शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सोन्याचा व्यवसाय भागीदारीत करण्याचे आमिष देत १५ लाखाला लुबाडले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 13:35 IST

भागीदारीत सोन्याचा व्यवसाय करू, असे आमिष दाखवून एका व्यावसायिकाला १५ लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. 

औरंगाबाद : भागीदारीत सोन्याचा व्यवसाय करू, असे आमिष दाखवून एका व्यावसायिकाला १५ लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. 

नितेश घेवरचंद जैन (रा. सिडको एन-४), असे आरोपीचे नाव आहे. याविषयी मुकुंदवाडी पोलिसांनी सांगितले की, जयभवानीनगर येथील रहिवासी साईनाथ खंडू जानवळे यांचे मोबाईल शॉॅपीचे दुकान आहे. दोन वर्षांपूर्वी आरोपी हा त्यांच्याकडे नियमित येत असे.   त्यातून त्यांची आरोपीसोबत ओळख झाली होती. आरोपी नितेश जैन हा सराफा दुकानदारांना सोन्या-चांदीचे दागिने विक्री करण्याचा व्यवसाय करायचा. त्यावेळी आरोपीने त्यांना मोबाईल शॉपीचा व्यवसाय करण्याऐवजी आपण भागीदारीत सोन्या-चांदीचा व्यवसाय करू, असे म्हणाला. त्यासाठी तुम्ही पंधरा लाख रुपये द्या आणि माझे पंधरा लाख रुपयांच्या भांडवलामध्ये हा व्यवसाय सुरू होईल, असे त्याने सांगितले. 

त्याच्यावर विश्वास ठेवून तक्रारदारांनी आरोपीला दोन वर्षांपूर्वी पंधरा लाख रुपये दिले. रक्कम मिळाल्यानंतर त्याने लगेच व्यवसाय सुरू न केल्याने जोनवाळ यांनी वेळावेळी त्याची भेट घेतली तेव्हा त्याने काळजी करू नका, काहीतरी कारणे सांगून व्यवसाय सुरू करण्यास विलंब लागत असल्याचे म्हणायचा. मात्र, त्यानंतर तो पसार झाला. त्याने मोबाईल नंबरही बंद केला. परिणामी, तक्रारदारांचा त्यांच्याशी संपर्क तुटला.  आरोपीने आपल्याप्रमाणे अनेकांकडून अशा प्रकारे मोठ्या रक्कम नेल्याचे तक्रारदारांना समजले. त्यांनी १९ सप्टेंबर रोजी मुकुंदवाडी ठाण्यात आरोपीविरोधात फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदविला. पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसfraudधोकेबाजी