लाख हेक्टरचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 20:06 IST

ऑक्टोबरअखेरीस चित्र स्पष्ट होण्याची शक्यता असून, त्यानंतर केंद्रीय पथक पाहणीसाठी येईल.

ठळक मुद्देमराठवाड्यात दोन हजार कोटींचे नुकसान

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे मराठवाड्यात खरीप हंगामातील २५ लाख हेक्टवरील पिके सध्या पाण्यात असून, विभागातील जवळपास ७० तालुक्यांत १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. ६ तालुकेदेखील १०० टक्क्यांच्या उंबरठ्यावर असल्याची माहिती विभागीय आयुक्तालयातून देण्यात आली.

विभागीय प्रशासनाच्या प्राथमिक आकडेवारीनुसार अतिवृष्टीग्रस्तांसाठी दीड ते दोन हजार कोटी रुपयांची मदत लागणार असून, अद्याप अंतिम आकडेवारी समोर आलेली नाही. औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली जिल्ह्यांतील सर्व तालुक्यांनी पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली आहे, तर नांदेड, उस्मानाबाद, परभणी आणि लातूर जिल्ह्यांतील एक-दोन तालुके वगळता सर्व ठिकाणी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील हाती आलेले पीक वाया गेले आहे.परतीच्या पावसाने मराठवाड्यात अंदाजे २००० ते २५०० कोटींच्या आसपास नुकसान केल्याचा प्राथमिक अंदाज विभागीय प्रशासनाने बांधला आहे.

ऑक्टोबरअखेरीस चित्र स्पष्ट होण्याची शक्यता असून, त्यानंतर केंद्रीय पथक पाहणीसाठी येईल. पथकासमोर सध्या प्रशासन करीत असलेले पंचनामे, छायाचित्रे ठेवण्यात येतील. त्यानंतर केंद्र शासनाची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. पुढच्या महिन्यातील शेवटच्या आठवड्यात केंद्राचे पथक पाहणीसाठी येण्याची शक्यता प्रशासकीय वर्तुळात आहे. गेल्यावर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची मदत डिसेंबर २०१९ मध्ये टप्पेनिहाय देण्यास सुरुवात झाली होती. केंद्रीय पथकाच्या पाहणीपूर्वी विभागीय प्रशासनाने पाठविलेल्या अहवालानुसार मदत मिळाली होती. यावर्षीदेखील ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांचे किती क्षेत्र वाया गेले, त्याचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.

गतवर्षी लागले ३,३५० कोटीऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये समुद्रातील चक्रीवादळामुळे राज्याला अवकाळी पावसाने झोडपले होते. ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्यांमधील शेती पिकांचे नुकसान झाले. यात मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील सुमारे ४४ लाख ३३ हजार ५४९ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. ४१ लाख ४९ हजार १७५ हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे आणि बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शासकीय स्तरावर निर्णय झाला होता.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीagricultureशेतीMarathwadaमराठवाडा